AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्याने विदर्भात फुलवले कोकण,नारळशेतीतून केली रग्गड कमाई

विदर्भात नारळाचे पिक घेण्याचा पराक्रम वाशीम जिल्ह्यातील शेलु खडसे गावातील प्रयोगशील शेतकरी रमेश त्र्यंबक धामोडे यांनी केला आहे. त्यांनी सोयाबिन सारख्या पिकांच्या नादी न लागता वेगळा प्रयोग केला आणि त्याला यश आले आहे.

| Updated on: Oct 14, 2025 | 6:09 PM
Share
विदर्भातील वाशीम जिल्हा हा पारंपरिक पिकांसाठी ओळखला जातो. मात्र, शेलू खडसे येथील प्रयोगशील शेतकरी रमेश त्र्यंबक धामोडे यांनी पारंपरिक पिकाला छेद देत नारळाची यशस्वी शेती करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

विदर्भातील वाशीम जिल्हा हा पारंपरिक पिकांसाठी ओळखला जातो. मात्र, शेलू खडसे येथील प्रयोगशील शेतकरी रमेश त्र्यंबक धामोडे यांनी पारंपरिक पिकाला छेद देत नारळाची यशस्वी शेती करून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

1 / 6
 रमेश धाडसे यांनी सहज प्रयोग म्हणून आधी नारळाची ६० झाडे शेताच्या बांधाने लावली. आणि त्यांना चांगले यश आले. त्यानंतर त्यांनी ३३ गुंठे जागेत आणखी अडीचशे नारळांचे कलमे लावली आहेत. वाशिम जिल्ह्यातील हा पहिलाच असा प्रयोग मानला जात आहे.

रमेश धाडसे यांनी सहज प्रयोग म्हणून आधी नारळाची ६० झाडे शेताच्या बांधाने लावली. आणि त्यांना चांगले यश आले. त्यानंतर त्यांनी ३३ गुंठे जागेत आणखी अडीचशे नारळांचे कलमे लावली आहेत. वाशिम जिल्ह्यातील हा पहिलाच असा प्रयोग मानला जात आहे.

2 / 6
कोकण विभागात वातावरण नारळासाठी पोषक मानले जाते, मात्र वाशिमसारख्या कोरडवाहू हवामानातही नारळ शेती शक्य आहे, हे रमेश धामोडे यांनी आपल्या प्रयोगातून सिद्ध करून दाखवले आहे.

कोकण विभागात वातावरण नारळासाठी पोषक मानले जाते, मात्र वाशिमसारख्या कोरडवाहू हवामानातही नारळ शेती शक्य आहे, हे रमेश धामोडे यांनी आपल्या प्रयोगातून सिद्ध करून दाखवले आहे.

3 / 6
धामोडे यांनी सुरवातीला ६०  झाडांच्या लागवडीपासून आपल्या प्रयोगाला सुरुवात केली. शेताच्या बांधावर लावलेली झाडं त्यांनी योग्य पद्धतीने वाढवली. या झाडांची नियमित देखभाल आणि पाणीपुरवठा यामुळे झाडांची वाढ जोमाने झाली.लागवडीनंतर त्यांना सुमारे दीड ते दोन लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं.

धामोडे यांनी सुरवातीला ६० झाडांच्या लागवडीपासून आपल्या प्रयोगाला सुरुवात केली. शेताच्या बांधावर लावलेली झाडं त्यांनी योग्य पद्धतीने वाढवली. या झाडांची नियमित देखभाल आणि पाणीपुरवठा यामुळे झाडांची वाढ जोमाने झाली.लागवडीनंतर त्यांना सुमारे दीड ते दोन लाख रुपयांचं उत्पन्न मिळालं.

4 / 6
 या यशामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी एक एकर क्षेत्रात आणखी ५०० झाडांची लागवड केली. सध्या ही झाडं सुमारे तीन वर्षांची झाली असून, पुढील दोन वर्षांत उत्पादन मिळेल, असा अंदाज आहे. या झाडांपासून सुमारे ६ लाख रुपयांचं निव्वळ उत्पन्न मिळेल, असा विश्वास धामोडे यांनी व्यक्त केला आहे.

या यशामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी एक एकर क्षेत्रात आणखी ५०० झाडांची लागवड केली. सध्या ही झाडं सुमारे तीन वर्षांची झाली असून, पुढील दोन वर्षांत उत्पादन मिळेल, असा अंदाज आहे. या झाडांपासून सुमारे ६ लाख रुपयांचं निव्वळ उत्पन्न मिळेल, असा विश्वास धामोडे यांनी व्यक्त केला आहे.

5 / 6
धामोडे यांच्या या यशस्वी प्रयोगामुळे पारंपरिक शेतीच्या पलीकडेही विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवे मार्ग खुलं होत असल्याचं चित्र दिसत आहे.कोकणातील पिकं आता विदर्भातही फुलताना दिसत असून, प्रयोगशीलतेतूनच शेतकऱ्यांचं भविष्य उज्ज्वल होऊ शकतं, याचं उदाहरण म्हणजे रमेश धामोडे यांची नारळ शेती आहे.

धामोडे यांच्या या यशस्वी प्रयोगामुळे पारंपरिक शेतीच्या पलीकडेही विदर्भातील शेतकऱ्यांसाठी नवे मार्ग खुलं होत असल्याचं चित्र दिसत आहे.कोकणातील पिकं आता विदर्भातही फुलताना दिसत असून, प्रयोगशीलतेतूनच शेतकऱ्यांचं भविष्य उज्ज्वल होऊ शकतं, याचं उदाहरण म्हणजे रमेश धामोडे यांची नारळ शेती आहे.

6 / 6
Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला