AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरात पालींचा उच्छाद, अवघ्या 5 रुपयात करा हे उपाय, होईल कायमचा नायनाट

घरातील पालींमुळे त्रस्त असलेल्यांसाठी हा लेख उपयुक्त आहे. या लेखात, पालींना घरापासून दूर ठेवण्यासाठी पाच स्वस्त आणि प्रभावी नैसर्गिक उपाय सांगण्यात आले आहेत. हे सर्व उपाय सोपे आणि किफायतशीर असून, घरातील पालींचा उपद्रव कमी करण्यास मदत करतील. कोणतेही रसायने वापरण्याची गरज नाही.

| Updated on: Aug 21, 2025 | 2:27 PM
Share
घरात सातत्याने फिरणाऱ्या पालीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. या पाली पाहिल्यानंतर आपल्यापैकी अनेकांना भीती वाटते. पण या पाली अनेक आजारांना कारणीभूत ठरु शकतात. काही वेळा या पाली जेवणात पडतील किंवा अंगावर पडतील अशी भीती वाटते.

घरात सातत्याने फिरणाऱ्या पालीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. या पाली पाहिल्यानंतर आपल्यापैकी अनेकांना भीती वाटते. पण या पाली अनेक आजारांना कारणीभूत ठरु शकतात. काही वेळा या पाली जेवणात पडतील किंवा अंगावर पडतील अशी भीती वाटते.

1 / 10
जर तुमच्याही घरात पालींनी उच्छाद मांडला असेल आणि त्यापासून सुटका मिळवण्यासाठी जर तुम्ही महागडे स्प्रे किंवा रसायनांवर पैसे खर्च करत असाल, तर थांबा कारण पालींना पळवून लावण्यासाठी रसायनांचाच वापर करणे गरजेचे नाही.

जर तुमच्याही घरात पालींनी उच्छाद मांडला असेल आणि त्यापासून सुटका मिळवण्यासाठी जर तुम्ही महागडे स्प्रे किंवा रसायनांवर पैसे खर्च करत असाल, तर थांबा कारण पालींना पळवून लावण्यासाठी रसायनांचाच वापर करणे गरजेचे नाही.

2 / 10
तुम्ही काही नैसर्गिक उपाय करुन तुमच्या घरापासून पालींना कायमचं दूर ठेवू शकता. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला अजिबात जास्त खर्च करण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला 5 असे सोपे उपाय सांगणार आहोत, ज्याच्यासाठी तुम्हाला केवळ 1 रुपयांपासून 5 रुपये खर्च येईल.

तुम्ही काही नैसर्गिक उपाय करुन तुमच्या घरापासून पालींना कायमचं दूर ठेवू शकता. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला अजिबात जास्त खर्च करण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला 5 असे सोपे उपाय सांगणार आहोत, ज्याच्यासाठी तुम्हाला केवळ 1 रुपयांपासून 5 रुपये खर्च येईल.

3 / 10
लसणाचा तीव्र वास पालींना दूर ठेवण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो. यासाठी काही लसूण पाकळ्या सोलून दरवाजे किंवा खिडक्यांजवळ ठेवा. तुम्ही लसणाचा रस पाण्यात मिसळून घरातील वेगवेगळ्या ठिकाणी फवारणी देखील करू शकता.

लसणाचा तीव्र वास पालींना दूर ठेवण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो. यासाठी काही लसूण पाकळ्या सोलून दरवाजे किंवा खिडक्यांजवळ ठेवा. तुम्ही लसणाचा रस पाण्यात मिसळून घरातील वेगवेगळ्या ठिकाणी फवारणी देखील करू शकता.

4 / 10
कांद्याचा तीव्र आणि तिखट वास देखील पालींना पळवून लावण्यास मदत करतो. यासाठी कांद्याचे तुकडे करून जिथे पाल येते, अशा ठिकाणी ठेवा. तसेच कांद्याचा रस काढून पाण्यात मिसळून तो स्प्रे देखील करू शकता.

कांद्याचा तीव्र आणि तिखट वास देखील पालींना पळवून लावण्यास मदत करतो. यासाठी कांद्याचे तुकडे करून जिथे पाल येते, अशा ठिकाणी ठेवा. तसेच कांद्याचा रस काढून पाण्यात मिसळून तो स्प्रे देखील करू शकता.

5 / 10
लिंबू आणि मिरचीचा तिखट वास पालींना पळवून लावण्यासाठी जुना आणि प्रभावी उपाय मानला जातो. एका स्प्रे बाटलीत पाणी, थोडे लिंबाचा रस आणि मिरचीची पावडर मिसळून एक मिश्रण तयार करा. आता हे मिश्रण जिथे पाली फिरतात, अशा ठिकाणी फवारणी करा. खिडक्यांचे कोपरे, भिंती किंवा दरवाजांच्या मागे तुम्ही हे मिश्रण स्प्रे करु शकता.

लिंबू आणि मिरचीचा तिखट वास पालींना पळवून लावण्यासाठी जुना आणि प्रभावी उपाय मानला जातो. एका स्प्रे बाटलीत पाणी, थोडे लिंबाचा रस आणि मिरचीची पावडर मिसळून एक मिश्रण तयार करा. आता हे मिश्रण जिथे पाली फिरतात, अशा ठिकाणी फवारणी करा. खिडक्यांचे कोपरे, भिंती किंवा दरवाजांच्या मागे तुम्ही हे मिश्रण स्प्रे करु शकता.

6 / 10
अंड्याच्या कवच हा देखील पालींना घालवण्याचा एक रामबाण उपाय आहे. अंड्याचा कवचाच्या वासाने पालींना तिथे कोणता दुसरा प्राणी आहे असे वाटते. ज्यामुळे ते घाबरुन पळून जातात.

अंड्याच्या कवच हा देखील पालींना घालवण्याचा एक रामबाण उपाय आहे. अंड्याचा कवचाच्या वासाने पालींना तिथे कोणता दुसरा प्राणी आहे असे वाटते. ज्यामुळे ते घाबरुन पळून जातात.

7 / 10
तुम्ही काही अंड्याचे कवच गोळा करून ते दरवाजे किंवा खिडक्यांजवळ ठेवू शकता. हे कवच पुन्हा पुन्हा बदलण्याची गरज नाही. एकदा ठेवल्यावर ते अनेक दिवसांसाठी तसेच ठेवा. या उपायासाठी तुम्हाला एकही पैसा खर्च करावा लागणार नाही.

तुम्ही काही अंड्याचे कवच गोळा करून ते दरवाजे किंवा खिडक्यांजवळ ठेवू शकता. हे कवच पुन्हा पुन्हा बदलण्याची गरज नाही. एकदा ठेवल्यावर ते अनेक दिवसांसाठी तसेच ठेवा. या उपायासाठी तुम्हाला एकही पैसा खर्च करावा लागणार नाही.

8 / 10
कॉफी पावडर आणि तंबाखूचे मिश्रण सरड्यांना पळवून लावण्यासाठी एकदम शक्तिशाली उपाय आहे. कॉफी पावडरमध्ये थोडासा तंबाखू मिसळून लहान गोळ्या तयार करा. आता या गोळ्या जिथे पाली असतात, असा ठिकाणी ठेवा. या गोळ्यांमधून निघणारा वास पालीला घरापासून दूर ठेवण्यास मदत करतो.

कॉफी पावडर आणि तंबाखूचे मिश्रण सरड्यांना पळवून लावण्यासाठी एकदम शक्तिशाली उपाय आहे. कॉफी पावडरमध्ये थोडासा तंबाखू मिसळून लहान गोळ्या तयार करा. आता या गोळ्या जिथे पाली असतात, असा ठिकाणी ठेवा. या गोळ्यांमधून निघणारा वास पालीला घरापासून दूर ठेवण्यास मदत करतो.

9 / 10
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

10 / 10
Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक