AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asian Games : तिलक वर्मा याने दोनच दिवसात मोडला यशस्वी जयस्वालचा रेकॉर्ड, युवराज आणि हार्दिकच्या पंगतीत स्थान

Asian Games, IND vs BAN : उपांत्य फेरीत भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात लढत झाली. तिलक वर्मा याने या सामन्यात नाबाद 55 धावांची खेळी केली आणि यशस्वी जयस्वाल याचा दोन दिवस जुना विक्रम मोडीत काढला.

| Updated on: Oct 06, 2023 | 3:48 PM
Share
एशियन गेम्स 2023 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने बांगलादेशचा 9 विकेट्सने पराभव केला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत टीम इंडियाचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे.

एशियन गेम्स 2023 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने बांगलादेशचा 9 विकेट्सने पराभव केला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत टीम इंडियाचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे.

1 / 6
उपांत्य फेरीत टीम इंडियाने तिलक वर्माच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर अंतिम फेरी गाठली आहे. तिलक वर्मा याने 26 चेंडूत 55 धावा केल्या. यात 6 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश आहे. यासह त्याने काही विक्रम आपल्या नावावर केले आहेत. इतकंच काय तर यशस्वी जयस्वाल याने दोन दिवसापूर्वी केलेला विक्रम मोडीत काढला आहे.

उपांत्य फेरीत टीम इंडियाने तिलक वर्माच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर अंतिम फेरी गाठली आहे. तिलक वर्मा याने 26 चेंडूत 55 धावा केल्या. यात 6 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश आहे. यासह त्याने काही विक्रम आपल्या नावावर केले आहेत. इतकंच काय तर यशस्वी जयस्वाल याने दोन दिवसापूर्वी केलेला विक्रम मोडीत काढला आहे.

2 / 6
तिलक वर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाकडून बाद फेरीत 50 हून अधिक धावा करणारा तरूण फलंदाज बनला आहे. यापूर्वी यशस्वी जयस्वाल याने उपांत्यपूर्व फेरीत नेपाळ विरुद्ध 49 चेंडूत 100 केल्या होत्या. मात्र हा विक्रम दोन दिवसात मोडला गेला आहे.

तिलक वर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाकडून बाद फेरीत 50 हून अधिक धावा करणारा तरूण फलंदाज बनला आहे. यापूर्वी यशस्वी जयस्वाल याने उपांत्यपूर्व फेरीत नेपाळ विरुद्ध 49 चेंडूत 100 केल्या होत्या. मात्र हा विक्रम दोन दिवसात मोडला गेला आहे.

3 / 6
यशस्वी जयस्वाल याने 21 वर्षे 279 दिवसात ही कामगिरी केली होती. तर तिलक वर्मा याने 20 वर्षे आमि 332 दिवसात ही कामगिरी केली आहे. यामुळे कमी वयात बाद फेरीत 50 हून अधिक धावा करणारा युवा फलंदाज ठरला आहे.

यशस्वी जयस्वाल याने 21 वर्षे 279 दिवसात ही कामगिरी केली होती. तर तिलक वर्मा याने 20 वर्षे आमि 332 दिवसात ही कामगिरी केली आहे. यामुळे कमी वयात बाद फेरीत 50 हून अधिक धावा करणारा युवा फलंदाज ठरला आहे.

4 / 6
भारताकडून उपांत्य फेरीत 50 हून अधिक धावा करणार चौथा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी विराट कोहली, युवराज सिंग आणि हार्दिक पांड्या यांनी ही कामगिरी केली आहे. यात युवराज सिंग आणि हार्दिक पांड्या यांनी एकदा ही कामगिरी केली आहे. विराट कोहलीने तीन वेळा 50 हून अधिक धावा केल्या आहेत.

भारताकडून उपांत्य फेरीत 50 हून अधिक धावा करणार चौथा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी विराट कोहली, युवराज सिंग आणि हार्दिक पांड्या यांनी ही कामगिरी केली आहे. यात युवराज सिंग आणि हार्दिक पांड्या यांनी एकदा ही कामगिरी केली आहे. विराट कोहलीने तीन वेळा 50 हून अधिक धावा केल्या आहेत.

5 / 6
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बाद फेरीत 50 हून अधिक धावा आणि एक विकेट घेण्याची किमया 2016 मध्ये विराट कोहलीने केली होती. वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने ही कामगिरी केली होती. आता 7 वर्षानंतर असंच तिलक वर्मा याने केलं आहे. 55 धावा करत एक गडी बाद केला आहे.

टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बाद फेरीत 50 हून अधिक धावा आणि एक विकेट घेण्याची किमया 2016 मध्ये विराट कोहलीने केली होती. वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने ही कामगिरी केली होती. आता 7 वर्षानंतर असंच तिलक वर्मा याने केलं आहे. 55 धावा करत एक गडी बाद केला आहे.

6 / 6
Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.