AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : शेतकऱ्याच्या स्वप्नांचा चुराडा, शॉर्टसर्किटमुळे अडीच एकरातील ऊस भस्मसात

लासलगाव : ऊस गाळप हंगामाच्या अंतिम टप्प्यात ऊस साखर कारखान्यावर जाण्याऐवजी फडातच त्याची राखरांगोळी होण्याच्या घटना वाढत आहेत. महावितरणच्या गलथान कारभारामुळे अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. सध्या गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असताना शेतकरी वाढीव उत्पादनाचे स्वप्न पाहत आहे. मात्र, एका रात्रीतून शेतकऱ्यांच्या या स्वप्नांचा चुराडा होत आहे. कारण शार्ट सर्किटमुळे ऊसाला आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे उत्पादन तर सोडाच पण झालेला खर्चही निघत नाही अशी अवस्था आहे. सिन्नर तालुक्यातील वल्हेवाडी शिवारातील निवृत्ती यादव यांचा अडीच एकरातील ऊस याच कारणामुळे जळाला आहे. त्यामुळे त्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

| Edited By: | Updated on: Feb 18, 2022 | 11:00 AM
Share
पुढील आठवड्यात होती तोडणी: वर्षभर निवृत्ती यादव यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे ऊसाची जोपासणा केली होती. त्यामुळे किती टन ऊस होईल याची गणितेही यादव हे मांडत होते. पण एका ठिणगीमुळे क्षणार्धात त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे.

पुढील आठवड्यात होती तोडणी: वर्षभर निवृत्ती यादव यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे ऊसाची जोपासणा केली होती. त्यामुळे किती टन ऊस होईल याची गणितेही यादव हे मांडत होते. पण एका ठिणगीमुळे क्षणार्धात त्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे.

1 / 5
ऊसावरच होते सर्वकाही अवलंबून: निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शिवाय रब्बी हंगामावर बदलत्या वातावरणाचा धोका आहेच. त्यामुळे ऊसातूनच उत्पन्नात वाढ होईल असा विश्वास यादव यांना होता. मात्र, तोड काही दिवसांवर आली असतानाच ही दुर्घटना घडली आहे.

ऊसावरच होते सर्वकाही अवलंबून: निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शिवाय रब्बी हंगामावर बदलत्या वातावरणाचा धोका आहेच. त्यामुळे ऊसातूनच उत्पन्नात वाढ होईल असा विश्वास यादव यांना होता. मात्र, तोड काही दिवसांवर आली असतानाच ही दुर्घटना घडली आहे.

2 / 5
अडीच एकरातील ऊसाचे नुकसान: निवृत्ती यादव यांनी अडीच एकरामध्ये ऊसाची लागवड केली होती. इतर पिकांचे तर नुकसान झाले पण ऊसातून निश्चित उत्पन्न मिळणार म्हणून त्यांनी तळ हाताच्या फोडाप्रमाणे त्याची जोपासना केली होती. अखेर आगीमुळे अडीच एकरातील ऊस जळून खाक झाला आहे.

अडीच एकरातील ऊसाचे नुकसान: निवृत्ती यादव यांनी अडीच एकरामध्ये ऊसाची लागवड केली होती. इतर पिकांचे तर नुकसान झाले पण ऊसातून निश्चित उत्पन्न मिळणार म्हणून त्यांनी तळ हाताच्या फोडाप्रमाणे त्याची जोपासना केली होती. अखेर आगीमुळे अडीच एकरातील ऊस जळून खाक झाला आहे.

3 / 5
नुकसान भरपाईची मागणी: महावितरणच्या गलथान कारभारामुळे केवळ नाशिक जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात ऊसाला आग लागण्याच्या घटना वाढलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान तर होतेच पण वेळेत महावितरणकडून आर्थिक मदतही मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होऊनही महावितरण कार्यालयाचे खेटे मारावे लागत आहेत.

नुकसान भरपाईची मागणी: महावितरणच्या गलथान कारभारामुळे केवळ नाशिक जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात ऊसाला आग लागण्याच्या घटना वाढलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान तर होतेच पण वेळेत महावितरणकडून आर्थिक मदतही मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होऊनही महावितरण कार्यालयाचे खेटे मारावे लागत आहेत.

4 / 5
शेतकऱ्यांचे डोळे मदतीकडे: यंदा निसर्गाचा लहरीपणा कायम राहिलेला आहे. याचा केवळ ऊसावर परिणाम झालेला नव्हता पण अशा दुर्घटनांमुळे ऊसाचीही सुटका झालेली नाही. त्यामुळे संबंधित साखर कारखान्यानेही आहे त्या ऊसाचे गाळप करुन शेतकऱ्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांचे डोळे मदतीकडे: यंदा निसर्गाचा लहरीपणा कायम राहिलेला आहे. याचा केवळ ऊसावर परिणाम झालेला नव्हता पण अशा दुर्घटनांमुळे ऊसाचीही सुटका झालेली नाही. त्यामुळे संबंधित साखर कारखान्यानेही आहे त्या ऊसाचे गाळप करुन शेतकऱ्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे.

5 / 5
Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.