AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयुष्यभराची कमाई एका झटक्यात मातीमोल, विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकरी संकटात

नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात या नुकसानीची दाहकता अधिक स्पष्टपणे दिसून येते. प्रचंड फळगळ झाल्यामुळे शेतकऱ्यांचे हेक्टरी ६ ते ७ लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे.

| Updated on: Sep 26, 2025 | 3:04 PM
Share
विदर्भाची ओळख असलेल्या संत्रा आणि मोसंबी पिकावर अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने मोठे संकट कोसळले आहे. सततच्या खराब हवामानामुळे नागपूर आणि अमरावती जिल्ह्यांत या फळपिकांचे अंदाजे २०० कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे.

विदर्भाची ओळख असलेल्या संत्रा आणि मोसंबी पिकावर अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने मोठे संकट कोसळले आहे. सततच्या खराब हवामानामुळे नागपूर आणि अमरावती जिल्ह्यांत या फळपिकांचे अंदाजे २०० कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे.

1 / 8
या बागांमधील ८० ते ९० टक्के फळं गळून पडल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. विदर्भात साधारण सव्वा लाख हेक्टर क्षेत्रावर संत्री आणि मोसंबीची लागवड होते.

या बागांमधील ८० ते ९० टक्के फळं गळून पडल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. विदर्भात साधारण सव्वा लाख हेक्टर क्षेत्रावर संत्री आणि मोसंबीची लागवड होते.

2 / 8
परंतु, सध्या बागांमध्ये पाहिल्यास सर्वत्र गळालेल्या फळांचा सडा दिसत आहे. प्रचंड फळगळ झाल्यामुळे शेतकऱ्यांचे हेक्टरी ६ ते ७ लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे.

परंतु, सध्या बागांमध्ये पाहिल्यास सर्वत्र गळालेल्या फळांचा सडा दिसत आहे. प्रचंड फळगळ झाल्यामुळे शेतकऱ्यांचे हेक्टरी ६ ते ७ लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे.

3 / 8
पीक हातातून गेल्यामुळे संत्रा आणि मोसंबी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे  ते पूर्णपणे हवालदील झाले आहेत. नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात या नुकसानीची दाहकता अधिक स्पष्टपणे दिसून येते.

पीक हातातून गेल्यामुळे संत्रा आणि मोसंबी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे ते पूर्णपणे हवालदील झाले आहेत. नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात या नुकसानीची दाहकता अधिक स्पष्टपणे दिसून येते.

4 / 8
जेलवाडी येथील शेतकरी दयाराम जुगसेनीया यांची तीन एकर मोसंबी बाग आहे. यंदा या बागेसाठी त्यांनी तीन ते चार लाख रुपये खर्च केला होता आणि त्यांना सुमारे १० लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते.

जेलवाडी येथील शेतकरी दयाराम जुगसेनीया यांची तीन एकर मोसंबी बाग आहे. यंदा या बागेसाठी त्यांनी तीन ते चार लाख रुपये खर्च केला होता आणि त्यांना सुमारे १० लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते.

5 / 8
मात्र, आता बागेत सर्वत्र फळ गळाल्याने त्यांचे हे उत्पन्न एक-दोन लाख रुपयेही होणार नाही. त्यांच्या बागेतील ८० ते ९० टक्के फळं जमिनीवर पडलेली पाहून शेतकऱ्यांच्या यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले.

मात्र, आता बागेत सर्वत्र फळ गळाल्याने त्यांचे हे उत्पन्न एक-दोन लाख रुपयेही होणार नाही. त्यांच्या बागेतील ८० ते ९० टक्के फळं जमिनीवर पडलेली पाहून शेतकऱ्यांच्या यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले.

6 / 8
यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या आयुष्यातील कमाई एका झटक्यात मातीमोल झाली आहे. या गंभीर संकटाच्या पार्श्वभूमीवर काटोलचे आमदार चरणसिंग ठाकूर यांनी शासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.

यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या आयुष्यातील कमाई एका झटक्यात मातीमोल झाली आहे. या गंभीर संकटाच्या पार्श्वभूमीवर काटोलचे आमदार चरणसिंग ठाकूर यांनी शासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.

7 / 8
अतिवृष्टीमुळे झालेल्या या अभूतपूर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करून, संत्रा आणि मोसंबी उत्पादकांना तातडीने आणि योग्य नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून जोर धरत आहे.

अतिवृष्टीमुळे झालेल्या या अभूतपूर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करून, संत्रा आणि मोसंबी उत्पादकांना तातडीने आणि योग्य नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून जोर धरत आहे.

8 / 8
Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.