AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा आमरण उपोषणाचा इशारा, साखळाई पाणी प्रश्न चिघळण्याची शक्यता

अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील प्रलंबित साकळाई पाणी योजनेचा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे. सिनेअभिनेत्री दीपाली सय्यद यांनी ही योजना तातडीने मंजूर न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा आमरण उपोषणाचा इशारा, साखळाई पाणी प्रश्न चिघळण्याची शक्यता
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jul 28, 2019 | 6:59 PM
Share

अहमदनगर : अनेक दिवसांपासून जिल्ह्यातील प्रलंबित साकळाई पाणी योजनेचा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे. सिनेअभिनेत्री दिपाली सय्यद यांनी ही योजना तातडीने मंजूर न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

साकळाई योजनेतून अहमदनगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील 35 गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे साकळाई योजनेतून 3 टीएमसी पाणी मिळावे यासाठी दिपाली सय्यद यांनी लढा उभारला आहे. ही योजना तातडीने मंजूर झाली नाही, तर आपण 9 ऑगस्ट रोजी (क्रांती दिन) आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिपाली सय्यद यांनी दिला. यासाठी त्यांनी साकळाई योजनेच्या लाभक्षेत्रातील गावामध्ये जाऊन ग्रामस्थांच्या भेटी घेत संवादही साधला. तसेच साकळाई योजना जनतेच्या रेट्यानेच पुढे जाणार असल्याचे स्पष्ट केले.

दिपाली सय्यद म्हणाल्या, “साकळाई योजनेतून अहमदनगर आणि श्रीगोंदा तालुक्यातील 35 गावांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यासाठी साकळाई योजनेतून 3 टीएमसी पाणी मिळणे आवश्यक आहे. मात्र, मागील 20 वर्षांपासून येथील लोकप्रतिनिधी या योजनेच्या माध्यमातून फक्त राजकारणच करत आहेत. म्हणूनच तात्काळ या योजनेला मंजूरी न दिल्यास मी 9 ऑगस्टपासून आमरण उपोषण करणार आहे.”

दरम्यान, साकळाई योजनेसाठी माजी मंत्री बबनराव पाचपुते आणि राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांनी देखील पाठपुरावा केला आहे. एवढेच नाही तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या सोबत या योजनेच्या मंजुरीसाठी बैठक देखील घेण्यात आली. तरी देखील या योजनेला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. अशातच दिपाली सय्यद यांनी या लढाईत उडी घेतल्याने या आंदोलनाला एक वेगळं वलय प्राप्त झालं आहे.

Follow Us
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
Breaking! मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
Sunetra Pawar | 'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं भावनिक विधान
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
Heavy Rain | कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! अचानक मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
NDAमध्ये शरद पवारांची एन्ट्री? जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्...
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्... भुस्खलनाचा थरारक व्हिडीओ समोर
मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
Amit Satam | मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही पूरस्थितीचा फटका
खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा
Navi Mumbai | खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता...
स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता या शहरावर ओढावलं ढगफुटीचं संकट
संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा...
Ashadhi Wari 2026 | संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना! 427 वर्षांची परंपरा, विठ्ठल... विठ्ठलच्या गजरात दुमदुमलं पैठण