AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar : पूर्ण बहुमत असताना राज्याला मंत्रिमंडळापासून वंचित ठेवणं बरोबर नाही, अजित पवारांनी व्यक्त केली खंत

मंत्रिमंडळ विस्तार हा सर्वस्वी शिंदे-फडणवीस यांचा अधिकार आहे. ते काही विरोधीपक्ष नेत्याचे काम नाही. त्यांच्याकडे पूर्ण बहुमतदेखील आहे. अशावेळी राज्याला मंत्रिमंडळापासून वंचित ठेवणे योग्य नाही, असे अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar : पूर्ण बहुमत असताना राज्याला मंत्रिमंडळापासून वंचित ठेवणं बरोबर नाही, अजित पवारांनी व्यक्त केली खंत
लोकशाहीची थट्टा लावलीय, खून पाडला जातोय, सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्याने अजित पवारांची सडकून टीकाImage Credit source: tv9
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Jul 15, 2022 | 4:10 PM
Share

अहमदनगर : अतिवृष्टीमुळे (Heavy rain) मोठे नुकसान झाले आहे. रोप वाया गेली. पेरण्या झाल्या मात्र जास्त पावसामुळे ते वाया गेले. अॅक्शन घेणे गरजेचे आहे काही शेतकरी म्हणाले अजून आमच्याकडे कोणी आले नाही. किमान पालकमंत्री तरी नेमावे, अशी अपेक्षा विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केली आहे. ते अहमदनगरमध्ये बोलत होते. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागांचीदेखील त्यांनी पाहणी केली. सध्या राज्यात केवळ दोनच व्यक्ती कारभार पाहत आहेत, अशी टीका त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. लवकर मंत्रिमंडळ अस्तित्वात येणे गरजेचे आहे. पालकमंत्रीही नेमले गेले पाहिजे, अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. पूर्ण बहुमत असताना राज्याला मंत्रिमंडळापासून वंचित ठेवणे बरोबर नाही, अशी टीका त्यांनी केली.

‘अनेकांना शब्द दिले आहेत, ते पाळण्याची भीती वाटत असेल’

मंत्रिमंडळ विस्तार हा सर्वस्वी शिंदे-फडणवीस यांचा अधिकार आहे. ते काही विरोधीपक्ष नेत्याचे काम नाही. त्यांच्याकडे पूर्ण बहुमतदेखील आहे. अशावेळी राज्याला मंत्रिमंडळापासून वंचित ठेवणे योग्य नाही. मात्र दुसरीकडे अनेकांना शब्द दिले आहेत. ते पाळले जातील की नाही, अशी शंका त्यांना वाटत असेल, असा टोला त्यांनी राज्य सरकारला लगावला. लोकशाही जर मजबूत करायची असेल तर तातडीने त्यांनी सहकाऱ्यांना काम करण्याची संधी द्यावी, असे अजित पवार म्हणाले.

‘तातडीने पंचनामे झाले पाहिजेत’

राज्यात पुराचे संकट रौद्र रूप धारण करत आहे. शेतकऱ्यांची पिके वाहून गेली आहेत. काही ठिकाणी दुबार पेरणी करावी लागत आहे. या संदर्भात राज्य सरकारने तातडीने पंचनामे झाले पाहिजेत. वेळ निघून गेली तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल, अशी भीती अजित पवार यांनी व्यक्त केली. तर नामांतराच्या मुद्द्यावरून त्यांनी टीका केली. माझे सरकार आल्यानंतर संभाजीनगर करणार, असे ते म्हणाले होते. मग त्यांनी हा प्रस्ताव रद्द करण्याते कारण काय, असा सवाल करत काँग्रेस-राष्ट्रवादीची आणि शिवसेनेची विचारधारा वेगळी होती. मात्र विकासाच्या बाबत एक मत होते, असेही ते यावेळी म्हणाले.

काय म्हणाले अजित पवार?

Follow Us
भयंकर मोठ्या घोटाळ्याचा मुंबईत भांडाफोड! जन्मदाखल्यातील गैरप्रकाराचा
भयंकर मोठ्या घोटाळ्याचा मुंबईत भांडाफोड! जन्मदाखल्यातील गैरप्रकाराचा धक्कादायक खुलासा; तब्बल 1 हजार 23...
बिर्याणी अंगाशी आली... अखेर प्रणित मोरे बॅकफूटवर; व्हिडिओ शेअर करत....
Pranit More Controversy | बिर्याणी अंगाशी आली... अखेर प्रणित मोरे बॅकफूटवर; व्हिडिओ शेअर करत मागितली जाहीर माफी!
मोठी बातमी! 'पांढरी पट्टी' वादाला नवं वळण; थेट मनसे कार्यालयाबाहेर...
मोठी बातमी! 'पांढरी पट्टी' वादाला नवं वळण; थेट मनसेच्या जनसंपर्क कार्यलयाबाहेर... काय घडलं?
पवारांकडे कोणताही प्रस्ताव नाही; विलिनीकरणावर सुळेंचा मोठा खुलासा काय?
Supriya Sule | शरद पवारांकडे कोणताही प्रस्ताव नाही;  NCP-काँग्रेस विलिनीकरणावर सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा काय?
मोठी बातमी! भारतीय वायुसेनेच्या IAF विमानाचा भीषण अपघात; खळबळजनक
मोठी बातमी! भारतीय वायुसेनेच्या IAF विमानाचा भीषण अपघात; प्राथमिक माहितीतून खळबळजनक खुलासा
तो 15 लाख कोटींचा घोटाळा करतो अन्... संजय राऊतांचं थेट विधान; नेमकं...
तो 15 लाख कोटींचा घोटाळा करतो अन्... संजय राऊतांचं थेट विधान; नेमकं प्रकरण काय?
शिंदे गटाचं ऑपरेशन अमित शहांनी 100 वेळा केलं; राऊतांचा स्फोटक हल्लाबोल
Sanjay Raut | शिंदे गटाचं ऑपरेशन अमित शहांनी 100 वेळा केलं; संजय राऊतांचा स्फोटक हल्लाबोल!
शरद पवारांना राज्यसभेचं मोठं पद, उद्धव ठाकरेंना काँग्रेसची कमान?
शरद पवारांना राज्यसभेचं मोठं पद, उद्धव ठाकरेंना काँग्रेसची कमान? भाजपच्या बड्या नेत्याने काढला चिमटा
राणा दाम्पत्याचं नाव पुन्हा चर्चेत! मंत्री बावनकुळेंशी बंद दाराआड...
राणा दाम्पत्याचं नाव पुन्हा चर्चेत! मंत्री बावनकुळेंशी बंद दाराआड चर्चा; नेमकं काय घडलं?
आज अल्टिमेटम नाही... पण उद्यापासून काय? पवारांच्या आंदोलनातून इशारा!
Rohit Pawar Protest | आज अल्टिमेटम नाही... पण उद्यापासून काय? रोहित पवारांच्या आंदोलनातून सरकारला मोठा इशारा!