AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Modi Government | तयार राहा… ऑगस्टपर्यंत मोदी सरकार कोसळणार, बड्या नेत्याने केला दावा

दिल्लीतील मोदी सरकार खूप कमकुवत आहे. हे सरकार ऑगस्टपर्यंत पडू शकते. हे पाहता मी सर्व कार्यकर्त्यांना सांगतो की, निवडणुकीची तयारी ठेवा कारण निवडणुका कधीही होऊ शकतात.

Modi Government | तयार राहा... ऑगस्टपर्यंत मोदी सरकार कोसळणार, बड्या नेत्याने केला दावा
pm modi. lalu prasad yadavImage Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Jul 05, 2024 | 7:53 PM
Share

दिल्लीतील मोदी सरकार अत्यंत कमकुवत आहे. हे सरकार ऑगस्टपर्यंत पडू शकते. हे लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनी निवडणुकीची तयारी ठेवावी. सत्तेच्या लालसेपोटी जेडीयूने आपल्या विचारसरणीशी तडजोड केली. RJD हा एकमेव असा पक्ष आहे ज्याने भाजपपुढे तडजोड केली नाही किंवा शरणागती पत्करली नाही. दिल्लीतील मोदी सरकार ऑगस्टपर्यंत पडू शकते. त्यामुळे कार्यकर्त्यांना सांगतो निवडणुकीची तयारी ठेवा. कारण निवडणुका कधीही होऊ शकतात, असा दावा RJD प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू यादव यांनी केला आहे. पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी हा मोठा दावा केला.

आरजेडी पक्षाच्या स्थापनादिनाच्या कार्यक्रमात खासदार तेजस्वी यादव यांनी भाजप आणि नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. सत्तेत असणे ही सर्वात मोठी गोष्ट नाही. आम्ही गरीब आणि वंचितांसाठी लढत आहोत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आमची मते 9 टक्क्यांनी वाढली आहे. तर, एनडीएच्या मतांची टक्केवारी 6 टक्क्यांनी कमी झाली आहे. आरजेडीला 4 जागा मिळाल्या आहेत. आम्ही आणखी जागा जिंकू शकलो असतो. मात्र, या निवडणुकीत आमच्या आघाडीने 9 जागा जिंकल्या आहेत असे ते म्हणाले.

राज्यातील नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर हल्लाबोल करताना तेजस्वी म्हणाले की, लोक म्हणतात की डबल इंजिनचे सरकार आहे. सुमारे 20 दिवसात 1 डझनहून अधिक पूल कोसळले आहेत. अनेक रेल्वे अपघात झाले आहेत. बिहारमध्ये गुन्हेगारी शिगेला पोहोचली आहे. पेपर फुटतोय. एवढे सगळे होऊनही डबल इंजिन सरकारचे लोक यावर बोलायला तयार नाहीत अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली.

तेजस्वी यादव पुढे म्हणाले, हे लोक बोलतात तेजस्वीने सर्व काही केले आहे. मुख्यमंत्री आणि भाजप नेत्यांना आव्हान देतो की, पडलेल्या पुलांच्या मंजुरी, टेंडर, पायाभरणी आणि उद्घाटनाची तारीख जाहीर करा. सर्व काही दुधाचे दूध आणि पाणी होईल, असे आव्हान त्यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांना दिले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.