AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘..तेव्हा संजय राऊत बाथरुममध्ये लपले होते’, नितेश राणेंचा हल्लाबोल

भाजपचा अंतकाळ जवळ आला आहे, अशी घणाघाती टीका आजच्या सामना अग्रलेखातून संजय राऊत यांनी केलीय. त्यावरुन भाजप आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांना थेट इशारा दिलाय. तसंच राऊतांवर जोरदार हल्लाही चढवला आहे.

'..तेव्हा संजय राऊत बाथरुममध्ये लपले होते', नितेश राणेंचा हल्लाबोल
...तर भाजप कार्यकर्त्याशी गाठ!
| Edited By: sagar joshi | Updated on: Aug 02, 2021 | 2:32 PM
Share

मुंबई : भाजप आणि प्रसाद लाड यांची सेनाभवन फोडण्याची भाषा आणि संजय राऊत यांच्या सामनातील अग्रलेखात भाजपमधील नेत्यांवर केलेली टीका, यावरुन राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असं जोरदार राजकारण आता रंगताना दिसत आहे. भाजपमध्ये उपऱ्यांना, बाटग्यांना स्थान नव्हतं. पण आता मूळ विचारांचे लोक भंगारात व बाटगे पालखीत बसवून त्यांना नाचवले जात आहे. त्यामुळेच या पक्षाचा अंतकाळ जवळ आला आहे, अशी घणाघाती टीका आजच्या सामना अग्रलेखातून संजय राऊत यांनी केलीय. त्यावरुन भाजप आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांना थेट इशारा दिलाय. तसंच राऊतांवर जोरदार हल्लाही चढवला आहे. (BJP MLA Nitesh Rane criticizes Shivsena MP Sanjay Raut)

संजय राऊत यांनी सामना अग्रलेखात अन्य पक्षातून भाजपमध्ये येणाऱ्यांसाठी बाटगे हा शब्द वापरल्यानं नितेश राणे यांनी राऊतांवर जोरदार निशाणा साधलाय. महामंडळं, पदं सगळ्या खास लोकांना. बाळासाहेबांचे निष्ठावंत दिसले नाहीत. बाटग्यांच्या माध्यमातून चालणारी शिवसेना आहे, असं प्रत्युत्तर नितेश राणे यांनी दिलंय. तसंच नारायण राणे यांनी सेना सोडली तेव्हा सामना समोरच्या सभेत संजय राऊत बाथरुममध्ये लपले होते. समोर आले तर ततपप होतं होतं आणि आता धमक्यांची भाषा वापरली जातेय. आम्ही खांद्यावर बंदूक ठेवत नाही. सेनाभवन आणि बाळासाहेबांबद्दल आदर आहे, अशा शब्दात नितेश राणे यांनी राऊतांवर हल्ला चढवलाय.

‘लोकप्रभामध्ये राऊतांनी बाळासाहेबांसाठी काय भाषा वापरली होती?’

लोकप्रभामध्ये असताना संजय राऊतांनी बाळासाहेबांसाठी काय भाषा वापरली होती ते पाहावं. नाहीतर मी पत्रकार परिषद घेऊन सांगतो की त्यांनी काय म्हटलं होतं. संजय राऊतांनी जेवढ्यास तेवढं राहावं नाहीतर कुंडली काढू, असा इशाराही नितेश राणेंनी दिलाय. शिवसेनेबद्दल आकस नाही. समोरुन टीका टिप्पणी होत असेल तर गप्प बसणार नाही. संजय राऊत हे शरद पवार यांचं काम करतात. त्यांना शिवसेनेशी काही देणंघेणं नाही, असा टोलाही त्यांनी लगावलाय.

‘आरे ला कारे करायला आम्ही मागेपुढे पाहणार नाही’

प्रसाद लाड यांच्याबद्दल बोलताना शाखाप्रमुख उत्तर देतील असं तुम्ही बोलता. मग कॉन्ट्रॅक्ट देताना हे शाखाप्रमुख कुठे जातात? त्यांना काय देता? असा खोचक सवालही नितेश राणे यांनी शिवसेनेला विचारलाय. मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना सोबत घेऊन न्याय देण्याचा प्रयत्न करावा. प्रसाद लाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे विषय संपलाय. आता मुंबईच्या समस्यांबाबत बोला. नाहीतर आरे ला कारे करायला आम्ही मागेपुढे पाहणार नाही, असा इशाराही नितेश राणे यांनी यावेळी दिलाय.

संबंधित बातम्या :

“भाजपमध्ये उपऱ्यांना स्थान नव्हतं, पण आता बाटगे पालखीत आणि मूळ लोक भंगारात, भाजपचा अंतकाळ जवळ आलाय”

“सेना भवनापर्यंत तुम्ही स्वतःच्या पायावर याल, पण जाताना कदाचित खांद्यावरच जावं लागेल, खांदेकरी घेऊन या”

BJP MLA Nitesh Rane criticizes Shivsena MP Sanjay Raut

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली