AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राणा जगजितसिंहांचं सलग तिसरं पत्र, म्हणाले, ‘मुख्यमंत्री होऊन 22 महिने झाले तरीही एक बैठक नाही’

भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सलग तिसरं पत्र लिहिलं आहे. तिसऱ्या पत्राच्या माध्यमातून त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्याच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेऊन मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली आहे.

राणा जगजितसिंहांचं सलग तिसरं पत्र, म्हणाले, 'मुख्यमंत्री होऊन 22 महिने झाले तरीही एक बैठक नाही'
राणा जगजितसिंह पाटील आणि उद्धव ठाकरे
| Edited By: Akshay Adhav | Updated on: Sep 18, 2021 | 11:49 AM
Share

मुंबई : भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सलग तिसरं पत्र लिहिलं आहे. तिसऱ्या पत्राच्या माध्यमातून त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्याच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेऊन मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली आहे. ‘मुख्यमंत्री होऊन 22 महिने उलटले तरी उस्मानाबाद जिल्ह्याच्या अति महत्वाच्या विषयांकडे ठाकरे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. आजवर जिल्ह्यातील विकास कामांबाबत आपण एकही व्यापक बैठक घेतलेली नाही’, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

उस्मानाबाद जिल्ह्याचे अनेक विषय प्रलंबित

शिवसेनेच्या मंत्री महोदयांकडे तांत्रिक कापड निर्मिती प्रकल्प (टेक्निकल टेक्स्टाईल पार्क), सोलापूर – तुळजापूर – उस्मानाबाद रेल्वे मार्ग, तुळजापूर शहराचा ‘प्रशाद’ योजनेत समावेश करणे, वॉटर ग्रीड, पीक विमा असे अनेक विषय प्रलंबितच आहेत, अशी तक्रारही त्यांनी पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यावर घोर अन्याय

रजाकारांपासून आम्हाला मुक्ती मिळून 73 वर्षे झाले व या मुक्ती संग्राम दिनी आपल्याला शुभेच्छा देत असताना उस्मानाबाद जिल्ह्यावर होत असेलल्या या घोर अन्यायाची जबाबदारी ठाकरे सरकारवरच असल्याचा घणाघात त्यांनी पत्रातून उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.

केंद्र सकारात्मक, राज्य सरकार सहकार्य करत नाही, ही भावना वेदनादायी

उस्मानाबाद जिल्ह्यावर अन्याय होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झालेली आहे. ‘आकांक्षीत’ जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्र सकारात्मक असताना आपलेच राज्य सरकार सहकार्य करत नाही ही भावना खूप वेदनादायी असल्याचं राणा जगजितसिंह पाटील यांनी पत्रातून म्हटलं आहे.

(BJP MLA Rana jagjeetSinh Patil Write a Letter to Cm Uddhav Thackeray Over osmanabad District probleam)

हे ही वाचा :

राणा जगजितसिंह पाटील मैदानात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सडेतोड पत्र

Follow Us
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री अभद्र कांड; धाड टाकताच...
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं