AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता 18 तास काम चालतं,आधी मात्र…; चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शिंदे-फडणवीस सरकारचं कौतुक करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका आहे. काय म्हणालेत पाहा...

आता 18 तास काम चालतं,आधी मात्र...; चंद्रशेखर बावनकुळे यांचा उद्धव ठाकरेंना टोला
| Edited By: | Updated on: Jan 03, 2023 | 1:21 PM
Share

भिवंडी : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शिंदे-फडणवीस सरकारचं (CM Eknath Shinde) कौतुक करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात सरकार 18 तास काम करतं. एक काळ होता की फक्त जेव्हा फेसबुकवर सरकार चालू होतं. 18 महिने मंत्रालयाने मुख्यमंत्री पाहिले नव्हतं, अशा शब्दात चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. ते भिवंडीत बोलत होते.

आमदारांच्या पत्रांवरही मुख्यमंत्री सह्या करत नव्हते. निर्णयांमध्ये सुसूत्रता नव्हती. दहीहंडीसाठी कोरोना होता, पण आयपीएलसाठी नव्हता. नागपूर अधिवेशनासाठी कोरोना होता, असंही सरकार महाराष्ट्राने पाहिलं आहे. आता मात्र जनतेच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहणारं सरकार सत्तेत आलं आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेपासून ग्रामपंचायतीपर्यंत महाराष्ट्रातली प्रत्येक निवडणूक आम्ही एकत्र लढू आणि जिंकूही. जिथे शिंदेंचे उमेदवार असतील तिथे आम्ही ताकदीने मदत करू. जिथे भाजपचे उमेदवार असतील तिथे शिंदे गट आमच्या पाठिशी उभा असेल, असं बावनकुळे म्हणाले आहेत.

एकीकडे डबल इंजिन सरकार आणि दुसरीकडे संघटनात्मक बांधणी करतोय. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे जनतेचं सरकार आहे. लोकांची कामं केली जात आहेत. मागच्या सरकारमध्ये फोडाफोडी करून सरपंच केले जात होते. अता थेट सरपंचपदाचा निर्णय घेताच भाजप आणि शिंदे गटाचे सरपंच निवडून आले, असंही बावनकुळे म्हणालेत.

पक्षाच्या वाढीसाठी विविध ठिकाणी दौरा करतोय. ठाणे जिल्हा ग्रामीणचा संघटनात्मक दौरा सध्या करतोय. राज्याचा 80 टक्के दौरा पूर्ण झाला आहे. जानेवारी अखेरपर्यंत उर्वरित दौरा पूर्ण होईल. आत्तापर्यंत 45 जिल्ह्यांचा प्रवास केला आहे. राज्यात 25 लाख युवा वॉरीअर्स काम करणार आहेत. महाराष्ट्रात केंद्राचे 7 कोटी लाभार्थी असून त्यापैकी 2 कोटी लाभार्थी मोदींजींना धन्यवाद म्हणून पत्र देणार आहेत. आत्तापर्यंत 35 लाख महिलांनी पत्रं दिली आहेत, अशी माहिती बावनकुळेंनी दिली आहे.

1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत मोफत धान्य देण्याची योजना सुरू झाली आहे. रेशनच्या दुकानात राज्यातील 7 कोटी 10 लाख नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे.13 कोटींच्या महाराष्ट्रात 7 कोटींना मोफत धान्य मिळणार आहे.हे जनतेसाठी काम करणारं हे सरकार आहे, असंही बावनकुळे म्हणालेत.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.