AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रजासत्ताक दिनी शिवभोजन थाळीचा शुभारंभ, कोणकोणत्या जिल्ह्यात शिवभोजन सुरु?

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ठाकरे सरकारच्या महत्त्वकांक्षी शिवभोजन थाळीचा अनेक ठिकाणी शुभारंभ करण्यात (Shiv Bhojan Thali Start) आला.

प्रजासत्ताक दिनी शिवभोजन थाळीचा शुभारंभ, कोणकोणत्या जिल्ह्यात शिवभोजन सुरु?
| Updated on: Jan 26, 2020 | 2:37 PM
Share

मुंबई : प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ठाकरे सरकारच्या महत्त्वकांक्षी शिवभोजन थाळीचा अनेक ठिकाणी शुभारंभ करण्यात (Shiv Bhojan Thali Start) आला. मुंबई उपनगर, पुणे, नाशिक, बुलडाणा, सोलापूर, वाशिम यांसह अनेक ठिकाणी शिवभोजन थाळी सुरु करण्यात आली. राज्यात जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात या योजनेचा शुभारंभ (Shiv Bhojan Thali Start) केला.

मुंबई उपनगरात आदित्य ठाकरेंच्या हस्ते शुभारंभ 

मुंबई उपनगरातील महसूल कर्मचारी उपहारगृहामध्ये नागरिकांसाठी शिवभोजन थाळी या योजनेचे उद्धाटन करण्यात आले. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते ही योजना सुरु करण्यात आली. यामुळे आता उपनगरातील नागरिकांना 10 रुपयांत सकस आहार मिळणार आहे.

पोटाला जात, पात, धर्म आणि आर्थिक स्थितीचे निकष न लावता सर्वांना स्वस्त आणि दर्जेदार आहार मिळावा हेच या योजनेचे उद्दिष्ट आहे असे ट्विट आदित्य ठाकरेंनी केलं आहे.

ठाण्यातही शिवभोजन थाळी सुरु

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यातील गोरगरीब जनतेला अल्पदरात म्हणजे केवळ 10 रुपयांत पोटभर जेवण उपलब्ध व्हावे या उद्देशाने सुरू केलेल्या शिवभोजन योजना सुरु करण्यात आली . ठाण्यातील लोकमान्य नगर आणि यशोधन नगर येथील केंद्रांचा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उद्घाटन करण्यात आले.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील मनीषा नगरमध्ये नागरिकांसाठी “शिवभोजन” योजनेचे उदघाटन केले. यावेळी त्यांनीही स्वतः भोजनाचा स्वाद घेतला. गरीब आणि गरजू जनतेला फक्त दहा रुपयात दर्जेदार आहार भेटावं. हेच आमच्या महाविकास आघाडी सरकारचे उद्दिष्ट आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“शिवभोजन”

होय हे आपलं सरकार आहे. pic.twitter.com/ql79SOcjWp

— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 26, 2020

पुण्यात दर दिवसाला 150 थाळी

पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या योजनेचा शुभारंभ केला. पुण्यात सामान्य माणसाला पोटभर जेवणासाठी ही योजना सुरु करण्यात आली. दर दिवसाला 100 ते 150 थाळी देण्यात येतील. यावेळी काही त्रुटी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र वेळोवेळी माहिती घेऊन यात सुधारणा करु असे अजित पवार म्हणाले.

पुण्यात शिवभोजन थाळीचे उद्धाटन केल्यानंतर काही मिनिटांतच जेवणासाठी नागरिकांनी रांग लावली. शिवभोजन योजनेला पहिल्या दिवशी चांगला (Shiv Bhojan Thali Start) प्रतिसाद मिळत आहे.

नाशिकमध्ये 4 शिवभोजन केंद्र

नाशिकमध्ये अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते शिवभोजन केंद्राचे उद्धाटन करण्यात आले. नाशिक शहरात एकूण 4 केंद्रात शिवभोजन थाळी मिळणार आहे. प्रत्येक केंद्रात एका दिवसात 150 गरजूंना भोजन मिळेल.

बीडमध्येही शिवभोजन योजनेचा शुभारंभ 

बीड जिल्ह्यात महाविकास आघाडी सरकारच्या शिवभोजन योजनेचा शुभारंभ केला. यामुळे 10 रुपयांत पौष्टीक जेवणाचा गोरगरीब जनेला पोटभर जेवण मिळणार आहे.

सोलापूर बस स्थानकात शिवभोजनालय कार्यालय

सोलापुरात पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शिव भोजनालयाचे उद्घाटन केले. सोलापूर बस स्थानकात शिव भोजनालय सुरु करण्यात आले. सर्वसामान्य जनता आणि गरजू लोकांसाठी हे शिव भोजनालय असल्याची प्रतिक्रिया दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

वाशिममध्ये पालकमंत्र्यांकडून थाळी वाटप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महत्त्वकांक्षी शिव भोजनालय उद्घाटन वाशिममध्ये करण्यात आले. वाशिमचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते हे उद्धाटन करण्यात आलं. पालकमंत्र्यांनी स्वतः लाभार्थ्यांना थाळी वाटप करून सर्वांचे मने जिंकली.

वाशिम मधील रेल्वे स्थानक परिसरात 125 थाळीचे शिवभोजनालय सुरु करण्यात आलं आहे. तर 100 थाळीचे जिल्हा ग्रामीण रुग्णालय परिसरात सुरू करणयात आलं आहे. याचा गोरगरीब जनतेला फायदा होईल अशी आशा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त (Shiv Bhojan Thali Start) केली.

सांगलीत शिवभोजन थाळी सुरु

सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी शिवभोजन थाळी सुरु करण्यात आली. सर्वसामान्य जनता आणि गरजू लोकांसाठी हे शिव भोजनालय सुरु करण्यात आलं आहे. यामुळे आता सर्वसामान्यांना 10 रुपयात थाळी मिळणार आहे.

वर्ध्यात दोन शिवभोजनालय

वर्धा शहरात जिल्हा सामान्य रुग्णालयात या योजनेला शुभारंभ करण्यात आलं आहे. रेल्वे स्थनाकासमोर 10 रुपयांत गरजूना जेवण मिळणार आहे. शहराच्या दोन्ही शिवभोजनालयात दररोज 100 लोकांना याचा लाभ देण्यात येणार आहे. राज्यात कुठलाही गरीब व्यक्ती उपाशी झोपता कामा नये या उद्देशाने ही योजना सुरु करण्यात आली आहे. ही योजना म्हणजे राज्य सरकारचा गोर गरिबांसाठी असलेला प्रेमाचा ओलावा असल्याचं मत पालकमंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केलं आहे.

Follow Us
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.