AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : ‘शिंदेसाहेबांच्या मनात जराही कुठे असं नाही की उद्धव ठाकरेंना दुखवावं, शिवसेनेतून बाहेर पडावं’

Uddhav Thackeray : "आघाडी करायची की युती करायची, हाच एक प्रश्न आहे. मी आणखी एक खुलं पत्र लिहिणार आहे", अशी माहिती दीपक केसरकरांनी दिली.

Eknath Shinde : 'शिंदेसाहेबांच्या मनात जराही कुठे असं नाही की उद्धव ठाकरेंना दुखवावं, शिवसेनेतून बाहेर पडावं'
Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Jun 28, 2022 | 8:53 AM
Share

मुंबई : सध्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात सुरू असलेला वाद चांगलाच चिघळलाय. शिवसेनेतील अंतर्गत बंडाने कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.  हा वाद विकोपाला गेला असतानाच शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी एक महत्वाचं विधान केलंय. ‘शिंदेसाहेबांच्या मनात जराही कुठे असं नाही की उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) दुखवावं, शिवसेनेतून बाहेर पडावं’, असं दीपक केसरकर यांनी म्हटलंय. “राज्यपालांना पत्र देण्याबाबत आम्ही विधिज्ञांना विचारुन मग पुढील प्रक्रिया करणार आहोत. मला वाटतं जे काही अविश्वास वगैरे असतो, त्याला कोणतीही बंदी न्यायालयाने केलेली नाही. पाठींबा काढून घेतल्यानं राज्यपालांना आम्ही कळवलं, तर राज्यपालांना अधिवेशन बोलवावं लागले” असं दीपक केसरकर म्हणाले आहेत. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

“शिंदेसाहेबांच्या मनात…”

“आमच्याशी चर्चा करुन काय होणार आहे? आमचे जे मित्र पक्ष आहेत, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. आम्ही का दुखावलो गेलो, यावर त्यांनी चर्चा करावी. त्यांनी चर्चा करावी. चर्चा त्यांची जेव्हा होईल, त्यात सकारात्मक काही निघालं की पुढे शिंदेसाहेबांना सांगितलं की ते शिंदेसाहेब स्वतःहून पुढे येतील. शिंदेसाहेबांच्या मनात कुठेही असं नाहीये की उद्धव ठाकरेंना दुखवावं, शिवसेनेतून बाहेर पडावं”, असं दीपक केसरकर  म्हणालेत.

“शिंदे साहेबांशी माझी बोलणं झालेलं नाही. याबाबत जाहीर चर्चा करता येत नाही. निर्णय घेतल्यानंतर अंमलबजावणी केली जाते. व्हिडीओ टाकणं, लोकांना प्रेशरराईज करणं, हे सगळं चाललंय. थोडासा आम्हाला वेळ दिला पाहिजे. आम्ही ठरवू आणि मग अंमलबजावणी करुन. मी जाहीर पत्र कालच लिहिलंय. आता निर्णय त्यांनी घ्यायचाय. उद्धव ठाकरेंनी आमच्या पत्राचा विचार करायचाय. ते मोठे नेते आहेत. त्यांनी योग्य निर्णय घ्यावा”,  असंही केसरकर म्हणाले आहेत.

“आघाडी करायची की युती करायची, हाच एक प्रश्न आहे. मी आणखी एक खुलं पत्र लिहिणार आहे”, अशी माहितीही केसरकरांनी दिली.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.