AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : ‘शिंदेसाहेबांच्या मनात जराही कुठे असं नाही की उद्धव ठाकरेंना दुखवावं, शिवसेनेतून बाहेर पडावं’

Uddhav Thackeray : "आघाडी करायची की युती करायची, हाच एक प्रश्न आहे. मी आणखी एक खुलं पत्र लिहिणार आहे", अशी माहिती दीपक केसरकरांनी दिली.

Eknath Shinde : 'शिंदेसाहेबांच्या मनात जराही कुठे असं नाही की उद्धव ठाकरेंना दुखवावं, शिवसेनेतून बाहेर पडावं'
Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Jun 28, 2022 | 8:53 AM
Share

मुंबई : सध्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात सुरू असलेला वाद चांगलाच चिघळलाय. शिवसेनेतील अंतर्गत बंडाने कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.  हा वाद विकोपाला गेला असतानाच शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी एक महत्वाचं विधान केलंय. ‘शिंदेसाहेबांच्या मनात जराही कुठे असं नाही की उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) दुखवावं, शिवसेनेतून बाहेर पडावं’, असं दीपक केसरकर यांनी म्हटलंय. “राज्यपालांना पत्र देण्याबाबत आम्ही विधिज्ञांना विचारुन मग पुढील प्रक्रिया करणार आहोत. मला वाटतं जे काही अविश्वास वगैरे असतो, त्याला कोणतीही बंदी न्यायालयाने केलेली नाही. पाठींबा काढून घेतल्यानं राज्यपालांना आम्ही कळवलं, तर राज्यपालांना अधिवेशन बोलवावं लागले” असं दीपक केसरकर म्हणाले आहेत. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

“शिंदेसाहेबांच्या मनात…”

“आमच्याशी चर्चा करुन काय होणार आहे? आमचे जे मित्र पक्ष आहेत, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. आम्ही का दुखावलो गेलो, यावर त्यांनी चर्चा करावी. त्यांनी चर्चा करावी. चर्चा त्यांची जेव्हा होईल, त्यात सकारात्मक काही निघालं की पुढे शिंदेसाहेबांना सांगितलं की ते शिंदेसाहेब स्वतःहून पुढे येतील. शिंदेसाहेबांच्या मनात कुठेही असं नाहीये की उद्धव ठाकरेंना दुखवावं, शिवसेनेतून बाहेर पडावं”, असं दीपक केसरकर  म्हणालेत.

“शिंदे साहेबांशी माझी बोलणं झालेलं नाही. याबाबत जाहीर चर्चा करता येत नाही. निर्णय घेतल्यानंतर अंमलबजावणी केली जाते. व्हिडीओ टाकणं, लोकांना प्रेशरराईज करणं, हे सगळं चाललंय. थोडासा आम्हाला वेळ दिला पाहिजे. आम्ही ठरवू आणि मग अंमलबजावणी करुन. मी जाहीर पत्र कालच लिहिलंय. आता निर्णय त्यांनी घ्यायचाय. उद्धव ठाकरेंनी आमच्या पत्राचा विचार करायचाय. ते मोठे नेते आहेत. त्यांनी योग्य निर्णय घ्यावा”,  असंही केसरकर म्हणाले आहेत.

“आघाडी करायची की युती करायची, हाच एक प्रश्न आहे. मी आणखी एक खुलं पत्र लिहिणार आहे”, अशी माहितीही केसरकरांनी दिली.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.