AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : ‘शिंदेसाहेबांच्या मनात जराही कुठे असं नाही की उद्धव ठाकरेंना दुखवावं, शिवसेनेतून बाहेर पडावं’

Uddhav Thackeray : "आघाडी करायची की युती करायची, हाच एक प्रश्न आहे. मी आणखी एक खुलं पत्र लिहिणार आहे", अशी माहिती दीपक केसरकरांनी दिली.

Eknath Shinde : 'शिंदेसाहेबांच्या मनात जराही कुठे असं नाही की उद्धव ठाकरेंना दुखवावं, शिवसेनेतून बाहेर पडावं'
Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Jun 28, 2022 | 8:53 AM
Share

मुंबई : सध्या उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यात सुरू असलेला वाद चांगलाच चिघळलाय. शिवसेनेतील अंतर्गत बंडाने कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.  हा वाद विकोपाला गेला असतानाच शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी एक महत्वाचं विधान केलंय. ‘शिंदेसाहेबांच्या मनात जराही कुठे असं नाही की उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) दुखवावं, शिवसेनेतून बाहेर पडावं’, असं दीपक केसरकर यांनी म्हटलंय. “राज्यपालांना पत्र देण्याबाबत आम्ही विधिज्ञांना विचारुन मग पुढील प्रक्रिया करणार आहोत. मला वाटतं जे काही अविश्वास वगैरे असतो, त्याला कोणतीही बंदी न्यायालयाने केलेली नाही. पाठींबा काढून घेतल्यानं राज्यपालांना आम्ही कळवलं, तर राज्यपालांना अधिवेशन बोलवावं लागले” असं दीपक केसरकर म्हणाले आहेत. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

“शिंदेसाहेबांच्या मनात…”

“आमच्याशी चर्चा करुन काय होणार आहे? आमचे जे मित्र पक्ष आहेत, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. आम्ही का दुखावलो गेलो, यावर त्यांनी चर्चा करावी. त्यांनी चर्चा करावी. चर्चा त्यांची जेव्हा होईल, त्यात सकारात्मक काही निघालं की पुढे शिंदेसाहेबांना सांगितलं की ते शिंदेसाहेब स्वतःहून पुढे येतील. शिंदेसाहेबांच्या मनात कुठेही असं नाहीये की उद्धव ठाकरेंना दुखवावं, शिवसेनेतून बाहेर पडावं”, असं दीपक केसरकर  म्हणालेत.

“शिंदे साहेबांशी माझी बोलणं झालेलं नाही. याबाबत जाहीर चर्चा करता येत नाही. निर्णय घेतल्यानंतर अंमलबजावणी केली जाते. व्हिडीओ टाकणं, लोकांना प्रेशरराईज करणं, हे सगळं चाललंय. थोडासा आम्हाला वेळ दिला पाहिजे. आम्ही ठरवू आणि मग अंमलबजावणी करुन. मी जाहीर पत्र कालच लिहिलंय. आता निर्णय त्यांनी घ्यायचाय. उद्धव ठाकरेंनी आमच्या पत्राचा विचार करायचाय. ते मोठे नेते आहेत. त्यांनी योग्य निर्णय घ्यावा”,  असंही केसरकर म्हणाले आहेत.

“आघाडी करायची की युती करायची, हाच एक प्रश्न आहे. मी आणखी एक खुलं पत्र लिहिणार आहे”, अशी माहितीही केसरकरांनी दिली.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...