AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणूक प्रक्रियेवर पवारांनी शंका घेतली, आता फडणवीसांची खरपूस टीका, म्हणाले राहुल गांधींना भेटल्याचे…

शरद पवार साहेबांना राहुल गांधींना भेटल्यावरच अशा प्रकारची आठवण का आली? इतके दिवस ते बोलले नाहीत आणि आज अचानक बोलले? राहुल गांधी जसे सलीम-जावेदच्या यांच्यासारख्या काल्पनिक कहाण्या तयार करतात तशा प्रकारची अवस्था पवार साहेबांची तर झाली नाही ना, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

निवडणूक प्रक्रियेवर पवारांनी शंका घेतली, आता फडणवीसांची खरपूस टीका, म्हणाले राहुल गांधींना भेटल्याचे...
sharad pawar and devendra fadnavis
| Updated on: Aug 09, 2025 | 3:33 PM
Share

Devendra Fadnavsi : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रासह इतरही राज्यांत निवडणुकीत घोळ झाला आहे, असा आरोप केला आहे. हे आरोप करताना त्यांनी काही पुरावेही सादर केले आहेत. त्यांच्या आरोपांनंतर आता खासदार शरद पवार यांनीदेखील या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केलीय. दोन माणसांनी मला आम्ही तुमच्या 160 जागा निवडून आणून देऊ. ते मला मतांमध्ये फेरफार करण्याबाबत सांगत होते, असा खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. आता शरद पवार यांच्या मोठ्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधींना भेटण्याचा हा परिणाम आहे, असं वाटतंय, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे. तसेच त्यांनी शरद पावर यांचे नाव घेत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

हा राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम

शरद पवार साहेबांना राहुल गांधींना भेटल्यावरच अशा प्रकारची आठवण का आली? इतके दिवस ते बोलले नाहीत आणि आज अचानक बोलले? राहुल गांधी जसे सलीम-जावेदच्या यांच्यासारख्या काल्पनिक कहाण्या तयार करतात तशा प्रकारची अवस्था पवार साहेबांची तर झाली नाही ना, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. तसेच राहुल गांधी सध्या ईव्हीएमवर बोलत होते. तरी शरद पवार त्यावर बोलत नव्हते. पवार साहेबांनी अनेकवेळा स्पष्टपणे भूमिका घेतली की ईव्हीएमला दोष देण हे अयोग्य आहे. आता अचानक अशाप्रकारे पवार साहेब बोलले आहेत. हा राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतोय, असा टोलाही त्यांनी लगावलाय.

शपथपत्र मागितलं तर तुम्ही का देत नाही?

कितीही संभ्रम निर्माण केला तरी ही भारतात ज्या पद्धतीने स्वतंत्र निवडणुका होतात, त्या इतरत्र कुठेही होत नाही. हे सर्वांनाच माहिती आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही सर्व मंडळी जनतेत बोलतात. पण निवडणूक आयोगाने बोलावल्यावर कोणीही जात नाही, अशी टीका फडणवीस यांनी शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यावर केली. राहुल गांधी निवडणूक आयोगासमोर शपथपत्र द्यायला तयार नाहीत. राहुल गांधी सांगतात की आम्ही संसदेत शपथ घेतली आहे. शपथपत्र मागितलं तर तुम्ही का देत नाही? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केलाय. तसेच ते खोटं बोलत आहेत. खोटं पकडलं गेलं आणि ते शपथपत्रावर दिलं तर उद्या तुमच्यावर त्या ठिकाणी फौजदारी कारवाई होऊ शकते. म्हणूनच रोज खोटं बोलायचं आणि पळून जायचं असे हे पळपुटे लोक आहेत, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

दरम्यान, आता शरद पवार यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता भविष्यात या विषयावर नेमकं काय घडणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.