AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थिल्लरबाजी करणं मुख्यमंत्र्यांना शोभत नाही, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर थेट निशाणा

केंद्राने कुठलेही पैसे अडवलेले नाहीत, तुमचाच जीएसटी कमी आला. तो केंद्र सरकार स्वतः कर्ज काढून भरुन देत आहे" असा दावाही फडणवीसांनी केला.

थिल्लरबाजी करणं मुख्यमंत्र्यांना शोभत नाही, देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर थेट निशाणा
| Updated on: Oct 19, 2020 | 6:41 PM
Share

माढा : थिल्लरबाजी करणं मुख्यमंत्र्यांना शोभत नाही, पहिल्यांदा त्यांनी काय मदत करणार हे सांगितलं पाहिजे. कोणती मदत करायचा तुमच्यात दम नाही का? असा घणाघात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. केंद्र सरकारकडे मदत मागितल्यास बिघडतं कुठे? असा सवाल उद्धव ठाकरेंनी सोलापूर दौऱ्यात विचारल्यानंतर फडणवीसांचा संताप पाहायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट लडाखला जातात, तिथे कोणीच जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी उगाच कोणाशी तुलना करु नये, असंही फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना सुनावलं. (Devendra Fadnavis slams Uddhav Thackeray in Solapur Rain affected Farmer Visit)

“नुकसानग्रस्तांना काय मदत करणार, हे मुख्यमंत्र्यांनी सांगणं अपेक्षित आहे. परंतु अशा प्रकारची थिल्लरबाजी, थिल्लरबाजीशिवाय मी दुसरं काही म्हणणार नाही. अशा प्रकारची थिल्लरबाजी करणं मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. मुख्यमंत्र्यांना माहित नसेल, मोदीजी तर थेट लडाखला जातात, तिथे कोणीच जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी उगाच कोणाशी तुलना करु नये. आज ते (मुख्यमंत्री) थोडक्याकरता बाहेर पडलेत, दोन तीन तासांचा प्रवास केलाय, मोठी गोष्ट आहे. गावकऱ्यांनी काय रिस्पॉन्स दिला त्यांनी पाहिलेलं आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा : रस्ता वाहून गेला, गाडी जाण्यास मार्ग नाही, चिखल-गाळ तुडवत फडणवीस नुकसानग्रस्तांच्या भेटीला

“मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा काय मदत करणार हे सांगितलं पाहिजे. मोदीजी मदत करतीलच, ते करतच आले आहेत. मोदींनी स्वतः मुख्यमंत्र्यांना फोन केला आणि सांगितलं आम्ही तुम्हाला काय हवी ती मदत देऊ. इतक्या गंभीर दौऱ्यात असं थिल्लर वक्तव्य करणं शोभत नाही. केंद्राने कुठलेही पैसे अडवलेले नाहीत, तुमचाच जीएसटी कमी आला. तो केंद्र सरकार स्वतः कर्ज काढून भरुन देत आहे” असा दावाही फडणवीसांनी केला.

“फक्त टोलवाटोलवी करायची.. काही आलं की केंद्रावर फेका, इथे फेका तिथे फेका. तुमच्यात दम नाही का कोणती मदत करायचा? आम्ही मागच्या वेळी दहा हजार कोटींची मदत केली. सांगितलं, केंद्राची मदत येईल तेव्हा येईल. हिमतीने काम करावं लागतं. यांना मदतच करायची नाहीये, म्हणून केंद्राकडे बोट, याच्याकडे बोट. एक लाख 20 हजार रुपयांचं कर्ज काढण्याची क्षमता तुम्हाला दिली आहे, का नाही काढत? मला फायनान्स समजतो, त्यांनी लोकांची दिशाभूल करु नये. महाराष्ट्राने फक्त 50 हजार कोटींचं कर्ज काढलंय. अजून 70 हजार कोटींचं कर्ज काढण्याची क्षमता बाकी आहे. मदत काय करणार ते सांगा, कारणं देऊ नका” असा जाब देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला विचारला.

पाहा व्हिडीओ : (Devendra Fadnavis slams Uddhav Thackeray in Solapur Rain affected Farmer Visit)

संबंधित बातम्या :

बिहारमध्ये प्रचार करण्यापेक्षा स्वत:च्या राज्यासाठी आधी काम करा : उद्धव ठाकरे

मदत मागितली बिघडलं कुठं?; केंद्रातील सरकार हे परदेशातील सरकार नाही; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

(Devendra Fadnavis slams Uddhav Thackeray in Solapur Rain affected Farmer Visit)

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.