Devendra Fadnavis : संजय राऊतांना आता तरी समज आली पाहिजे, सेन्सिबल माणसाविषयी विचारा; फडणवीस यांचा टोला

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत एकटेच आले आहेत. गेल्या पंधरा दिवसातील हा त्यांचा तिसरा दिल्ली दौरा आहे. यापूर्वी ते दोनदा दिल्लीत आले होते. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यावेळी मात्र ते एकटेच दिल्लीत आले आहेत.

Devendra Fadnavis : संजय राऊतांना आता तरी समज आली पाहिजे, सेन्सिबल माणसाविषयी विचारा; फडणवीस यांचा टोला
संजय राऊतांबद्दल काय विचारता? सेन्सिबल माणसाविषयी विचारा; फडणवीस यांचा टोलाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 24, 2022 | 1:00 PM

नवी दिल्ली: विरोधकांचं कामच असतं टीका करणं. त्यांच्या असंवेदनशीलतेमुळेच ही परिस्थिती आली आहे. आम्ही परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतोय नक्कीच करतो. संजय राऊतांना (sanjay raut) आता तरी समज आली पाहिजे. काय त्यांनी पक्षाची अवस्था करून टाकलीय. तुम्ही मला कशाला त्यांच्याबद्दल विचारता? सेन्सिबल माणसाबद्दल विचारा, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत आले आहेत. यावेळी ते मीडियाशी संवाद साधत होते. फडणवीस यांचा हा दिल्लीतील गेल्या पंधरा दिवसातील तिसरा दौरा आहे. या दौऱ्यात फडणवीस भाजपच्या (bjp) अनेक ज्येष्ठ नेत्यांना भेटणार असल्याचं सांगितलं जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारावर या दौऱ्यात चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे फडणवीस यांच्या या दिल्ली दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

24 दिवसात 89 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात सरकारला अपयश आलं आहे. मंत्रिमंडळ विस्तार केला जात नाही. त्यामुळे जनतेची आणि शेतकऱ्यांची अनेक कामे रखडली आहेत. त्याबाबत फडणवीस यांना विचारण्यात आलं असता विरोधकांचे काम आहे टीका करणे. त्यांच्या असंवेदनशीलतीमुळे ही परिस्थिती आली आहे, असं फडणवीस म्हणाले. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत लवकरच निर्णय होईल, काळजी करू नका, असंही ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

बदल होत असतात, त्यात नवीन काय?

राजकारणात बदल होत आहेत. सत्ताकारण होत आहे, असं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं होतं. त्यावर राजकारणात बदल तर होतच असतात. त्यात नवीन काय? असा सवाल फडणवीस यांनी केला.

फडणवीस एकटेच दिल्लीत

देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत एकटेच आले आहेत. गेल्या पंधरा दिवसातील हा त्यांचा तिसरा दिल्ली दौरा आहे. यापूर्वी ते दोनदा दिल्लीत आले होते. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यावेळी मात्र ते एकटेच दिल्लीत आले आहेत. त्यामुळे दिल्लीत पक्षाच्या नेत्यांशी त्यांची महत्त्वाची चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या भेटीत राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा होणार आहे. तसेच कुणाला कोणती खाती द्यायची यावरही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या दौऱ्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

राऊतांचं आव्हान

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज सकाळीच फडणवीसांना आव्हान दिलं होतं. तुम्ही माझ्यावर कोणत्याही तपास यंत्रणांच्या माध्यमातून कारवाई करा. मी घाबरणार नाही. प्रत्येक गोष्टीला सामोरे जाईल, असं सांगतानाच तुमचे सर्व कारनामे मला माहीत आहेत, असा इशाराच राऊत यांनी दिला होता.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.