AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : संजय राऊतांना आता तरी समज आली पाहिजे, सेन्सिबल माणसाविषयी विचारा; फडणवीस यांचा टोला

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत एकटेच आले आहेत. गेल्या पंधरा दिवसातील हा त्यांचा तिसरा दिल्ली दौरा आहे. यापूर्वी ते दोनदा दिल्लीत आले होते. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यावेळी मात्र ते एकटेच दिल्लीत आले आहेत.

Devendra Fadnavis : संजय राऊतांना आता तरी समज आली पाहिजे, सेन्सिबल माणसाविषयी विचारा; फडणवीस यांचा टोला
संजय राऊतांबद्दल काय विचारता? सेन्सिबल माणसाविषयी विचारा; फडणवीस यांचा टोलाImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jul 24, 2022 | 1:00 PM
Share

नवी दिल्ली: विरोधकांचं कामच असतं टीका करणं. त्यांच्या असंवेदनशीलतेमुळेच ही परिस्थिती आली आहे. आम्ही परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतोय नक्कीच करतो. संजय राऊतांना (sanjay raut) आता तरी समज आली पाहिजे. काय त्यांनी पक्षाची अवस्था करून टाकलीय. तुम्ही मला कशाला त्यांच्याबद्दल विचारता? सेन्सिबल माणसाबद्दल विचारा, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत आले आहेत. यावेळी ते मीडियाशी संवाद साधत होते. फडणवीस यांचा हा दिल्लीतील गेल्या पंधरा दिवसातील तिसरा दौरा आहे. या दौऱ्यात फडणवीस भाजपच्या (bjp) अनेक ज्येष्ठ नेत्यांना भेटणार असल्याचं सांगितलं जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारावर या दौऱ्यात चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे फडणवीस यांच्या या दिल्ली दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

24 दिवसात 89 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात सरकारला अपयश आलं आहे. मंत्रिमंडळ विस्तार केला जात नाही. त्यामुळे जनतेची आणि शेतकऱ्यांची अनेक कामे रखडली आहेत. त्याबाबत फडणवीस यांना विचारण्यात आलं असता विरोधकांचे काम आहे टीका करणे. त्यांच्या असंवेदनशीलतीमुळे ही परिस्थिती आली आहे, असं फडणवीस म्हणाले. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत लवकरच निर्णय होईल, काळजी करू नका, असंही ते म्हणाले.

बदल होत असतात, त्यात नवीन काय?

राजकारणात बदल होत आहेत. सत्ताकारण होत आहे, असं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं होतं. त्यावर राजकारणात बदल तर होतच असतात. त्यात नवीन काय? असा सवाल फडणवीस यांनी केला.

फडणवीस एकटेच दिल्लीत

देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत एकटेच आले आहेत. गेल्या पंधरा दिवसातील हा त्यांचा तिसरा दिल्ली दौरा आहे. यापूर्वी ते दोनदा दिल्लीत आले होते. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यावेळी मात्र ते एकटेच दिल्लीत आले आहेत. त्यामुळे दिल्लीत पक्षाच्या नेत्यांशी त्यांची महत्त्वाची चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या भेटीत राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा होणार आहे. तसेच कुणाला कोणती खाती द्यायची यावरही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या दौऱ्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

राऊतांचं आव्हान

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज सकाळीच फडणवीसांना आव्हान दिलं होतं. तुम्ही माझ्यावर कोणत्याही तपास यंत्रणांच्या माध्यमातून कारवाई करा. मी घाबरणार नाही. प्रत्येक गोष्टीला सामोरे जाईल, असं सांगतानाच तुमचे सर्व कारनामे मला माहीत आहेत, असा इशाराच राऊत यांनी दिला होता.

Follow Us
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.