AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदे यांनी एका वाक्यात उद्धव ठाकरेंना फटकारलं, म्हणाले, त्यांची ती सवयच…

Shivsena : सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पाठिंबा दिला आहे. यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी एका वाक्यात उद्धव ठाकरेंना फटकारलं, म्हणाले, त्यांची ती सवयच...
Eknath Shinde and Uddhav ThackerayImage Credit source: Google
| Updated on: Jul 14, 2026 | 3:07 PM
Share

दिल्लीतील जंतर मंतरवर सोनम वांगचूक हे उपोषणाला बसले आहे. वांगचूक यांच्या या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पाठिंबा दिला आहे. यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. शिंदे यांनी म्हटले की, ‘आता हे उशिरा सुचलेलं शहाणपण म्हणावं लागेल, त्यांचा नेहमीच सर्वांना बाहेरून पाठिंबा असतो, घरातून पाठिंबा असतो. तुम लढो हम कपडा संभालते है, अशी त्यांची सवय आहे. एक म्हण आहे, बुडाला जळतय आणि डोंगरावर आग विझवण्यासाठी पळत आहे अशी उबाठाची अशी अवस्था झाली आहे. सोनम वांगचूक यांचं जे आंदोलन आहे, जेव्हा जेव्हा असे सरकारविरोधात आंदोलन असते, त्यांना यांचा पाठिंबा असतो. श्रीलंका, नेपाळ, बांगलादेशात लोक रस्त्यावर उतरले होते अशी मुद्दाम उबाठाचे लोक नेहमी आठवण करून देत आहेत.’

राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न

पुढे बोलताना शिंदे म्हणाले की, ‘उबाठाच्या लोकांना आता वाटत आहे की, हे जे देशव्यापी विद्यार्थ्यांच आंदोलन सुरू आहे, त्यात आपली पोळी कशी भाजून घेता येईल, अशाप्रकारचे खालच्या थराच राजकारण करण्याचा हेतू त्यांचा आहे. देशामध्ये आणि राज्यामध्ये अराजकता कशी पसरेल, कायदा सुव्यवस्था कशी पसरेल आणि लोक रस्त्यावर येऊन आंदोलने कशी करतील अशा भ्रमामध्ये ही सगळी मंडळी आहे. खरं म्हणजे बांग्लादेश, नेपाळमध्ये अर्थव्यवस्था कोलमडलेली होती, लोकांचे खायचे हाल होते, मात्र आपला देश मोदींजींच्या नेतृत्वात प्रगती करत आहे, अनेकांना मोफत धान्य दिले जात आहे. 32 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणण्याचे काम या सरकारने केले आहे. हा त्या देशांमध्ये आणि आपल्या देशात फरक आहे.’

युवा वर्ग मोदींच्या बाजूने…

एकनाथ शिंदे यांनी पुढे म्हटले की, ‘2014 पूर्वी झालेले घोटाळे युवा वर्गाने पाहिलेले आहेत, त्यामुळे युवक आजपर्यंत मोदींसोबत आहे. या काळात झालेली देशाची प्रगती तो पाहत आहे. युवकांना काम मिळत आहे, युवक मोदींच्या सोबत आहे. त्यामुळे यांच्या मनात जे आहे, देशात अराजकता पसरली पाहिजे, देशात कायदा सुव्यवस्था बिघडली पाहिजे, यासाठी हे लोकांना भडकवण्याचे काम करत आहेत. परंतू त्यांच्या प्रयत्नांना यश कधीच येणार नाही. कारण या देशाला आणि राज्याला एक संस्कृती आहे, हा एक केविलवाणा प्रयत्न आहेत.

बाळासाहेबांचे विचार सुटले तेव्हाच…

पुढे एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, ‘आधी हनुमान चालिसा पठण करणाऱ्यांना जेलमध्ये टाकले, आता रामरक्षा आंदोलन करत आहेत. आता त्यांना कळलं आहे, जो राम का नही, म्हणून रामरक्षा आंदोलन करण्यात येत आहे. मी एवढंच सांगतो की, त्यांनी कितीही हिंदुत्वाचा आव आणला तरी त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले तेव्हाच हिंदुत्व सुटलेलं आहे.’

Follow Us
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य
हनुमंताचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी सुरू केले उपोषण; मागण्या न मान्य झाल्यास...
कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर टीका...
Sanjay Raut | कुंभमेळ्यातील भ्रष्टाचारावर साधूसंतही नाराज; राऊतांची सरकारवर सडकून टीका
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय...
मनोज जरांगे पाटलांचं आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण; राजकीय घडामोडींना वेग
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला थेट इशारा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचे निर्णायक उपोषण. सरकारला दिला थेट इशारा
NTA मध्ये मोठा फेरबदल, IPS रवी कुमार सिंह यांची NTA संचालकपदी नियुक्ती
NTA मध्ये मोठा फेरबदल: आयपीएस रवी कुमार सिंह यांच्यासह तीन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती
'हिम्मत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'- गंगाधर काळकुटे
Gangadhar Kalkute on Gunratna Sadavarte : काळकुटेंचं सदावर्तेंना आव्हान, 'हिंमत असेल तर पोलीस संरक्षणाशिवाय फिरा'
राजीनामा द्या, आदिवासी आंदोलक अन् अशोक उईकेंमध्ये खडाजंगी
नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचा मंत्री अशोक उईकेंविरोधात एल्गार: राजीनाम्याची मागणी
रियाज पठाण हत्या प्रकरणात 13 वर्षांनी निकाल
अहिल्यानगर: रियाज पठाण हत्या प्रकरणात 13 वर्षांनी निकाल, सात आरोपींना जन्मठेप
मराठा आरक्षणावर ठाम भूमिका: निर्णायक आंदोलनाचे आवाहन
मराठा आरक्षणासाठी अंतिम आंदोलनाची घोषणा
वर्षावर जाणारच, मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई
'वर्षा'वर तर जाणारच, जरांगेंचा थेट इशारा