AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दादा भुसे स्वतःला शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणतात, मग शेतकऱ्यांना तात्काळ मदत का नाही? : बबनराव लोणीकर

मराठवाड्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे.

दादा भुसे स्वतःला शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणतात, मग शेतकऱ्यांना तात्काळ मदत का नाही? : बबनराव लोणीकर
| Updated on: Sep 27, 2020 | 5:29 PM
Share

जालना : मराठवाड्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा (Babanrao Lonikar Criticize Mahaviakas Aghadi), अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे. तसेच, शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार मदत जाहीर करावी, अशीही मागणी लोणीकरांनी केली आहे. मुख्यमंत्री आणि राज्यपालांकडे त्यांनी पत्राद्वारे ही मागणी केली आहे. कृषी मंत्री दादासाहेब भुसे हे स्वतःला शिवसेनेचे ढाण्यावाघ असल्याचे म्हणतात, मग ते शेतकऱ्यांना तात्काळ मदत का करु शकत नाही, असा सवालही लोणीकरांनी विचारला आहे (Babanrao Lonikar Criticize Mahaviakas Aghadi).

शेतकरीवर्गाने पीक विमा भरला, आता प्रचंड प्रमाणात पाऊस झाला आहे. शेतात पाणी साचलं आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पीक विमा कंपन्यांकडे मणूष्यबळ नाही. जालन्यात रिलायन्स पीक विमा कंपन्यांचे फक्त तीन कर्मचारी आहेत. ते कसे काय संपूर्ण जिल्ह्यातील शेतीची पाहणी करणार आणि पंचनामे करणार, असा प्रश्न लोणीकर यांनी विचारला आहे.

राज्याचे ऊर्जामंत्री यांनी महाराष्ट्रातल्या लोकांना दिलासा देण्यासाठी घोषणा केली होती. कोरोनाच्या काळातील वीजबिल माफ करु, राज्यातल्या शेतकऱ्यांना छोट्या व्यापाऱ्यांना, सर्वसामान्यांना या संकटाच्या काळात मोफत विजेची घोषणा केली होती. हवेत गोळीबार केला, पण तो फुसकाबार निघाल्याची टीका माजी मंत्री लोणीकरांनी केली (Babanrao Lonikar Criticize Mahaviakas Aghadi).

राऊत साहेबांनी केलेली घोषणा त्याची अंमलबजावणी झालीच नाही, अर्थमंत्र्यांनी त्यांचा प्रश्न मान्य केला नाही. वीजबिल खूप येत आहे, संपूर्ण वीजबिल माफ करण्या0त यावे, असे देखील लोनिकरांनी म्हटलं. ओला दुष्काळ जाहीर झाला की, आपोआप वीजबिल माफ होऊ शकतं. शेतकरी असो की सामान्य नागरिक असो, यांचे वीजबिल सरकारने माफ करणे आवश्यक असल्याचं मत लोणीकर यांनी म्हटलं.

संजय राऊत आणि फडणवीसांच्या भेटीवर लोणीकर काय म्हणाले?

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची दोन अडीच तासाची झालेली भेट ही कशासाठी होती, हे तेच सांगू शकतील, अस माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितलं. परंतु राज्यात भाजपा आणि शिवसेना तीस वर्ष एकत्र होती. आज आम्ही जरी वेगळे असलो, तरी शेवटी 30 वर्ष एकत्र काम केलेले आहे. आम्ही शिवसेनेसोबत हिंदुत्त्वाच्या मुद्यावर आमची युती होती. वर्षभरात ते कधी एकत्र कदाचित ते बसले नसतील आणि काही मुद्यावर त्याची बैठक होऊन चर्चा झाली. ही भेट सामनाच्या मुलाखतीसाठी होती. परंतू विरोधी पक्षनेते एकमेकांच्या घरी जातात स्नेहभोजन घेतात, महाराष्ट्राची ही परंपरा आहे. मात्र संजय राऊत आणि फडणवीस यांच्या भेटीने महाराष्ट्रात चर्चेला उधाण आले असल्याचे लोणीकर यांनी म्हटलं.

नानाजी देशमुख या योजनेचे मराठवाड्यातील औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचे मोठं काम सुरु झालं होतं, आता ते सगळे काम थांबलेले आहे. योजना चालू करण्यासाठी कृषीमंत्र्याकडे मागणी केली असून मुख्यमंत्र्याकडे सुद्धा मागणी करणार असल्याचे लोणीकरांनी म्हटलं.

Babanrao Lonikar Criticize Mahaviakas Aghadi

संबंधित बातम्या :

उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी शरद पवार ‘वर्षा’वर, पाऊण तास चर्चा

आमच्यात मतभेद असले तरी वैमनस्य नाही, राऊत-फडणवीस भेटीवर रावसाहेब दानवेंचं भाष्य

फडणवीसांसोबत बैठक गुप्त नव्हती, आम्ही वैयक्तिक शत्रू नाही : संजय राऊत

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.