“अजित पवारांना गर्व झाला होता, तो मोडून काढला”; पंढरपूर मंगळवेढ्याच्या विजयानंतर गोपीचंद पडळकरांची खोचक टीका

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गर्व झाला होता. त्याची डगेगिरी भाषा होती. तो गर्व मोडून काढला," अशी तिखट प्रतिक्रिया भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली. (gopichand padalkar pandharpur mangalwedha by election)

अजित पवारांना गर्व झाला होता, तो मोडून काढला; पंढरपूर मंगळवेढ्याच्या विजयानंतर गोपीचंद पडळकरांची खोचक टीका
गोपीचंद पडळकर, आमदार, भाजप
Follow us
| Updated on: May 02, 2021 | 5:59 PM

सांगली : “मुंबईत बसून देवेंद्र फडणवीस यांनी योग्य नियोजन लावले. राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके हे 50 ते 60 हजार मतांनी निवडून येणार असे सांगत होते. पण मतदारांनी त्यांना दाखवून दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना गर्व झाला होता. त्यांची डगेगिरी भाषा होती. तो गर्व मोडून काढला,” अशी तिखट प्रतिक्रिया भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी दिली. देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. त्यासोबतच महाराष्ट्रातील पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदासंघातील पोटनिवडणुकीचीसुद्धा मतमोजणी पार पडली. यामध्ये भाजपचे उमेदवार समाधान आवताडे (Samadhan Autade) यांचा विजय झाला. या विजयानंतर गोपीचंद पडळकर यांनी वरिल प्रतिक्रिया दिली. ते सांगलीत बोलत होते. (Gopichand Padalkar criticizes Mahavikas aghadi on victory of BJP candidate Samadhan Autade in Pandharpur Mangalwedha by election)

गोपीचंद पडळकर काय म्हणाले ?

“पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात आज महाविकास आघाडीचा गर्व फोडण्यात आला. मुंबईत बसून देवेंद्र फडणवीस यांनी योग्य नियोजन लावले. राष्ट्रवादी नेते त्यांचा उमेदवार 50 ते 60 हजार मतांनी निवडून येणार असे सांगत होते. पण मतदारांनी त्यांना दाखवून दिले. अजित पवार यांना गर्व झाला होता. त्यांची डगेगिरी भाषा होती. तो गर्व मोडून काढला,” असे गोपीचंद पडळकर म्हणाले.

देवेंद्र फडणवीस माराष्ट्राची गरज

तसेच पुढे बोलताना त्यांनी भाजपच्या राजकारणाविषयी भाष्य केले. त्यांनी यापुढेसुद्धा भाजपची विजयी घोडदौड कायम राहील असा दावा केला. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राची गरज आहेत, असेसुद्धा वक्तव्य त्यांनी केले. यावेळी करेक्ट कार्यक्रम पंढरपूर मध्ये करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनतर पुढचा करेक्ट कार्यक्रम करतील. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राची गरज आहेत. या मतदारसंघाने तसं दाखवून दिलं आहे, असे गोपीचंद पडळकर म्हणाले.

पंढरपूर मंगळवेढ्यात समाधान आवताडे यांचा विजय 

दरम्यान, पंढरपूर मंगळवेढा मतदासंघाच्यी पोटनिवडणुकीची मतमोजणी आज (02 मे) पार पडली. यावेळी मतमोजणी करताना समाधान आवताडे हे सुरुवातीपासूनच आघाडीवर होते. ते 3733 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांच्या या विजयामुळे राज्याच्या भाजपमध्ये मोठे चैतन्य निर्माण झाले असून यापुढेसुद्धा भाजप महाविकास आघाडीला सामोरे जाईल, असे भाजप नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.

इतर बातम्या :

Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर पोटनिवडणुकीत भगीरथ भालके हरले, समाधान आवताडेंचा विजय

West Bengal Election Results 2021 LIVE: ममता बॅनर्जींनी नंदीग्रामची लढाई जिंकली; चुरशीच्या लढतीत सुवेंदू अधिकारींचा पराभव

2021 Vidhan Sabha Election Results LIVE : नंंदीग्राममधून ममता दीदी जिंकल्या, अटीतटीच्या लढतीत तृणमूलचा विजय

(Gopichand Padalkar criticizes Mahavikas aghadi on victory of BJP candidate Samadhan Autade in Pandharpur Mangalwedha by election)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.