AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Politics : नशिबापेक्षा कष्ट महत्वाचे, घरात बसून काहीच मिळणार नाही, मुख्यमंत्र्यांचा आता थेट निशाणा

शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना कायम गद्दार म्हणून हिणवण्यात आले आहे तर पक्ष प्रमुख हे कुणाला भेटत नाहीत असा ठपका शिंदे गटाकडून ठेवण्यात आला आहे.

Politics : नशिबापेक्षा कष्ट महत्वाचे, घरात बसून काहीच मिळणार नाही, मुख्यमंत्र्यांचा आता थेट निशाणा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 18, 2022 | 7:11 PM
Share

मुंबई :  (Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि (Uddhav Thackeray) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर थेट आरोप न करता अप्रत्यक्ष चिमटे काढले होते. पण आता शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील (differences of opinion) मतभेद वाढत असून थेट आरोप-प्रत्यारोपास सुरवात झाली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कुणाला भेटत नाहीत असा ठपका शिंदे गटाने सुरवातीपासूनच ठेवलेला आहे. त्यामुळे घरात बसून काही मिळणार नाही, त्यासाठी कष्ट महत्वाचे असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. शिवाय मुख्यमंत्री पद हे सहाजासहजी मिळाले नसून त्यामागचे कष्टही विचारात घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले आहेत. एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांची स्तुती केली तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर हा निशाणा साधला आहे.

शिवसेनेतून बंड केल्यानंतर पक्षप्रमुख आणि ठाकरे कुटुंबियांवर टोकाची टीका करु नका अशा सूचना एकनाथ शिंदे यांनीच आपल्या आमदारांना दिल्या होत्या. मात्र, दरम्यानच्या काळात या दोन्ही गटामध्ये आरोप-प्रत्यारोप वाढत गेले आणि आता जहरी टीका सुरु झाली आहे.

शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना कायम गद्दार म्हणून हिणवण्यात आले आहे तर पक्ष प्रमुख हे कुणाला भेटत नाहीत असा ठपका शिंदे गटाकडून ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्रीच नाही तर शिंदे गटातील मंत्री आणि आमदारही आता पक्षप्रमुखांवर टीका करु लागले आहेत. मुख्यमंत्र्यांनी तर घरात बसून काहीच मिळत नसल्याचे म्हणत ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.

केवळ नशिबालाच दोष देत न बसता कष्टही तेवढेच गरजेचे आहेत. फळाची अपेक्षा न ठेवता अविरत परिश्रम केल्यास फळ हे मिळणारच आहे. असे म्हणत आपण मुख्यमंत्री पदाची आशा न बाळगता केवळ कष्टातून मिळालेले हे फळ असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. त्यामुळे घरी बसून काही मिळणार नसल्याचे म्हणत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

कुणाला माफी करणे हे दखील एवढे सोपे नाही. क्षमा करुन कोणतीही गोष्ट आत्मसाथ करता येते पण तो गुण नसेल तर काय होऊ शकते हे संपूर्ण महाराष्ट्र उघड्या डोळ्याने पाहत आहे.क्षमा करण्यासाठी देखील मोठे मन लागतं असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.