AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बार्टीच्या माध्यमातून जिल्ह्या-जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा केंद्रांचं दालनं उभी करणार : धनंजय मुंडे

सामाजिक न्याय विभागाच्या बार्टीच्या माध्यमातून जिल्ह्या-जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा केंद्रांची दालनं उभे करण्याचे काम केले जाईल, अशी ग्वाही सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. | Dhananjay Munde

बार्टीच्या माध्यमातून जिल्ह्या-जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा केंद्रांचं दालनं उभी करणार : धनंजय मुंडे
धनंजय मुंडे, सामाजिक न्याय मंत्री
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Feb 21, 2021 | 9:33 AM
Share

सांगली : सामाजिक न्याय विभागाच्या बार्टीच्या माध्यमातून जिल्ह्या-जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा केंद्रांची दालनं उभे करण्याचे काम केले जाईल, अशी ग्वाही सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. ते सांगलीच्या इस्लामपुरात बोलत होते. (Minister Dhananjay Munde Speech over BARTI In Sangali)

जिल्ह्या-जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा केंद्रांची दालनं उभी करण्याचा मानस

इस्लामपुरात धनंजय मुंडे यांच्या हस्ते 35 यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर स्पर्धा परीक्षा प्रबोधिनी इस्लामपूर यांच्यावतीने संस्थेच्या यशवंतांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना बार्टीच्या माध्यमातून जिल्ह्या-जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा केंद्रांची दालनं उभे करण्याचा मानस धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवला.

बार्टीच्या माध्यमातून मोठं काम उभं करणार

याप्रसंगी बोलताना मंत्री धनंजय मुंडे म्हणाले ,आपल्यावर सामजिक न्याय विभागाची जबाबदारी आहे. या विभागाच्या बार्टीच्या माध्यमातून एमपीएससी, युपीएससी व इतर स्पर्धा परीक्षा क्लास हे ऑनलाईन घेण्याच्या  प्रयत्न केला. त्यामुळे देशाच्या सेवेसाठी यशस्वी स्पर्धक देणाऱ्या चांगल्या संस्थांना सोबत घेऊन बार्टीच्या माध्यमातून जिल्ह्या-जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा केंद्राचे दालन उभे करण्याचा प्रयत्न केला जाईल,असा विश्वास मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

समाजातला तळागाळातला विद्यार्थी अधिकारी झाला पाहिजे

सामाजिक न्याय विभागासारखं खातं मला मिळालं आहे. समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचं हे खातं आहे. या खात्याच्या माध्यमातून तळागाळातला विद्यार्थी मुख्य प्रवाहात आला पाहिजे आणि अधिकारीपदावर स्थानापन्न झाला पाहिजे, यासाठी विशेष प्रयत्न करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

(Minister Dhananjay Munde Speech over BARTI In Sangali)

हे ही वाचा :

पुण्यात कोरोना संसर्ग वाढतोय, प्रशासनाची तयारी काय ?, जाणून घ्या सध्याची परिस्थिती

Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीला 12 दिवसांनंतर ब्रेक; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Follow Us
खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
Rajabhau Waje | खड्डे, बंद कंपन्या आणि बेरोजगारी! राजाभाऊ वाजेंनी सरकारला एकाच वेळी घेरलं
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्के काय म्हणाले?
शिवसेनेच्या आमदारांना पवईच्या हॉटेलमध्ये... नरेश म्हस्केंनी सांगितलं पक्ष फुटीच्या अगदी काही दिवसांपूर्वी काय काय घडलं होतं?
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन.... शिंदे गटातील नेत्याचं विधान
एक तरी पत्र दाखवलं तर मी राजीनामा देईन नाहीतर.... शिंदे गटातील बड्या नेत्याचं राऊतांना खुलं चॅलेंज
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली....
मुंबईत मध्यरात्री मोठी दुर्घटना! घाटकोपरमध्ये घरांवर दरड कोसळली, ५-६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या...
संजय राऊतांची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी! चुकीच्या लोकांच्या हातात शिवसेनेचं चिन्ह...
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? निकालाआधी राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
Sanjay Raut - Naresh Mhaske | सुप्रीम कोर्टाबाहेर राऊतांनी म्हस्केंना बोलावलं अन् पुढे जे घडलं ते पाहून सगळेच हसले!
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?