AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धुळे-नंदुरबारमध्ये शिवसेना काँग्रेसशी प्रामाणिक, काँग्रेसचीच मतं भाजपला, अमरिश पटेलांच्या विजयानंतर सेना नेत्याचा दावा

नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसची मतं भाजपला गेल्याचा दावा शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी केला.

धुळे-नंदुरबारमध्ये शिवसेना काँग्रेसशी प्रामाणिक, काँग्रेसचीच मतं भाजपला, अमरिश पटेलांच्या विजयानंतर सेना नेत्याचा दावा
| Updated on: Dec 03, 2020 | 5:41 PM
Share

नंदुरबार : विधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीची 115 मतं भाजप उमेदवार अमरिश भाई पटेल यांच्या पारड्यात पडली. त्यानंतर काँग्रेस-शिवसेनेत तणातणी होताना दिसत आहे. शिवसेनेने काँग्रेसशी प्रामाणिकपणा दाखवला, काँग्रेसचीच मतं भाजपला गेली, असा दावा शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी केला. धुळे नंदुरबार (Dhule Nandurbar) स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या अमरिश पटेल (BJP Leader Amrish Patel) यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. (Nandurbar Shiv Sena leader Chandrakant Raghuvanshi claims party loyal to Congress after Amrish Patel victory)

शिवसेनेने धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य निवडणुकीत प्रामाणिकपणे काँग्रेस उमेदवार अभिजीत पाटील यांना मतदान केलं आहे. काँग्रेस नेत्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला चंद्रकांत रघुवंशी यांनी दिला. नंदुरबार जिल्ह्यातील काँग्रेसची मतं भाजपला गेल्याचा दावाही त्यांनी केला.

भाजप उमेदवार अमरिश पटेल यांनी दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील यांचा पराभव केला. अमरिश पटेल यांचा सर्वपक्षीय संपर्क असून त्या तुलनेत अभिजीत पाटील नवखे आहेत. पटेल यांचे नेतृत्व आणि कामाची शैली भाजपसह महाआघाडीच्या नेत्यांना माहित आहे, त्यामुळे पटेल यांचे पारडे आधीपासूनच जड मानले जात होते. अभिजीत पाटील ऐनवेळेस काही करिष्मा करु शकतील का, याकडेच लक्ष होतं. मात्र ती अपेक्षा फोल ठरली.

अमरिश पटेल यांना 332, तर अभिजीत पाटील यांना 98 मतं मिळाली. अमरिश पटेल यांनी 234 मतांनी बाजी मारली. अमरिश पटेल यांचा या मतदारसंघातील सलग तिसरा विजय आहे. यापूर्वी त्यांनी 2009, 2015 आणि आता 2020 मध्ये विजय मिळवला.

काँग्रेसचं क्रॉस व्होटिंग पटेलांच्या पथ्यावर

अमरिश पटेल यांना भाजपची मतं तर मिळालीच, मात्र काँग्रेस आणि महाविकास आघाडीची तब्बल 115 मतं फुटली. आकड्यातच सांगायचं तर भाजपची 199 आणि महाविकास आघाडीची 213 इतकी मतं होती. मात्र महाविकास आघाडीच्या 115 मतदारांचे क्रॉस व्होटिंग झाले.

अभिजीत पाटील यांना अवघी 98 मतं मिळाली, तर भाजपचे अमरिश पटेल तब्बल 332 मतं मिळवून विजयी झाले. अमरिश पटेलांच्या या विजयाने महाविकास आघाडीच्या एकीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

धुळे- नंदुरबार निवडणुकीतील संख्याबळ

  • भाजप – 199
  • काँग्रेस – 157
  • राष्ट्रवादी – 36
  • शिवसेना 22
  • एमआयएम – 9
  • समाजवादी पार्टी – 4
  • बहुजन समाज पार्टी – 1
  • महाराष्ट्र नवनिर्माण सेना – 1
  • अपक्ष – 1

अनिल गोटेंचा पटेलांवर घणाघात 

“महाविकास आघाडीतील अनेक नेते भाजप उमेदवार अमरिश पटेल यांचे गुलाम आहेत. त्यामुळे अमरिश पटेल यांचा विजय अपेक्षित होताच. अमरिश पटेल धनशक्तीच्या जोरावर निवडून आले. अमरिश पटेल जरी भाजपात असले तरी धुळ्यात राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस हे पक्ष चालवतात. 50 हजार ते 1 लाखाचा भाव होता” असा घणाघाती आरोप राष्ट्रवादीचे नेते अनिल गोटे यांनी केला. “महाविकास आघाडी राज्यात चांगलं काम करत आहे, मात्र धुळ्यात बोगस कारभार सुरु आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पैशांचा वापर सर्रास केला जात आहे” असा दावाही त्यांनी केला.

संबंधित बातम्या :

धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अमरिश पटेलांची विरोधी मतांमध्ये धाड, दणदणीत विजय

अमरिश पटेल – विजयाची हॅटट्रिक, तरीही 12 महिन्यांसाठी आमदार!

अमरिश पटेल यांचा विजय अपेक्षित, भाजपातून राष्ट्रवादीत आलेल्या बड्या नेत्याची प्रतिक्रिया

(Nandurbar Shiv Sena leader Chandrakant Raghuvanshi claims party loyal to Congress after Amrish Patel victory)

Follow Us
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा
मालेगाव बॉम्बस्फोट 2006 प्रकरणात सर्व 4 आरोपींना मोठा दिलासा.
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी....
रितेश- जेनेलियाच्या हाती लालपरीचे स्टेरिंग, देशमुख कपल करणार एसटी.....
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड
अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानची पोलिसांनी काढली धिंड.
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?
व्हायरल व्हिडिओनंतर गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण काय?.