AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शहिद पंतप्रधानाच्या मुलाला… राहुल गांधी यांच्या निलंबनावरून प्रियंका गांधी यांच्या संतापाचा कडेलोट

देशात भाजपचे राज्य आल्यांनतर त्यांच्या चुकीच्या धोरणांवर राहुल गांधी सातत्याने टीका करत आहेत. तसेच, नुकतीच त्यांनी भारत जोडो यात्रा काढली होती. या यात्रेला लोकांनी मोठा प्रतिसाद दिला होता.

शहिद पंतप्रधानाच्या मुलाला... राहुल गांधी यांच्या निलंबनावरून प्रियंका गांधी यांच्या संतापाचा कडेलोट
PM NARENDRA MODI AND RAHUL GANDHIImage Credit source: TV9 NETWORK
| Updated on: Mar 24, 2023 | 7:55 PM
Share

मुंबई : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना गुजरातमधील सूरत न्यायालयाने दोन वर्षांची सजा सुनावली आहे. मोदी आडनावाचे सगळेच चोर का असतात? अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. त्यावरून दाखल झालेल्या गुन्ह्यात राहुल गांधी यांना न्यायालयाने ही सजा सुनावली. त्यांनतर लोकसभेचे सचिव उत्पल कुमार सिंग यांनी न्यायालयाच्या या निर्णयाची दखल घेत राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय जारी केला. यामुळे राहुल गांधी यांची बहीण आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी – वड्रा संतापल्या आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवर टॅग करत आपला संताप व्यक्त केला आहे.

राहुल गांधी हे केरळच्या वायनाड मतदारसंघातून निवडून आले आहेत. देशात भाजपचे राज्य आल्यांनतर त्यांच्या चुकीच्या धोरणांवर राहुल गांधी सातत्याने टीका करत आहेत. तसेच, नुकतीच त्यांनी भारत जोडो यात्रा काढली होती. या यात्रेला लोकांनी मोठा प्रतिसाद दिला होता. मात्र, सुरत न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी – वड्रा यांनी यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांनी सच्च्या देशभक्ताप्रमाणे अदानी याने केलेल्या लूटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांच्यावर प्रश्न उपस्थित केला. तुमचे मित्र अदानी हे देशाची जनता आणि संसदेपेक्षा मोठे झाले का ? अदानी यांच्याकडून करण्यात येत असलेल्या लुटीबाबत प्रश्न विचारला म्हणून तुम्ही बावचळले का ? अशी टीका प्रियंका गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.

नेहरू’ नाम क्यों नही रखते

काश्मीरी पंडितांच्या रितीरिवाजानुसार एका मुलाने वडिलांच्या मृत्यूनंतर पगडी परिधान केली. आपली परंपरा जपली. संसदेमध्ये आपण गांधी परिवार, काश्मिरी पंडित समाजाचा अपमान केला. वह ‘नेहरू’ नाम क्यों नही रखते असे म्हणालात. त्यावेळी तुम्हाला संसदेने का अपात्र ठरविले नाही अशी विचारणा त्यांनी केली आहे.

शहीद पंतप्रधानाच्या मुलाला देशद्रोही

नरेंद्र मोदीजी तुम्ही आमच्यावर घराणेशाहीचा आरोप करता. पण, याच घराण्याने भारतातील लोकशाहीसाठी आपले रक्त सांडले. तुमच्या एका चमच्याने एका शहीद पंतप्रधानाच्या मुलाला देशद्रोही, मीर जाफर संबोधले. तर, तुमच्या एका मुख्यमंत्र्याने थेट राहुल गांधी यांचे वडील कोण ? असा प्रश्न उपस्थित केला. मग, त्यांना कोणता न्याय लावणार असा सवालही त्यांनी नरेंद्र मोदी यांना केला आहे.

Follow Us
खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन
खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन.
राहुरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वीच राष्ट्रवादीला मोठा धक्का
राहुरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वीच राष्ट्रवादीला मोठा धक्का.
राज ठाकरे महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी मुंबई महानगरपालिकेत दाखल
राज ठाकरे महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी मुंबई महानगरपालिकेत दाखल.
ठाकरेंनी नकार दिला तर या महिला नेत्याला विधान परिषदेत जाण्याची संधी
ठाकरेंनी नकार दिला तर या महिला नेत्याला विधान परिषदेत जाण्याची संधी.
भाजपचं कॅरेक्टर, चरित्र, ढोंग काय आहे हे त्या प्रकरणात दिसतंय
भाजपचं कॅरेक्टर, चरित्र, ढोंग काय आहे हे त्या प्रकरणात दिसतंय.
संसदेत शाब्दिक चकमक; संजय राऊतांचे भाजपवर तीव्र शब्दांत टीकास्त्र
संसदेत शाब्दिक चकमक; संजय राऊतांचे भाजपवर तीव्र शब्दांत टीकास्त्र.
नाशिक धर्मांतर प्रकरणातील 7 जण अटकेत,मुख्य सूत्रधार निदा खान कुठे फरार
नाशिक धर्मांतर प्रकरणातील 7 जण अटकेत,मुख्य सूत्रधार निदा खान कुठे फरार.
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल.
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला.
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?.