AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निवडणुकीतून माघार घेतली चांगली गोष्ट; तसाही आमचा विजय…, भाजपाच्या निर्णयावर दानवेंची प्रतिक्रिया

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपाच्या निवडणुकीतून माघार घेण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. भाजपाने महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

निवडणुकीतून माघार घेतली चांगली गोष्ट; तसाही आमचा विजय..., भाजपाच्या निर्णयावर दानवेंची प्रतिक्रिया
Image Credit source: tv 9
| Updated on: Oct 17, 2022 | 3:49 PM
Share

औरंगाबाद :  अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीवरून वातावरण चांगलंच तापलं होतं. भाजपाकडून (BJP) मुरजी पटेल यांना उमदेवारी देण्यात आली होती. तर शिवसेना (Shiv sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके या रिंगणात आहेत. भाजपाने आज अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली. भाजपाच्या या निर्णयावर समिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी देखील भाजपाच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देताना भाजपाने महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे.

नेमकं काय म्हटलं दानवे यांनी?

दानवे यांनी भाजपाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. भाजपाने महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसा निर्णय घेतल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. भलेही ते आमच्या विरोधात असतील मात्र त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसा निर्णय घेतला आहे. आमच्या भगिनी ऋतुजा लटके या अंधेरी पूर्वमधून उभ्या आहेत. त्या कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडून येणार याची आम्हाला खात्री होती.

रमेश लटके यांच निधन दुर्दैवी आहे. ते शिवसेनेचे सच्चे कार्यकर्ते होते. शाखाप्रमुखापासून ते आमदारापर्यंत पोहोचले. ते या परिसरात 24 तास शिवसेनेचं कार्य करत होते. त्यामुळे अंधेरीमध्ये आमची ताकद आहे. आम्ही निश्चित निवडून येणारच होतो. मात्र भाजपाने माघार घेतली हा चांगला निर्णय असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे.

राणे यांच्यावर बोलणे टाळले

दरम्यान दुसरीकडे नारायण राणे यांच्याकडून सातत्याने ठाकरे गटावर टीका सुरू आहे. याबाबत दानवे यांना विचारले असता त्यांनी राणेंवर बोलणे टाळले. राणेंवर बोलण्याची गरज नसल्याचं दानवे यावेळी म्हणाले.

Follow Us
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?.
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात.....
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात......
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK....
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK.....
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!.
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?.
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?.
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद.
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर..
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर...
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम.
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास...
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास....