AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरे यांचं एक ट्विट, राजकीय विश्लेषकांचं विश्लेषण काय?; तर सर्वाधिक फटका या नेत्याला बसणार?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी, माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाही असा आदेश नेत्यांना दिला आहे. आता यावर राजकीय विश्लेषकांनी आपले मत व्यक्त केलं आहे.

राज ठाकरे यांचं एक ट्विट, राजकीय विश्लेषकांचं विश्लेषण काय?; तर सर्वाधिक फटका या नेत्याला बसणार?
Raj Thackeray tweet news
| Updated on: Jul 09, 2025 | 5:00 PM
Share

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट करत पक्षातील नेत्यांना, माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाही असा आदेश दिला आहे. राज ठाकरेंनी असा आदेश का दिला याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत. अशातच आता राजकीय विश्लेषकांनी याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

काय म्हणाले विजय चोरमारे?

राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी म्हटले की, ‘राज ठाकरे यांनी सावध पवित्र घेतला आहे. त्यांची संघटना ही शिस्त बद्ध नाही कोणी काही बोलू नये वेगळा मेसेज जाऊ नये यासाठी त्यांनी हे केल असावं. आता राज ठाकरे यांना मागे येत येणार नाही, तसं झालं तर राज ठाकरे यांना मोठा फटका बसेल.’

शिवसेना मनसे युतीवर भाष्य करताना विजय चोरमारे यांनी सांगितले की, दोघे भाऊ एकत्र आले म्हणजे लगेच युती झाली असं नाही. त्याला एक प्रक्रिया आहे, उद्धव ठाकरे यांनी जेवढा उत्साह दाखवला तेवढा राज ठाकरे यांचा नव्हता. जर कदाचित आम्ही एकत्र येणार आहोत हे राज ठाकरे बोलले असते तर उद्धव ठाकरे यांच्या भाषनाला अर्थ राहिला नसता. राज ठाकरे यांनी पण उद्धव ठाकरे यांचं मोठेपण जपलं. जर कदाचित दोघे एकत्र आले तर एकनाथ शिंदे यांचं महत्व कमी होईल.

संजय आवटे यांचं विश्लेषण

राज ठाकरेंच्या भूमिकेवर बोलताना राजकीय विश्लेषक संजय आवटे म्हणाले की, ‘ठाकरे बंधूंच्या मेळाव्यातील राज ठाकरे यांची देहबोली आणि आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलू नये अशी राज ठाकरेंची पोस्ट येणे म्हणजे राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय चाललंय?’

पुढे बोलताना आवटे म्हणाले की, ‘ठाकरे बंधू एकत्र आलेत म्हणून ते पुढेही एकत्र येतील असं कोणी समजू नये. मात्र राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आलेत त्याचा सर्वात जास्त फटका एकनाथ शिंदे आणि त्यानंतर भाजपाला बसणार, भाजपाला कुठल्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेवर आपली सत्ता आणायची आहे. युती झाली तर महाविकास आघाडीला राज ठाकरे चालतील, मात्र राज ठाकरे यांना महाविकास विकास आघाडी चालेल का?’

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज ठाकरे यांच्या ट्विटवर भाष्य केलं आहे. ‘धोरणात्मक निर्णय पक्षाच्या प्रमुखांनी घ्यायचे असतात, जे काही त्यांनी म्हटलं आहे, ते मनसेच्या अध्यक्ष आहेत ते त्यांच्या तो अधिकार आहे.’ असं शिंदे म्हणाले.

Follow Us
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,.
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले....
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले.....
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत.
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28लाखांची लाच घेताना रंगे.
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28लाखांची लाच घेताना रंगे..
गडचिरोलीत उष्णतेचा कहर; ट्रान्सफॉर्मर जळाले, वीजपुरवठा खंडित...
गडचिरोलीत उष्णतेचा कहर; ट्रान्सफॉर्मर जळाले, वीजपुरवठा खंडित....
उबाठा गटाची हीच मानसिकता...शिंदे गटाची ताकद वाढल्याने...
उबाठा गटाची हीच मानसिकता...शिंदे गटाची ताकद वाढल्याने....
धाराशिवमध्ये महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग, वाढत्या उष्णतेमुळे उडाला
धाराशिवमध्ये महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग, वाढत्या उष्णतेमुळे उडाला.
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन.
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन...
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन....