AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : केसीआर, हेमंत सोरेन यांचं सरकार याच पद्धतीने पाडलं जाईल; ‘रोखठोक’मधून भाजपावर पुन्हा हल्लाबोल

शिवसेनेचे (shiv sena) मुखपत्र असलेल्या सामनाच्या रोखठोक या सदरातून शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटावर निशाणा साधला आहे.

Sanjay Raut : केसीआर, हेमंत सोरेन यांचं सरकार याच पद्धतीने पाडलं जाईल; 'रोखठोक'मधून भाजपावर पुन्हा हल्लाबोल
Image Credit source:
| Updated on: Jul 24, 2022 | 7:48 AM
Share

मुंबई : शिवसेनेचे (shiv sena) मुखपत्र असलेल्या सामनाच्या रोखठोक या सदरातून शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटावर निशाणा साधला आहे. जे विधानसभा सदस्य शिवसेनेतून बाहेर पडले त्यांचा युक्तिवाद एकच आहे तो म्हणजे, आमचीच शिवसेना खरी. आम्ही शिवसेना सोडली नाही! मात्र त्यांची ही भूमिका कातडी वाचविणारी असल्याची टीका रोखठोकमध्ये करण्यात आली आहे. पुढे रोखठोकमध्ये असे देखील म्हटले आहे की,घटना ही माणसांसाठी असेत, माणसे घटनेसाठी नसतात. घटनेतील 10 व्या शेड्युलनसार हे सोळाही आमदार अपात्र ठरणार आहेत. मात्र सरकारला वाचविण्यासाठी व शिवसेनेला कायमचे संपवून टाकण्यासाठी या 16 आमदारांना केंद्र सरकारमध्ये बसलेले लोक वाचवत आहेत, मात्र सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ काय निर्णय देते यावर आता देशाचे व लोकशाहीचे भवितव्य अवलंबून असल्याचे सामनामध्ये म्हटले आहे.

लोकशाहीचे भवितव्य अंधकारमय

पुढे रोखठोकमध्ये म्हटले आहे की, भारतामधील लोकशाहीचे भवितव्य कसे अंधकारमय झाले आहे त्यांचे प्रत्यंतर रोजच येत आहे. देशाचे सरन्यायाधीश श्री. रमण्णा यांनी देखील एका कार्यक्रमात लोकशाही आणि संसदेच्या भवितव्यावर चिंता व्यक्त केली आहे.विरोधी पक्षांची जागाही सत्ताध्याऱ्यांनी बळकावयाची हे चित्र घातक आहे, असे सरन्यायाधीश रमण्णा जेव्हा जाहीरपणे सांगतात तेव्हा भीती वाटू लागते. पण एकाधिकारशाही व हुकूमशाहीचे कितीही तांडव झाले तरी लोकशाही या देशात मरणार नसल्याचे रोखठोकमध्ये म्हटले आहे.

बदला घेतला

‘महाराष्ट्राच्या सत्तापरिवर्तनाने लोकशाहीची मूल्ये उद्ध्वस्त केली हे केंद्रातील राज्यकर्ते मानायला तयार नाहीत. आमदारांना फोडले व खासदारही फुटले. उद्धव ठाकरे यांनी मोदी-शहांच्या विरोधात जाऊन सरकार स्थापन केले. त्याचा बदला शेवटी शिवसेनेत फूट पाडून घेण्यात आला. तेलंगणाचे के. सी. चंद्रशेखर राव व झारखंडचे हेमंत सोरेन यांची सरकारे भविष्यात याच पद्धतीने भरडली जातील. सोरेन यांच्या निकटवर्तीयांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी पडू लागल्याची टीकाही रोखठोकमधून करण्यात आली आहे. ज्या बंडखोर शिवसेनेच्या आमदार आणि नेत्यावर केंद्रीय यंत्रणांचे खटले होते, अशा सर्वांना जाचातून मुक्त करण्यात आले आहे, त्यांना आता शांत झोप लागेल. इथे समान न्यायाचे तत्त्व चुकीच्या पद्धतीने राबवले जात आहे.भारतीय लोकशाही जिवंत आहे, पण ती कुणाची तरी आज बटीक असल्याची टीकाही रोखठोकमधून करण्यात आली आहे.

Follow Us
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल
रिलायन्स इंडस्ट्रीची अमेरिकेत गुंतवणूक, संजय राऊत यांचा हल्लाबोल.
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत
व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा; हॉटेल व्यवसाय आणि उद्योग अडचणीत.
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला...
मिठी नदीच्या नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प उभारा, उद्घाटनाला....
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....