बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे. चुकीच्या सल्लागांरामुळे शिवसेना अडचणीत आली आहे. पक्षाला चांगल्या सल्लागाराची आवश्यकता असल्याचे केसरकर यांनी म्हटले आहे. पक्षात शांत लोक देखील आहेत, मात्र त्यांचं कितपत ऐकले जाते ही मी सांगू शकत नसल्याचे केसरकर यांनी म्हटले आहे. तसेच शरद पवार यांना भेटण्यापूर्वी उद्धव ठाकरे हे बंडखोरांशी तडजोड करण्यास तयार होते असेही दिपक केसरकर यांनी म्हटले आहे.