AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हॉटेल रिट्रीटमधील शिवसेना आमदारांना 5 दिवसांनंतर ‘हा’ नवा आदेश

गेल्या पाच दिवसांपासून मुंबईच्या हॉटेल रिट्रीटमध्ये ठेवण्यात आलेल्या शिवसेनेच्या आमदारांना अखेर त्यांच्या मतदारसंघात जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत

हॉटेल रिट्रीटमधील शिवसेना आमदारांना 5 दिवसांनंतर 'हा' नवा आदेश
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Nov 13, 2019 | 10:59 PM
Share

मुंबई : गेल्या पाच दिवसांपासून मुंबईच्या हॉटेल रिट्रीटमध्ये ठेवण्यात आलेल्या शिवसेनेच्या आमदारांना अखेर शिवसेना पक्षप्रमुखांनी नवा आदेश दिला आहे. या प्रमाणे आता शिवसेनेच्या सर्व आमदारांना त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात जाण्यास सांगण्यात आले आहे. (Shivsena MLA). मतदारसंघात जाऊन मतदारांच्या संपर्कात राहा, असा आदेश या आमदारांना देण्यात आला. राज्यात बळीराजा संकटात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा द्या, असंही या आमदारांना सांगण्यात आलं. त्यामुळे अखेर 5 दिवसांनंतर शिवसेनेचे हे सर्व आमदार त्यांच्या मतदारसंघात परतणार आहेत (Shivsena MLA).

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यापासून राजकीय हालचालींना आणखी वेग आला आहे. राज्यातील परिस्थिती पाहता आमदार फुटू नये या भीतीने शिवसेनेने गेल्या पाच दिवसांपासून आपल्या आमदारांना हॉटेल रिट्रीटमध्ये ठेवलं होतं. त्यानंतर आज शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी या आमदारांना हॉटेलमध्ये भेटून पक्षप्रमुखांचा आदेश सांगितला.

“अवकाळी पावसामुळे राज्यात शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. बळीराजा हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत त्या शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम त्या भागातील आमदाराचं आहे. त्यासाठी मतदारसंघात परत जाऊन शेतकऱ्यांची मदत करणे, सरकारी मदत त्यांच्यापर्यंत पोहोचते आहे की नाही हे पाहावं लागणार आहे. त्यामुळे शिवसेनेचे आमदारांना त्यांच्या मतदारसंघात परतण्याचे आदेश देण्यात आले”, अशी माहिती आमदार सुनिल प्रभू यांनी दिली.

“शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. ते योग्य तो निर्णय घेतील. पण सध्या बळीराजा संकटात आहे. त्यांना आमच्या मदतीची गरज आहे. त्यामुळे आम्ही मतदारसंघात परत जात आहोत”, अशी माहिती सुनिल प्रभू यांनी दिली.

दुसरीकडे, गेल्या 5 दिवसांपासून काँग्रेसने त्यांच्या आमदारांना जयपूरमध्ये ठेवलं होतं. ते सर्व 44 आमदार आज मुंबईत परतले. त्यानंतर आता शिवसेनेनेही त्यांच्या आमदारांना मतदारसंघात परतण्याचे आदेश दिले आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...