AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे ठाण्यापासून कोकणापर्यंत हद्दपार; देवेंद्र फडणवीस यांचा सर्वात मोठा दावा

लोकसभा निवडणुकीच्या निकालावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत काही नरेटिव्ह सेट केले होते. हे नरेटिव्ह खालच्या वर्गापर्यंत गेले. ते दूर करण्यात आपण कमी पडलो. हे आपलं अपयश आहे, अशी कबुली देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

उद्धव ठाकरे ठाण्यापासून कोकणापर्यंत हद्दपार; देवेंद्र फडणवीस यांचा सर्वात मोठा दावा
devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 08, 2024 | 5:35 PM
Share

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीचं विश्लेषण करताना ठाकरे गटावर जोरदार टीका केली. ठाकरे गट हा ठाण्यापासून कोकणापर्यंत हद्दपार झाला आहे. या भागात त्यांची एकही जागा निवडून आलेली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना या निवडणुकीत सहानुभूती होती हा मुद्दाच निकाली निघतो, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत निवडणुकीचं विश्लेषण करताना देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

उद्धव ठाकरेंना सहानुभूती असल्याचं नरेटिव्ह करण्यात आला. ठाण्यापासून कोकणापर्यंत ठाकरे गटाला जागा नाही. पालघरमध्येही एकही जागा नाही. मुंबईच्या जागा कुणाच्या भरवश्यावर मिळाल्या? मराठी माणसांनी त्यांना वोट दिलं नाही. वरळीत फक्त सहा हजार मते त्यांना मिळाली. शिवडीत 30 ते 45 हजार मतांचा लीड घ्यायला हवा होता. विक्रोळी, भांडूपमध्ये 60 हजाराचा लीड घ्यायला हवा होता. ते 8 हजारावर थांबले. एका विशिष्ट समाजाच्या मतांवर त्यांनी आघाडी घेतली आहे, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

फडणवीस यांची कबुली

या लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी अनेक नरेटिव्ह तयार केले. हे नरेटिव्ह दूर करण्यात किंवा रोखण्यात आपण अपयशी ठरलो, अशी कबुली देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विरोधकांनी भाजपने गुजरातला उद्योग पळवल्याचा नरेटिव्ह तयार केला. 2023 आणि 2024 मध्ये महाराष्ट्र गु्ंतवणुकीत पहिल्या क्रमांकवर आपण आणला. ठाकरेच्या काळात महाराष्ट्र खाली होता, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

चौथा पक्षही निवडणुकीत होता

आपली लढाई फक्ती तीन पक्षांविरोधात नव्हती. तर एक चौथा पक्षही लोकसभेत कार्यरत होता. तो म्हणजे नरेटिव्ह बदलणं. विरोधकांनी काही नरेटिव्ह सेट केले होते. त्याच्याकडे आपण लक्षच दिलं नाही. त्याच्याविरोधात आपण लढलो नाही. संविधान बदलणार हा नरेटिव्ह विरोधकांनी निर्माण केला. आपण हा नरेटिव्ह बदलू शकलो नाही. हा नरेटिव्ह खालपर्यंत झिरपत गेला. खरंच भाजप संविधान बदलणार का? असं सामान्य लोकांना वाटू लागलं होतं . दलित आणि आदिवासी समाजात हा नरेटिव्ह तयार झाला. असा नरेटिव्ह झाला तरी हा नरेटिव्ह एखाद्या निवडणुकीत चालतो. पुढच्या निवडणुकीत चालत नाही. कोणत्याही खोट्या मुद्द्याची ताकद एका निवडणुकीपुरती असते. नंतर राहत नाही, असं फडणवीस म्हणाले.

वर्षभर संविधान महोत्सव

मोदी जेव्हा जेव्हा पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांनी नेता निवडीच्या आधी संविधानाची पूजा केली. त्यांनी सांगितलं संविधान सर्वात महत्त्वाचं आहे. पुढचं एक वर्ष संविधानाचा महोत्सव या देशात साजरा केला जाणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.