AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरेंना उचलून-उचलून आपटू, निशिकांत दुबेंच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी राज ठाकरे यांना बिहारमध्ये येण्याचं आव्हान दिलं. "राज ठाकरेंमध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी बिहारमध्ये येऊन दाखवावं, उचलून, उचलून आपटू" अशा पद्धतीची भाषा निशिकांत दुबे यांनी वापरली.

ठाकरेंना उचलून-उचलून आपटू, निशिकांत दुबेंच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
एकनाथ शिंदे, राज ठाकरे (संग्रहित फोटो)
| Updated on: Jul 08, 2025 | 11:11 AM
Share

महाराष्ट्रात भाषिक वादाचा विषय चिघळत चालला आहे. प्राथमिक शिक्षणात हिंदी भाषेच्या सक्तीवरुन या वादाला सुरुवात झाली. त्यानंतर मारीरोड-भाईंदरमध्ये एका व्यापाऱ्याला मनसैनिकांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. आता भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी राज ठाकरे यांना बिहारमध्ये येण्याचं आव्हान दिलं. “राज ठाकरेंमध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी बिहारमध्ये येऊन दाखवावं, उचलून, उचलून आपटू” अशा पद्धतीची भाषा निशिकांत दुबे यांनी वापरली.

“तुम्ही कोणाची भाकरी खात आहात? टाटा, बिर्ला, रिलायन्सचे महाराष्ट्रात युनिट नाहीत. टाटांनी त्यांचा पहिला कारखाना बिहारमध्ये बांधला. तुम्ही आमच्या पैशावर जगत आहात, तुम्ही कोणता कर भरता? तुमच्याकडे कोणते उद्योग आहेत, आमच्याकडे खाणी आहेत. झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिशात आहेत, तुमच्याकडे कोणत्या खाणी आहेत?” असा सवाल त्यांनी केला.

तरच आम्ही समजू की खरंच तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारस

“जर तुमच्यात हिंम्मत असेल, तर उर्दू भाषिकांना, तेलगू-तमिळ भाषिकांनाही मारहाण करा, तरच आम्ही समजू की खरंच तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे वारस आहात आणि त्यांच्याच विचारांवर ते चालतात” असंही दुबे म्हणाले.

‘मनसेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न’

निशिकांत दुबे यांच्या या वक्तव्यावर शिवसेनेने आपली भूमिका मांडली आहे. “मनसेने मोर्चा काढला हा त्यांचा वयैक्तीक भाग आहे. परंतु ज्या पद्धतीने मराठी भाषेवर राजकारण केलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना माशेलकर समितीचा हा अहवाल स्वीकारला गेला. त्याच अहवालात नमूद होतं की, हिंदी भाषा ही सक्तीची केली जाणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच टि्वट झालं होतं. पण अचानक मनसेने मराठीचा मुद्दा काढल्यानंतर त्यांनी या सगळ्या गोष्टीला यू टर्न दिला. आपणच मराठी माणसाचे तारणहार आहोत. अशा पद्धतीची भूमिका घेतली. मनसेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला” असं मंत्री उदय सामंत म्हणाले.

मनसेच म्हणणं आहे की, गुजराती भाषेला आंदोलनाची परवानगी दिली जाते. मात्र मराठीला परवानगी देत नाही. “मी यावर पूर्ण उत्तर दिलं आहे. लोकशाहीत लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन होत असेल, तर प्रशासनाकडून परवानगी दिली जाते” असं उदय सामंत म्हणाले.

निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावर शिवसेनेची भूमिका काय?

“निशिकांत दुबे यांनी जे वक्तव्य केलं, त्याच्याशी कोणी सहमत नाही. महाराष्ट्राबद्दल, मराठी माणसाबद्दल प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे. मी आज महाराष्ट्रात मराठी माणूस म्हणून राहतो. मला मराठी माणसाबद्दल, महाराष्ट्राबद्दल अभिमान आहे. हीच एकनाथ शिंदे यांची भूमिका आहे. शिवसेनेची भूमिका आहे. दुबे कुठल्याही पक्षाचे जरी असले, तरी या वक्तव्याच समर्थन करता येणार नाही. असाच खुलासा भाजप नेते आशिष शेलार यांनी सभागृहात केला आहे” असं उदय सामंत म्हणाले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.