AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chandrashekhar Bawankule : सरकार स्थापन व्हायला वेळ का लागतोय? महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षांनी दिलं उत्तर

Chandrashekhar Bawankule : एकनाथ शिंदेंच्या नाराजीच्या प्रश्नावर सुद्धा महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलं. महाराष्ट्रात महायुतीला पूर्ण बहुमत मिळालय. पण सरकार स्थापन व्हायला वेळ लागतोय. त्यामुळे उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. अनेक प्रश्न आहेत, त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बोलले आहेत.

Chandrashekhar Bawankule : सरकार स्थापन व्हायला वेळ का लागतोय? महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षांनी दिलं उत्तर
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
| Updated on: Nov 27, 2024 | 11:12 AM
Share

“नांदेडमध्ये ईव्हीएम चांगलं होतं. नांदेडमध्ये आम्ही 1500 मतांनी हरलो. तुम्ही जिंकलात. खरच हा खोटारडेपणा आहे. पराभव स्वीकारुन आत्मचिंतन करा. आम्ही लोकसभेला हरल्यानंतर आत्मचिंतन केलं. शिकलो, त्यातून पुढे गेलो. बूथवर काम केलं. मतदान केंद्रापर्यंत जाऊन जनतेला भेटलो. मतांची टक्केवारी वाढली” असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. “मोठ्या प्रमाणात जनतेने मतदान केलं. लोकसभेनंतर जनतेने मोठ्या प्रमाणात मतदान केलं. विरोधक खोटारडेपणा करतील. दोन-चार दिवस झोप लागणार नाही. झोप लागल्यानंतर डोकं शांत राहील” अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

दिल्लीतून भाजपचे निरीक्षक 29 तारखेला येणार आहेत का? या प्रश्नावर ‘अजून निरोप आलेला नाही. निरोप आला की, तुम्हाला कळवू’ असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. कधीपर्यंत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा स्पष्ट होईल? यावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “आघाडीमध्ये वेळ लागतो. त्यांच्याकडे किती मंत्रीपद, आमच्याकडे किती मंत्रीपद? आकडा काय असेल? कोणाकडे कुठली खाती असतील? पालक मंत्री कोण असतील? याचं सूत्र तयार करावं लागेल. नुसता मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्याच्या शपथविधीने होत नाही” “त्यांच्याकडे कुठली खाती, आमच्याकडे कुठली खाती यामध्ये काही काळ जाईल, लवकरच सरकार बनेल” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. “तीन पक्षाची मंत्रिपदं, पालकमंत्री, खाती या सर्वबाबींचा सरकार बनवताना विचार करावा लागतो. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन सरकार बनत नाही” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

सरकार नोव्हेंबरमध्ये बनणार की….

सरकार नोव्हेंबरमध्ये बनणार की, डिसेंबर उजाडणार? यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी याला काही पॅरामीटर नाही असं उत्तर दिलं. “सध्या एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत. आमच्यासोबत असलेले तिन्ही पक्ष, घटक पक्ष यांचं मत विचारात घ्यावं लागेल. सरकार पूर्ण क्षमतेने बनेल. सर्व पक्षांना न्याय देणार सरकार बनेल” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. एकनाथ शिंदे नाराज आहे? त्यांनी गृहमंत्रीपद मागितलं, त्यांनी उपमुख्यमंत्रीपद, केंद्रात मंत्रीपद नाकारलं? ‘त्या बद्दल मला माहित नाही’ असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.