AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zodiac | अपयश आल्यास काचेप्रमाणे तुटून जातात या 4 राशींचे लोक, तुमची रास तर यामध्ये नाही ना ?

राशीचक्रातील (Rashichakra) काही राशी अशा आहेत ज्या अपयशाच्या विचारांनीच हैराण होतात. जर अपयश आलेच तर ते काचेसारखे तुटून जातात.चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी.

Zodiac | अपयश आल्यास काचेप्रमाणे तुटून जातात या 4 राशींचे लोक, तुमची रास तर यामध्ये नाही ना ?
zodiac
| Updated on: Feb 22, 2022 | 9:47 AM
Share

मुंबई : आयुष्य चढ उतारांनी बनलेले आहे. जीवनात कधी यश (Success) तर कधी अपयशांना सामोरे जावे लागते. पण आपल्या पैकी अनेक जण अपयशाचा विचार करुनही अस्वस्थ होतात त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास (Confidence) कमी होतो. अपयशाबद्दल वाईट वाटणे ठीक आहे, परंतु जे नाही ते म्हणजे त्यांचा विचार करत राहणे आणि कधीही पुढे न जाणे हे अयोग्य आहे. यामुळे तुम्हाला फक्त वाईटच वाटत नाही आणि तुमचा आत्मविश्वास नष्ट होतो पण त्यामुळे तुमची काम करण्याची आवड देखील कमी होते. राशीचक्रातील (Rashichakra) काही राशी अशा आहेत ज्या अपयशाच्या विचारांनीच हैराण होतात. जर अपयश आलेच तर ते काचेसारखे तुटून जातात.चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी.

तूळ तुळ राशींच्या व्यक्तींना अपयशातून सावरण्यासाठी वेळ लागतो. सतत अपयशाचा विचार करून ते स्वतःला हतबल करतात. सर्वोत्तम कामगिरी न केल्याबद्दल ते स्वतःला दोष देतात. भूतकाळातील अपयशाची आठवण करून तेच तेच पुन्हा करण्याचा प्रयत्न करताना, या गोष्टीमुळे ते नेहमीच दु:खी असतात.

मेष मेष राशीचे लोक देखील अपयश हाताळण्यास असमर्थ असतात. त्यांच्या स्वत: कडून मोठ्या अपेक्षा असतात आणि जेव्हा ते त्यांच्या पूर्तता करत नाहीत, तेव्हा त्यांच्यासाठी सर्वकाही चुकीच असतं.

कर्क कर्क राशींच्या व्यक्तीसुद्धा मेष प्रमाणे अपयश हाताळू शकत नाही. ते नेहमी सर्वोत्कृष्ट होण्याचे ध्येय ठेवतात पण तसे न झाल्यास ते जीवनातील व्यावहारिकता विसरतात. ठरवल्याप्रमाणे गोष्टी कधीच घडत नाहीत ही गोष्ट ते विसरुन जातात.

धनु धनु राशीच्या लोकांसाठी अडचणींवर मात करणे किंवा हाताळणे कठीण होते. ते भूतकाळाचा विचार करत राहतात. गोष्टी बदलण्याऐवजी काय चुकलं याचा विचार करत राहतात. त्यांना पुढे जाण्यासाठी आणि अपयश स्वीकारण्यासाठी खूप वेळ आणि धैर्य लागते ते या राशींच्या लोकांमध्ये कमी असते.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या :

Chanakya Niti : आयुष्यामध्ये यशाची शिखरे गाठायची असतील तर ‘या’ 5 लोकांपासून दोन हात लांबच राहा!

Rashifal : ‘या’ 3 राशींच्या लोकांच्या डोक्याचा ताप वाढण्याची शक्यता, खर्चावर लगाम ठेवा!

Vastu tips : नात्यामधील सततचे तणाव दूर करण्यासाठी बेडरूममध्ये ठेवा या गोष्टी आणि गोडवा वाढवा!

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.