AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Astrological Mistakes: या गोष्टी कधीच कोणाकडे मागू नका, नाहीतर कंगाल व्हाल

Astrological Mistakes : ज्योतिष शास्त्रानुसार, कोणत्याही व्यक्तीने जीवनातील काही गोष्टी ओळखीच्या लोकांकडून बिलकूल मागे घेऊन नयेत. कारण असे केल्याने आपल्या जीवनात गंभीर संकटाचा सामना करावा लागतो. यामुळे जीवनात दुःख वाढू शकतं असं म्हणतात.

Astrological Mistakes: या गोष्टी कधीच कोणाकडे मागू नका, नाहीतर कंगाल व्हाल
या वस्ती कधीच कोणाकडून घेऊ नकाImage Credit source: social media
| Updated on: Mar 19, 2025 | 12:38 PM
Share

Astrological Mistakes : प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात ग्रह नक्षत्रांचा विशेष प्रभाव असतो. आपल्या जीवनात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूवर कोणत्या ना कोणत्या ग्रहाचा किंवा नक्षत्राचा प्रभाव असतो, असं म्हणतात. जाणूनबुजून किंवा नकळत आपण आपल्या आयुष्यात काही चुका करतो ज्यामुळे आपल्याला ग्रहणाचे दुष्परिणाम भोगावे लागतात. काही गोष्टी हाताळताना किंवा घेण्या-देण्यात आपण अशा चुका करतो की त्या घेतल्यावर आपल्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. ज्योतिष शास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत, ज्या आपण चुकूनही कोणाकडूनही घेऊ नयेत. पण चुकून अशा गोष्टी घेतल्या तर त्याचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होऊ शकतो. अशा कोणत्या गोष्टी आहेत, चला जाणून घेऊया.

जर कोणी नातेवाईक किंवा मित्र तुम्हाला मंदिराचा पवित्र धागा किंवा राख देत असेल तर ते घेऊ नका. जर तुम्ही ते नाकारू शकत नसाल तर ते घ्या आणि एखाद्या वनस्पतीमध्ये किंवा पाण्यात विसर्जित करा.

  1. एखाद्या व्यक्तीने तुम्हाला पांढरी मिठाई दिली तर बिलकूल खाऊ नका, ती मिठाई मातीत पुरा किंवा एखाद्या झाडाजवळ ठेवून द्या.
  2. एखाद्या फुलविक्रेत्याने तुम्हाला लवंगा दिल्या तर चुकूनही घेऊ नका, नाहीतर तुमचे आयुष्य संकटात येऊ शकतं.
  3. चुकूनही दुसऱ्या व्यक्तीकडून मीठ, मिरपूड, माचिस किंवा आगपेटी इत्यादि गोष्टी हातात घेऊ नये, यामुळे जीवनात त्रास वाढतो आणि शत्रूही वर्चस्व गाजवू लागतात. फुकटात मीठ घेतल्याने माणसाला कर्ज आणि गरिबीचा फटका सहन करावा लागतो,असं म्हणतात.
  4. गरज भासली तरी कोणाकडूनही फुकटात रुमाल किंवा सुई किंवा दोरा घेऊ नये. अन्यथा तुमच्या आयुष्यात संकटे वाढतील. यामुळे तुमच्या आयुष्यात त्या व्यक्तीसोबतचे तुमचे नाते बिघडण्याची शक्यता असते.
  5. कधीच कोणत्याही व्यक्तीकडूनचप्पल किंवा लोखंडी अथवा चामड्याची वस्तू भेट म्हणून किंवा अगदी उधारीतही घेऊ नये. यामुळे तुम्हाला शनीच्या त्रासाला सामोरे जावे लागू शकतं.
  6. सावध रहा – जर तुम्हाला कोणत्याही व्यक्तीकडून चामड्याची वस्तू, लोखंडी वस्तू, सुई, धागा, मीठ किंवा रुमाल घ्यायचा असेल तर त्या बदल्यात तुम्ही त्याला काहीतरी द्यावे. अन्यथा, तुम्हाला तुमच्या नातेसंबंधातील कटुतेसह शनीच्या त्रासाला सामोरे जावे लागेल.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'.
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?.
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा.
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा....
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा.....
"'लाडकी बहीण' बंद व्हावी म्हणून कोर्टात जाणारा नानांचा माणूस..."
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं...
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं....
मस्ती करणारे दोन पायांवर घरी जाणार नाहीत, नितेश राणेंचे मोठे वक्तव्य
मस्ती करणारे दोन पायांवर घरी जाणार नाहीत, नितेश राणेंचे मोठे वक्तव्य.
जुन्नरचा आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात अन् सरकारकडे काय मागणी
जुन्नरचा आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात अन् सरकारकडे काय मागणी.
BMC निवडणुकीनंतर...महायुतीच्या भविष्यावर रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य
BMC निवडणुकीनंतर...महायुतीच्या भविष्यावर रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य.