AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या 6 परिस्थितीत कितीही काही केलं तरी माणूस दु:खी असतोच…!

Chanakya Niti : असं म्हणतात की एखादी व्यक्ती त्याच्या स्वतःच्या दु:खाचे स्वत:च कारण असतो. परंतु जर ही गोष्ट वास्तविकतेच्या आधारावर तपासून पाहिली तर काही वेळा एखादी परिस्थिती एखाद्या व्यक्तीला दु:खी होण्यास भाग पाडते.

Chanakya Niti : या 6 परिस्थितीत कितीही काही केलं तरी माणूस दु:खी असतोच...!
Acharya_Chanakya
| Edited By: Akshay Adhav | Updated on: Jul 04, 2021 | 8:03 AM
Share

Chanakya Niti : असं म्हणतात की एखादी व्यक्ती त्याच्या स्वतःच्या दु:खाचे स्वत:च कारण असतो. परंतु जर ही गोष्ट वास्तविकतेच्या आधारावर तपासून पाहिली तर काही वेळा एखादी परिस्थिती एखाद्या व्यक्तीला दु:खी होण्यास भाग पाडते. माणूस हा एक समाजशील प्राणी आहे जो परिस्थितीचा गुलाम आहे. परिस्थितीतून बाहेर पडणे, मन स्थिर ठेऊन परिस्थितीवर विजय मिळवणं या वाटतात तेवढ्या सहज आणि सोप्या गोष्टी नाहीयत तसंच सर्वसाधारपणे सामान्य माणसाच्या हाती बऱ्याच गोष्टी नसतात. मग अशा कोणत्या परिस्थिती असतात, तिथे सगळं काही केल्यानंतरही माणसाला वाट्याला त्या क्षणाला दु:खच येतं, आपण पाहूया…! (Chanakya Niti No matter how much you do in these 6 situations man is still sad)

आचार्य चाणक्य यांनी देखील चाणक्य नितीत अशा घटनांचं वर्णन केले आहे ज्यामध्ये माणूस दररोज कणाकणाने जळत असतो. या परिस्थितीत अडकलेल्या माणसाचे मन दररोज आगीसारखे जळत असते. त्या 6 परिस्थिती कोणत्या, तर पुढीलप्रमाणे….

कांता-वियोग: स्वजनामानो, ऋणस्य शेष: कुनृपस्य सेवा दरिद्रभावो विषमा सभा च, विनाग्निना ते प्रदहन्ति कायम्

1. आचार्य चाणक्य यांच्या मते, एखाद्या व्यक्तीची बायको किंवा प्रेयसीशी असलेले संबंध खूप मधुर असतात. पण जेव्हा या नात्यात दुरावा येतो तेव्हा प्रत्येकजण अस्वस्थ होतो. अशी व्यक्ती मनामध्ये प्रत्येक क्षण आगीसारखी जळत असते. प्रत्येक क्षणी त्याच्या मनात याच गोष्टींचं तांडव सुरु असतं.

2.अपमान एक घोट आहे जो कुणालाही प्यावासा वाटत नाही. एखाद्या व्यक्तीस त्याच्या मित्राने किंवा नातेवाईकाने अपमानास्पद वागणूक दिली तर तेव्हाची परिस्थिती त्याला खूप अस्वस्थ करते. अशी व्यक्ती इच्छा असूनही आपला अपमान विसरु शकत नाही. त्याच्या मनात तो अपमान कायमस्वरुपी घर करुन राहतो.

3. एखाद्याकडून कर्ज घेणे खूप सोपे आहे, परंतु ते परत करणे तितकेच कठीण आहे. एखाद्याने दुसऱ्याकडून कर्ज घेतल्यानंतर ते आपल्याला फेडायचंय हा विचार त्याच्या मनात सतत येत असतो. कर्जाचा विचार माणसाला शांत झोपू देत नाही.

4. जे लोक कपटी किंवा चरित्रहिन लोकांच्या सेवेशी असतात, ते लोक नेहमी दु:खी असतात. असे लोक प्रत्येक क्षणी चांगल्या-वाईटाचा विचार करत असतात. त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणी त्यांच्या मनात विचारांचं काहूर माजतं.

5. आपल्याकडे गरीबी हा एक शाप समजली जाते. खरं तर, गरीब माणूस पैशांअभावी बऱ्याच गोष्टी पणाला लावतो. त्याला आयुष्यात बर्‍याच समस्यांचा सामना करावा लागतो. म्हणूनच गरीब माणूस नेहमीच दु: खी असतो आणि तो नेहमी आपलं दारिद्र्य आपल्या मनात ठेवत राहतो.

6. खूप लोकांसाठी आपण खूप काही केले तरी हे ते कधीही स्वीकारत नाहीत. एखाद्या व्यक्तीला अशा लोकांमध्ये रहावं लागलं तर ती एक प्रतारणा आहे. अशी व्यक्ती प्रत्येक क्षणी अस्वस्थ होते आणि या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी प्रार्थना करते.

(Chanakya Niti No matter how much you do in these 6 situations man is still sad)

हे ही वाचा :

Chanakya Niti | व्यक्तीच्या या चार सवयींमुळे लक्ष्मी टिकत नाही, संपूर्ण आयुष्य काढावं लागतं गरिबीत

Chanakya Niti | ज्या व्यक्तीत असतात हे 4 गुण, ती मोठ्या-मोठ्या संकटांना तोंड देऊ शकते

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक