AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कधी आहे सूर्यग्रहण? ग्रहणापूर्वी चमकणार ‘या’ 5 राशींचं भाग्य, कोणती आहे तुमची रास?

सूर्यग्रहणानंतर 'या' 5 राशींच्या आयुष्यात मोठे बदल होणार आहे. सूर्यग्रहणापूर्वी चार प्रमुख ग्रह त्यांची गती बदलतील. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या गतीमध्ये असा बदल खूप महत्त्वाचा मानला जातो आणि त्याचा विशेष परिणाम होतो असं दोखील मानलं जातं.

कधी आहे सूर्यग्रहण? ग्रहणापूर्वी चमकणार 'या' 5 राशींचं भाग्य, कोणती आहे तुमची रास?
फाईल फोटो
| Updated on: Sep 15, 2025 | 9:58 AM
Share

ग्रहणाचं हिंदू संस्कृतीमध्ये फार महत्त्व आहे. यंदाच्या वर्षी 21 सप्टेंबर 2025 रोजी सूर्यग्रहण होणार आहे, सूर्यग्रहणापूर्वी सूर्य, बुध, मंगळ आणि शुक्र हे ग्रह त्यांच्या गतीमध्ये बदल करतील. या बदलामुळे काही राशींच्या जीवनात महत्त्वाचे बदल दिसून येतील. आता पाहूया या गती बदलामुळे कोणत्या राशीच्या व्यक्तींच्या जीवनात मोठे बदल होतील. ज्यामुळे राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील.

मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ करिअरमध्ये प्रगतीचा काळ ठरू शकतो. बऱ्याच काळापासून रखडलेली कामं लवकर पूर्ण होण्याची शक्यता आहे. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी देखील हा काळ अनुकूल आहे. तुमचे कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास तुम्हाला यश देईल. आरोग्य चांगले राहील आणि संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे.

कर्क राशीच्या लोकांसाठी कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे. या काळात नवीन संधी उपलब्ध होतील आणि जोडीदाराकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. मित्र आणि नातेवाईक तुमच्या पाठीशी असतील. जर तुम्ही काम आणि वैयक्तिक जीवनात योग्य संतुलन राखू शकलात तर तुम्हाला फायदा होईल. गुंतवणुकीसाठी देखील हा काळ शुभ मानला जातो.

मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ अनुकूल राहील. तुम्ही आध्यात्मिक कार्यात आणि नवीन योजनांमध्ये रस दाखवू शकता. ध्यान, योग किंवा धार्मिक कार्य तुम्हाला मानसिक शांती आणि स्थिरता देईल. यासोबतच, तुम्ही भविष्यातील तुमच्या योजना एका नवीन दृष्टिकोनातून पाहू शकाल.

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी, हा काळ विवाह आणि भागीदारीसाठी शुभ ठरू शकतो. नातेसंबंधांमध्ये सकारात्मकता वाढेल आणि जुने गैरसमज दूर होतील. व्यवसाय भागीदारासोबत काहीतरी नवीन सुरू करण्यासाठी हा अनुकूल काळ असेल.

कन्या राशीच्या लोकांच्या आर्थिक परिस्थितीत या काळात लक्षणीय बदल दिसून येऊ शकतात. पैशाच्या बाबतीत दिलासा मिळेल आणि अडकलेल्या पैशातून किंवा जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकेल. उत्पन्न वाढवण्याच्या नवीन संधी उघडतील. आर्थिक नियोजनाचे पालन केल्यास चांगले परिणाम मिळतील. आरोग्य चांगले राहील आणि ऊर्जा वाढेल.

(टीप: TV9 कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. हा लेख केवळ धार्मिक श्रद्धा आणि रीतिरिवाजांच्या आधारे सादर केला आहे.)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.