AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastushastra : तुम्हालाही घरात सतत ही गोष्ट दिसते का? तर आजच सावध व्हा , असतात गरिबीचे संकेत

वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या आयुष्यात काही बदल घडणार असतात, तेव्हा त्याचे संकेत तुम्हाला आधीच मिळतात. परंतु अनेकांना हे संकेत ओळखता येत नाहीत, तर जे लोक हे संकेत ओळखतात ते आधीच सावध होतात, त्यामुळे त्यांचं नुकसान होत नाही. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रात नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.

Vastushastra : तुम्हालाही घरात सतत ही गोष्ट दिसते का? तर आजच सावध व्हा , असतात गरिबीचे संकेत
vastu shastraImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 20, 2026 | 9:11 PM
Share

वास्तुशास्त्रानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात काही मोठे बदल घडणार असतात, तेव्हा ते अचानक घडत नाहीत, तर असे बदल घडण्यापूर्वी त्या व्यक्तीला विशिष्ट संकेत मिळत असतात. हे संकेत आपल्याला ओळखता आले पाहिजे. जर हे संकेत आपण ओळखले तर आपण वेळीच सावध होऊ, त्यामुळे भविष्यातील मोठं नुकसान टळतं. समजा एखादा व्यक्ती अचानक श्रीमंत होणार असेल तर त्याला काही विशिष्ट संकेत मिळतात. जसं की सकाळी उठल्यानंतर भरद्वाज पक्षाचं दर्शन होतं, सकाळी उठताच शंखनाद ऐकू येतो, कधी-कधी देवी देवता स्वप्नात येतात. घरावर पैशांचा पाऊस पडत आहे, असं स्वप्न पडतं. हे सर्व शुभ संकेत असतात, याचाचा अर्थ असा होतो, की लवकरच तुम्ही श्रीमंत होणार आहात. तुमच्या आयुष्यात मोठा बदल होणार आहे, मात्र जेव्हा तुमचं काही नुकसान होणार असतं, तुम्ही आजार पडणार असता, किंवा तुमच्या आयुष्यात एखादं मोठं आर्थिक संकट येणार असतं, तेव्हा देखील तुम्हाला काही संकेत मिळतात, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

घरात गरिबी येण्याचे संकेत – जर तुमच्या घरात वारंवार कोळ्यांचे जाळे दिसू लागले तर सावध व्हा कारण हे घरात गिरीबी येण्याचे संकेत असू शकतात, असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे. त्यामुळे घरात कधीही कोळ्याची जाळी होणार नाहीत, याची काळजी घ्या. जर समजा घरात कोळ्याची जाळी झालीच तर त्यांना ताबडतोब नष्ट करा, अशा जाळ्यांमुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो, तुम्हाला आर्थिक फटका बसण्याची शक्यता असते. अशा जाळ्यांमुळे घरात विविध प्रकारचे दोष निर्माण होतात, असं वास्तुशास्त्र सांगतं.

घर स्वच्छ ठेवा – वास्तुशास्त्रानुसार आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार जे घर स्वच्छ असतं, ज्या घरात कुठेही अडचण नसते, पसारा नसतो, अशा घरावर सदैव लक्ष्मी मातेचा आशीर्वाद असतो, अशा घरात कधीही पैशांची कमी जणवत नाही, कुटुंबप्रमुखाला कधीही आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत नाही. घराची तिजोरी सदैव पैशांनी भरलेली राहते. त्यामुळे आपलं घर नेहमी स्वच्छ ठेवावं असा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा...
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा....
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन.
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल.
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं चक्रावून टाकणारं कनेक्शन
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं चक्रावून टाकणारं कनेक्शन.
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट...
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट....
मोठी खळबळ! राष्ट्रवादीत फूट पडणार? 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात
मोठी खळबळ! राष्ट्रवादीत फूट पडणार? 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात.
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय....
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय.....
मोटागावकरचा सर्वात धक्कादायक कांड, 2022 पासूनच पेपरफुटीची तयारी...
मोटागावकरचा सर्वात धक्कादायक कांड, 2022 पासूनच पेपरफुटीची तयारी....
पवारांकडून मोदींचं कौतुक, आता फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले....
पवारांकडून मोदींचं कौतुक, आता फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले.....
मोठी घोषणा! राज्यातील150 कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या, मुख्यमंत्री...
मोठी घोषणा! राज्यातील150 कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या, मुख्यमंत्री....