AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

130 कोटी भारतीयांच्या जिव्हारी लागलेला ‘तो’ पराभव अजूनही डोक्यात, टीम इंडियाच्या रणरागिनी बदला घेणार का?

टी 20 वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या जेतेपदासाठी चार संघ उपांत्य फेरीत भिडणार आहेत. ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचा यात समावेश आहे. उपांत्य फेरीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना होणार आहे.

130 कोटी भारतीयांच्या जिव्हारी लागलेला 'तो' पराभव अजूनही डोक्यात, टीम इंडियाच्या रणरागिनी बदला घेणार का?
T20 World Cup स्पर्धेत भारताच्या वाघिणी ऑस्ट्रेलियाच वचपा काढणार!तेव्हा तोंडचा घास हिरावून नेला होता
| Updated on: Feb 22, 2023 | 2:31 PM
Share

मुंबई : आयसीसी वुमन्स टी 20 वर्ल्डकप स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. आता जेतेपदासाठी चार संघ उपांत्य फेरीत भिडणार आहेत. ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचा यात समावेश आहे. उपांत्य फेरीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना होणार आहे. ऑस्ट्रेलियाने साखळी फेरीत चार पैकी चार सामने जिंकत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. तर भारताने चार पैकी तीन सामने जिंकत उपांत्य फेरी गाठली आहे. साखळी फेरीत इंग्लंडने भारताचा 11 धावांनी पराभव केला होता. तसं पाहिलं उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचं पारडं जड आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत पाच जेतेपदांवर नाव कोरलं आहे. तर गेल्या टी 20 वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केलं होतं. त्यामुळे पहिल्या वहिल्या जेतेपदाचं भारतीय वाघिणींचं स्वप्न भंगलं होतं.आता त्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी भारतीय संघाला चालून आली आहे.

काय झालं होतं टी 20 वर्ल्डकप 2020 स्पर्धेत

टी 20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना झाला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 4 गडी गमवून 184 धावा केल्या आणि विजयासाठी 185 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना भारतीय महिला संघ 99 या धावसंख्येवर बाद झाला. त्यामुळे जेतेपदाचं स्वप्न भंगलं होतं.

ऑस्ट्रेलिया आणि भारताची टी 20 स्पर्धेतील स्थिती

टी 20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाचं पारडं जड आहे. दोन्ही संघ पाचवेळा आमनेसामने आले आहेत. यात ऑस्ट्रेलियाने 4 वेळा भारताला पराभूत केलं आहे. फक्त एका सामन्यात भारताला विजय मिळवता आला आहे. मागचे सलग तीन सामने भारताने गमावले आहे. त्यामुळे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघावर दबाव दिसून येत आहे.

उपांत्य फेरीचे सामने

  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (23 फेब्रुवारी 2023, गुरुवारी)
  • इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका (24 फेब्रुवारी 2023, शुक्रवार)
  • अंतिम फेरीचा सामना 26 फेब्रुवारी 2023, रविवार

भारतीय संघ- हार्लीन देओल, जेमिह रॉड्रिग्स, सब्बिनेनी मेघना, शफाली वर्मा, स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, हरमनप्रीत कौर (कर्णधार), पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, रिचा घोष, यास्तिका भाटिया, अंजली सरवानी, मेघना सिंग, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग, शिखा पांडे

ऑस्ट्रेलियन संघ- बेथ मूने, ग्रेस हॅरिस, मेग लॅनिंग (कर्णधार), अॅनाबेल सुथरलँड, अशले गार्डनर, इलिस पेरी, हिथर ग्रॅहम, जेस जोनस्सेन, किम गार्थ, तहिला मॅग्राथ, अलिसा हीली, अलाना किंग, डार्सी ब्राउन, जॉर्जिया वारेहम, मेगन स्कूट

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.