AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asian Games 2026 : एशियन गेम्ससाठी टीम इंडियाची घोषणा, गोल्ड मेडल जिंकून देणाऱ्या ऋतुराजला संधी नाही

India squad for Asian Games 2026 : बीसीसीआय निवड समितीने एशियन गेम्स 2026 स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. टीम इंडियाने गेल्या स्पर्धेत ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात सुवर्ण पदक पटकावलं होतं.

Asian Games 2026 : एशियन गेम्ससाठी टीम इंडियाची घोषणा, गोल्ड मेडल जिंकून देणाऱ्या ऋतुराजला संधी नाही
Ruturaj Gaikwad Team IndiaImage Credit source: PTI
| Updated on: Jun 06, 2026 | 11:54 PM
Share

बीसीसीआय निवड समितीने 6 जून रोजी आगामी एशियन गेम्स 2026 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. श्रेयस अय्यर या स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर तिलक वर्मा उपकर्णधार म्हणून खेळणार आहे. तसेच निवड समितीने भारताचा वेगवान आणि प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह याला या स्पर्धेसाठी संधी दिली आहे. सोबतच 15 वर्षांचा स्टार युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याचीही निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

जसप्रीत बुमराहचा समावेश

बीसीसीआयने आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यातील टी 20I मालिकेसाठी जसप्रीत बुमराहचा समावेश केलेला नाही. मात्र बुमराहला एशियन गेम्ससाठी बुमराहचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे बुमराह आता थेट एशियन गेम्स स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. त्यामुळे बुमराह या महत्त्वाच्या स्पर्धेत कशी कामगिरी करतो याकडे भारतीय चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

ऋतुराज गायकवाडला डच्चू

टीम इंडिया या स्पर्धेतील गतविजेता आहे. ऋतुराज गायकवाड याने त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाला 2023 साली विजयी केलं होतं. टीम इंडियाने तेव्हा अंतिम सामन्यात विजय मिळवून सुवर्ण पदक मिळवलं होतं. त्यामुळे टीम इंडियासमोर यंदा सुवर्ण पदक कायम ठेवण्याचं आव्हान असणार आहे.

एशियन गेम्स स्पर्धा आणि टीम इंडियाचे खेळाडू

स्पर्धेला केव्हापासून सुरुवात?

दरम्यान एशियन गेम्स स्पर्धेचं 17 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. या 10 संघांमध्ये टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, नेपाळ, जपान, मलेशिया, हाँगकाँग आणि ओमानचा समावेश आहे.

एशियन गेम्ससाठी टीम इंडिया : श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन, ईशान किशन, शिवम दुबे, नीतीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंह आणि जसप्रीत बुमराह.

2 मल्टी डे मॅचसाठी संघ जाहीर

तसेच बीसीसीआयने श्रीलंका ए विरुद्धच्या 2 मल्डी डे सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. त्यानुसार ध्रुव जुरेल हा इंडिया ए टीमचं नेतृत्व करणार आहे. देवदत्त पडीक्कल उपकर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडणार आहे.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक