AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल 2026 स्पर्धेचं जेतेपद हुकल्यानंतर कर्णधार शुबमन गिलने मन केलं मोकळं, म्हणाला…

आयपीएल 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत गुजरात टायटन्सला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. त्यामुळे गुजरात टायटन्सचं दुसऱ्यांदा जेतेपद जिंकण्याचं स्वप्न भंगलं. या पराभवानंतर कर्णधार शुबमन गिलने आपलं मन मोकळं केलं आणि काय चुकलं ते सांगितलं.

आयपीएल 2026 स्पर्धेचं जेतेपद हुकल्यानंतर कर्णधार शुबमन गिलने मन केलं मोकळं, म्हणाला...
आयपीएल 2026 स्पर्धेचं जेतेपद हुकल्यानंतर कर्णधार शुबमन गिलने मन केलं मोकळं, म्हणाला...Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Jun 01, 2026 | 12:46 AM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सला 5 गडी राखून पराभूत केलं. या सामन्यात गुजरात टायटन्सने विजयासाठी 156 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान आरसीबीने 5 गडी गमवून 18 व्या षटकात पूर्ण केलं. या सामन्यावर पूर्णपणे आरसीबीची पकड राहिली. नाणेफेकीचा कौल जिंकण्यापासून गोलंदाजी आणि फलंदाजीतही आरसीबी वरचढ ठरली. या सामन्यात गुजरात टायटन्स कुठे नव्हतं. हा सामना गुजरात टायटन्सच्या पावरप्लेपासून आरसीबीकडे झुकलेला दिसला. आरसीबीने पावरप्लेच्या पहिल्या सहा षटकात विजयासाठी धावांचा निम्मा पल्ला गाठला होता. त्यामुळे गुजरात टायटन्सच्या पराभवाची स्क्रिप्ट आणखी पक्की झाली. आरसीबीच्या दोन विकेट झटपट गेल्यानंतर दबाव वाढेल असं वाटलं होतं. पण तसं काही घडलं नाही. विराट कोहली तर तुटून पडला आणि जेतेपद मिळवून दिलं. या पराभवानंतर गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलने आपल्या भावना व्यक्त केल्या.

काय म्हणाला शुबमन गिल?

गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल म्हणाला की, ‘आम्ही 180-190 धावांच्या जवळपास पोहोचलो असतो, तर सामना चांगला झाला असता. पहिल्या तीन-चार षटकांमध्ये वेगवान गोलंदाजांना चेंडू थोडा स्विंग मिळतो आणि सुरुवातीला दोन विकेट पडल्यानंतर आमची लय बिघडली. आम्ही पॉवरप्लेमध्ये 15-20 धावा दिल्या. मला वाटतं, आम्ही स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाजी करणाऱ्या संघांपैकी एक होतो. पहिले दोन सामने गमावल्यानंतर आम्ही पुनरागमन केले. खूप आनंद झाला. आम्ही विजय मिळवू शकलो नाही, पण जरी आम्ही ट्रॉफी जिंकली असती तरी सुधारणेला वाव होताच.’

आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार यानेही विजेतेपदानंतर आपलं मन मोकळं केलं. रजत पाटीदार म्हणाला की, ‘खूप छान वाटत आहे. जेव्हा आम्ही इथे आलो, तेव्हा गेल्या वर्षीच्या खूप आठवणी ताज्या झाल्या. माझ्या भावना व्यक्त करायला शब्द नाहीत, पण खूप छान वाटत आहे. हे एक सुस्पष्ट नियोजन होते. जेव्हा आम्ही नाणेफेक जिंकलो, तेव्हा पाठलाग करणे सोपे झाले. भुवी, हेझलवुड, रासिख, केपी सुयश आणि शेफर्ड यांनी संपूर्ण स्पर्धेत ज्या प्रकारे गोलंदाजी केली, ती खरोखरच उत्कृष्ट होती. मी आरसीबीचा कर्णधार होण्याचे आणि ट्रॉफी उंचावण्याचे स्वप्न कधीच पाहिले नव्हते. मला वाटते की हे नशिबातच लिहिले होते. त्यासाठी मी आभारी आहे. ‘

Follow Us
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा.

अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक.

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक

Kuldeep Yadav: टीम इंडियातून सतत डावललं, आता कुलदीप यादवने तडकाफडकी घेतला एक निर्णय, आता थेट दुसरीच वाट धरली.

Kuldeep Yadav: टीम इंडियातून सतत डावललं, आता कुलदीप यादवने तडकाफडकी घेतला एक निर्णय, आता थेट दुसरीच वाट धरली

कॉकरोजांच्या निशाण्यावर धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी, थेट निमिषा प्रधान हिच्या कॉलेजपर्यंत पोहोचले आंदोलन.

कॉकरोजांच्या निशाण्यावर धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी, थेट निमिषा प्रधान हिच्या कॉलेजपर्यंत पोहोचले आंदोलन

रिॲलिटी शोजचा ‘बाप’ येतोय.. सलमानसोबत क्रिकेटर करणार ‘बिग बॉस 20’चं सूत्रसंचालन, कोण असतील स्पर्धक?.

रिॲलिटी शोजचा ‘बाप’ येतोय.. सलमानसोबत क्रिकेटर करणार ‘बिग बॉस 20’चं सूत्रसंचालन, कोण असतील स्पर्धक?