AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : दुबईत टॉस ठरवणार मॅचविनर! नाणेफेकीचा निर्णय विरोधात लागला तर…

India vs Pakistan Asia Cup 2025 Super : अवघ्या 10 दिवसांमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हे 2 कट्टर प्रतिस्पर्धी दुसर्‍यांदा आमनेसामने येणार आहेत. उभयसंघातील सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.

IND vs PAK : दुबईत टॉस ठरवणार मॅचविनर! नाणेफेकीचा निर्णय विरोधात लागला तर...
Tilak Varma IND vs PAKImage Credit source: PTI
| Updated on: Sep 21, 2025 | 6:11 PM
Share

साखळी फेरीनंतर आशिया कप 2025 स्पर्धेतील सुपर 4 राऊंडमध्ये टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. भारताने साखळी फेरीत 14 सप्टेंबरला झालेल्या सामन्यात पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवला होता. त्यानंतर आता टीम इंडिया पुन्हा एकदा पाकिस्तानला पराभूत करण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना रविवारी 21 सप्टेंबरला दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. या सामन्यात टॉस फॅक्टर निर्णायक ठरणार आहे. दुबईत टॉस गमावणाऱ्या संघाच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

खेळपट्टी कुणासाठी फायदेशीर?

सामन्याचा निकाल कुणाच्या बाजूने लागणार यात खेळपट्टीची भूमिका निर्णायक ठरते. दुबईतील खेळपट्टी संथ आहे. तर अबुधाबीच्या तुलनेत संघांनी दुबईत सन्मानजनक धावसंख्या उभारली आहे. दुबईत फटकेबाजी करण्यासाठी फलंदाजाला स्थिरस्थावर होण्यासाठी काही वेळ घ्यावा लागतो. किमान मधल्या षटकांमध्ये असंच होतं.

दुबईची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी धोक्याची घंटा

दुबईची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी डोकेदुखी ठरली आहे. या स्पर्धेत आतापर्यंत दुबईत 6 पैकी 4 सामन्यांमध्ये विजयी धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाचा विजय झाला आहे. तसेच दुबईत आतापर्यंत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात एकूण 4 टी 20I सामने झाले आहेत. या चारही सामन्यांत दुसर्‍या डावात बॅटिंग करणाऱ्या संघाचा विजय झाला आहे.

भारतीय संघाने साखळी फेरीत 14 सप्टेंबरला पाकिस्तानवर मात केली होती. भारताने विजयी धावांचा पाठलाग करताना हा सामना 7 विकेट्सने जिंकला होता. यावरुन सिद्ध होतं की दुबईतील सामन्यात टॉस जिंकणाऱ्या संघाची पहिले फिल्डिंग करण्यास पसंती असते. त्यामुळे टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय योग्य ठरेल, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.

हवामान कसं असणार?

दुबई प्रचंड उष्णता असणार आहे. भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान तापमान हे तब्बल 35 ते 36 अंश दरम्यान राहण्याची शक्यता आहे. अशा प्रचंड उष्णेत बॉलिंग करणं गोलंदाजांसाठी आव्हानात्मक असते. त्यामुळे गोलंदाजांचा चांगलाच कस लागतो. तसेच या मैदानात रात्री हवामानात घट होते.त्यामुळे दव पडतो. अशा परिस्थितीत विजयी धावांचा बचाव करणं सोपं ठरत नाही. त्यामुळे टॉस जिंकणाऱ्या संघाचा दुबईत कायमच फिल्डिंग करण्याकडे कळ असतो. मात्र पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा याने 14 सप्टेंबरला टीम इंडिया विरुद्ध बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. परिणामी पाकिस्तानला हा सामना गमवावा लागला होता. त्यामुळे सलमान आता टॉस जिंकल्यानंतर आपली चूक सुधारणार की टीम इंडियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

Follow Us
अण्णा हजारे मैदानात! CJP आंदोलनाला मोठा पाठिंबा; मौन आंदोलनाची घोषणा
Anana Hajare | दिल्लीनंतर अण्णा हजारे मैदानात! CJP आंदोलनाला मोठा पाठिंबा; सरकारविरोधात मौन आंदोलनाची घोषणा
गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नेमकं काय घडलं?
Nashik Flood Rescue Operation | गोदावरीच्या पुरात अडकले नेपाळचे पर्यटक! नाशिकमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन, नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही...
Jantar Mantar Students Protest | दिल्लीतील आंदोलनास्थळवरून अपडेट्स : धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही बंद
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी...

सरकारची मोठी घोषणा! नीट परीक्षा पेपरफुटीत थेट निर्णय, नरेंद्र मोदी यांनी..

हमारी छोरिया छोरो से कम नहीं.. मुंबईत तरुणीने थेट अडवली पोलिसांची गाडी.

हमारी छोरिया छोरो से कम नहीं.. मुंबईत तरुणीने थेट अडवली पोलिसांची गाडी

Gold Rate Today: सोन्याने पुन्हा घेतली भरारी ! किती महागलं सोनं-चांदी ? आज 1 तोळा सोन्याचे दर...

Gold Rate Today: सोन्याने पुन्हा घेतली भरारी ! किती महागलं सोनं-चांदी ? आज 1 तोळा सोन्याचे दर..

मुलांची डोकी फुटताना बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..; समीर चौघुलेंकडून तीव्र संताप व्यक्त.

मुलांची डोकी फुटताना बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..; समीर चौघुलेंकडून तीव्र संताप व्यक्त

CJP Protest: प्रत्येक मुलाला, विद्यार्थ्याला… युवराज सिंगकडून संताप व्यक्त, आंदोलनाबाबत स्पष्टच बोलला.

CJP Protest: प्रत्येक मुलाला, विद्यार्थ्याला… युवराज सिंगकडून संताप व्यक्त, आंदोलनाबाबत स्पष्टच बोलला

जंतरमंतरवरच यावं लागेल… त्यांच्या घरी जाऊन वेळ वाया घालवणार नाही; आशुतोष रांका आक्रमक.

जंतरमंतरवरच यावं लागेल… त्यांच्या घरी जाऊन वेळ वाया घालवणार नाही; आशुतोष रांका आक्रमक