AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2025 : टीम इंडिया पहिल्या विजयासाठी तयार, भारताने दुबईत किती टी 20I सामने जिंकलेत?

India vs United Arab Emirates Asia Cup 2025 : भारतीय क्रिकेट संघ सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टी 20i आशिया कप स्पर्धेत आपला पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. या सामनयात भारत विरुद्ध यूएई आमनेसामने असणार आहेत. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.

Asia Cup 2025 : टीम इंडिया पहिल्या विजयासाठी तयार, भारताने दुबईत किती टी 20I सामने जिंकलेत?
Suryakumar Yadav Indian Cricket TeamImage Credit source: Bcci
| Updated on: Sep 10, 2025 | 6:32 PM
Share

टी 20 आशिया कप 2025 स्पर्धेची दणक्यात सुरुवात झाली. अफगाणिस्तानने स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात विजयी सुरुवात केली. अफगाणिस्तानने 9 सप्टेंबरला हाँगकाँगवर 94 धावांनी मात करत पहिला विजय मिळवला. अफगाणिस्तानचा हा टी 20 आशिया कप स्पर्धेच्या इतिहासातील एकूण पाचवा विजय ठरला. त्यानंतर स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात ए ग्रुपमधील 2 संघ आमनेसामने असणार आहेत. टीम इंडिया विरुद्ध यूएई यांच्यातील सामना हा 10 सप्टेंबरला होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या निमित्ताने भारतीय संघाने आतापर्यंत या मैदानात किती टी 20i सामने खेळले आहेत? याबाबत जाणून घेऊयात.

भारताची दुबईतील आकडेवारी

भारतीय संघाने आतापर्यंत दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये एकूण 10 टी 20i सामने खेळले आहेत. भारताची या मैदानातील विजयी टक्केवारी ही 60 आहे. भारताने या मैदानात 10 पैकी 6 सामने जिंकले आहेत.

भारताने दुबईत एकूण 5 संघांना पराभूत केलंय. तसेच भारताने या मैदानात पाकिस्तान विरुद्ध सर्वाधिक सामने जिंकले आहेत. भारताने दुबईतील या स्टेडियममध्ये पाकिस्तान विरुद्ध दोन्ही सामने जिंकले आहेत. त्याव्यतिरिक्त भारताने अफगाणिस्तान, स्कॉटलँड, नामिबिया आणि हाँगकाँग विरुद्ध प्रत्येकी 1-1 सामना जिंकला आहे. तर भारताला 4 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलंय.

यूएई विरुद्धचा दुसरा सामना

यूएई विरुद्ध भारत दोन्ही संघांची आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ ठरणार आहे. याआधी उभयसंघात एकमेव टी 20i सामना खेळवण्यात आला होता. भारताने हा सामना एकतर्फी फरकाने जिंकला होता. भारताने यूएईवर 9 विकेट्सने मात केली होती. तसेच दोन्ही संघ एकदिवसीय सामन्यांमध्ये 3 वेळा आमनेसामने आले होते. भारताने या तिन्ही सामन्यात विजय मिळवला होता. त्यामुळे आकडेवारी पाहता टीम इंडिया सरस आहे.

दरम्यान टीम इंडिया विरुद्ध यूएई यांच्यातील सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. तर 7 वाजून 30 मिनिटांन टॉस होईल. हा सामना टीव्हीवर सोनी स्पोर्टस नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर लाईव्ह मॅच मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहायला मिळेल.

ओपनिंग कोण करणार?

दरम्यान शुबमन गिल याचं अनेक महिन्यांनी टी 20I संघात कमबॅक झालं आहे. भारतासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा हे दोघे ओपनिंग करतात. मात्र शुबमनच्या कमबॅकमुळे संजूच्या बॅटिंग पोजिनशमध्ये बदल करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. तसेच संजूला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळणार की नाही? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. आता या दोन्ही प्रश्नांची उत्तर काही तासांतच मिळतील.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.