AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2025 : टीम इंडिया पहिल्या विजयासाठी तयार, भारताने दुबईत किती टी 20I सामने जिंकलेत?

India vs United Arab Emirates Asia Cup 2025 : भारतीय क्रिकेट संघ सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टी 20i आशिया कप स्पर्धेत आपला पहिला सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. या सामनयात भारत विरुद्ध यूएई आमनेसामने असणार आहेत. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.

Asia Cup 2025 : टीम इंडिया पहिल्या विजयासाठी तयार, भारताने दुबईत किती टी 20I सामने जिंकलेत?
Suryakumar Yadav Indian Cricket TeamImage Credit source: Bcci
| Updated on: Sep 10, 2025 | 6:32 PM
Share

टी 20 आशिया कप 2025 स्पर्धेची दणक्यात सुरुवात झाली. अफगाणिस्तानने स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात विजयी सुरुवात केली. अफगाणिस्तानने 9 सप्टेंबरला हाँगकाँगवर 94 धावांनी मात करत पहिला विजय मिळवला. अफगाणिस्तानचा हा टी 20 आशिया कप स्पर्धेच्या इतिहासातील एकूण पाचवा विजय ठरला. त्यानंतर स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात ए ग्रुपमधील 2 संघ आमनेसामने असणार आहेत. टीम इंडिया विरुद्ध यूएई यांच्यातील सामना हा 10 सप्टेंबरला होणार आहे. या सामन्याचं आयोजन हे दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या निमित्ताने भारतीय संघाने आतापर्यंत या मैदानात किती टी 20i सामने खेळले आहेत? याबाबत जाणून घेऊयात.

भारताची दुबईतील आकडेवारी

भारतीय संघाने आतापर्यंत दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये एकूण 10 टी 20i सामने खेळले आहेत. भारताची या मैदानातील विजयी टक्केवारी ही 60 आहे. भारताने या मैदानात 10 पैकी 6 सामने जिंकले आहेत.

भारताने दुबईत एकूण 5 संघांना पराभूत केलंय. तसेच भारताने या मैदानात पाकिस्तान विरुद्ध सर्वाधिक सामने जिंकले आहेत. भारताने दुबईतील या स्टेडियममध्ये पाकिस्तान विरुद्ध दोन्ही सामने जिंकले आहेत. त्याव्यतिरिक्त भारताने अफगाणिस्तान, स्कॉटलँड, नामिबिया आणि हाँगकाँग विरुद्ध प्रत्येकी 1-1 सामना जिंकला आहे. तर भारताला 4 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलंय.

यूएई विरुद्धचा दुसरा सामना

यूएई विरुद्ध भारत दोन्ही संघांची आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ ठरणार आहे. याआधी उभयसंघात एकमेव टी 20i सामना खेळवण्यात आला होता. भारताने हा सामना एकतर्फी फरकाने जिंकला होता. भारताने यूएईवर 9 विकेट्सने मात केली होती. तसेच दोन्ही संघ एकदिवसीय सामन्यांमध्ये 3 वेळा आमनेसामने आले होते. भारताने या तिन्ही सामन्यात विजय मिळवला होता. त्यामुळे आकडेवारी पाहता टीम इंडिया सरस आहे.

दरम्यान टीम इंडिया विरुद्ध यूएई यांच्यातील सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. तर 7 वाजून 30 मिनिटांन टॉस होईल. हा सामना टीव्हीवर सोनी स्पोर्टस नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर लाईव्ह मॅच मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहायला मिळेल.

ओपनिंग कोण करणार?

दरम्यान शुबमन गिल याचं अनेक महिन्यांनी टी 20I संघात कमबॅक झालं आहे. भारतासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा हे दोघे ओपनिंग करतात. मात्र शुबमनच्या कमबॅकमुळे संजूच्या बॅटिंग पोजिनशमध्ये बदल करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. तसेच संजूला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळणार की नाही? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. आता या दोन्ही प्रश्नांची उत्तर काही तासांतच मिळतील.

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.