AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs BAN : बांगलादेशने कांगारूंना वनडे मालिकेत 2-0 दिली मात, पराभवानंतर कर्णधार जोश इंग्लिस म्हणाला..

ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील दोन सामन्यानंतर बांगलादेशने 2-0 ने मालिका खिशात घातली. ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच बांगलादेशने द्विपक्षीय मालिकेत मात दिली. या मालिकेतील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार जोश इंग्लिस याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

AUS vs BAN : बांगलादेशने कांगारूंना वनडे मालिकेत 2-0 दिली मात, पराभवानंतर कर्णधार जोश इंग्लिस म्हणाला..
AUS vs BAN : बांगलादेशने कांगारूंना वनडे मालिकेत 2-0 दिली मात, पराभवानंतर कर्णधार जोश इंग्लिस म्हणाला..Image Credit source: PTI
| Updated on: Jun 11, 2026 | 9:07 PM
Share

ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला डकवर्थ लुईस नियमानुसार 5 विकेट राखून मात दिली आणि मालिका 2-0 ने जिंकली. या मालिकेतील पहिल्या सामन्यातही बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला डकवर्थ लुईस नियमानुसार 86 धावांनी नमवलं होतं. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत सलग दोन सामने गमवल्याने बांगलादेशने ही द्विपक्षीय मालिका जिंकली. त्यामुळे 14 जून रोजी होणारा तिसरा आणि शेवटचा सामना हा औपचारिक असणार आहे. दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार जोश इंग्लिसने आपलं मनोगत व्यक्त केलं आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार जोश इंग्लिस म्हणाला की, जेव्हा तुम्ही इतक्या लवकर तीन विकेट गमावता, तेव्हा सावरणे नेहमीच कठीण असते. मला वाटतं मार्नस आणि झेवियर यांच्यातील भागीदारी उत्कृष्ट होती. त्यांनी आम्हाला एका अशा धावसंख्येपर्यंत पोहोचवलं जी कदाचित अपेक्षेपेक्षा कमी होती, पण निदान त्यामुळे आम्हाला गोलंदाजीसाठी एक लक्ष्य तरी मिळालं. त्यांनी आम्हाला एका स्पर्धात्मक स्थितीत आणण्याचं जबरदस्त काम केलं.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पराभवाबाबत म्हणाला की, बांगलादेशची शेवटी झालेली ती भागीदारी निर्णायक ठरली. मला वाटतं ते खूप छान खेळले. आम्ही प्रथम फलंदाजी केल्याने पराभव झाला, मला तसं वाटत नाही. जर आम्ही सुरुवातीची काही षटकं विकेट न गमावता पार पाडली असती, तरीही ती खेळपट्टी फलंदाजीसाठी बऱ्यापैकी चांगली दिसत होती. ती पहिल्या सामन्याइतकी वेगवान किंवा उसळणारी नव्हती, पण त्यावर निश्चितपणे धावा करता येत होत्या. वैयक्तिकरित्या, मला चांगली सुरुवात मिळाली आणि मग मी एका महत्त्वाच्या टप्प्यावर बाद झालो, ज्यामुळे मदत झाली नाही.

पावसानंतर आणि डकवर्थ-लुईस नियमानुसार धावसंख्येच्या निकालानंतरही तुम्ही धावसंख्येचा बचाव करू शकाल असा तुम्हाला विश्वास होता का? यावर जोश इंग्लिस म्हणाला की, नक्कीच. अशा परिस्थितीत, तुम्हाला नेहमी विश्वास ठेवावा लागतो. तुम्हाला सर्वस्व पणाला लावून स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो. मला वाटले की नवीन चेंडूने खेळपट्टीवर अजूनही पुरेशी ताकद होती आणि जर आम्ही सुरुवातीला तीन-चार विकेट्स घेतल्या असत्या, तर आम्ही सामन्यात नक्कीच टिकून राहिलो असतो. मला वाटले की आम्ही मधल्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी केली आणि विकेट्स घेत राहिलो, ज्यामुळे आम्हाला एक खरी संधी मिळाली. पण त्या शेवटच्या भागीदारीने सामना आमच्या हातून निसटवून टाकला.

शेवटच्या सामन्यापूर्वी संघाला काय सांगशील? यावर जोश इंग्लिस म्हणाला की, आम्हाला खेळाच्या तिन्ही पैलूंमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. आमच्या काही खेळाडूंनी चांगली सुरुवात केली, पण कोणीही महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकले नाही. या बाबतीत आम्ही स्वतःला निराश केले आहे. असे असले तरी, या मालिकेत आतापर्यंत बांगलादेशने आमच्यावर मात केली आहे, त्यामुळे त्यांचे पूर्ण श्रेय त्यांनाच जाते. आम्ही पुन्हा संघटित होऊ, अधिक मजबूत होऊन परत येऊ आणि सकारात्मकतेने मालिका संपवण्याचा प्रयत्न करू.

Follow Us
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना