AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : भारताला दुसऱ्या सामन्याआधी झटका, ऑलराउंडर रायपूरमधील टी 20i मधून आऊट? कुणाला मिळणार संधी?

India vs New Zealand 2nd T20I Raipur : टीम इंडियाला न्यूझीलंड विरुद्ध नागपूरमधील विजयी सलामीनंतरही रायपूरमध्ये प्लेइंग ईलेव्हनमध्ये नाईलाजाने प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करावा लागू शकतो. जाणून घ्या नक्की कारण काय?

IND vs NZ : भारताला दुसऱ्या सामन्याआधी झटका, ऑलराउंडर रायपूरमधील टी 20i मधून आऊट? कुणाला मिळणार संधी?
Indian Cricket TeamImage Credit source: axar patel x account
| Updated on: Jan 23, 2026 | 5:39 PM
Share

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी 20i सामना शुक्रवारी 23 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे. या सामन्याचा थरार हा रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये रंगणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. टीम इंडिया या 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. अशात भारताचं नागपूरनंतर रायपूरमध्ये विजय मिळवत मालिकेतील आघाडी आणखी मजबूत करण्यावर लक्ष असणार आहे. मात्र भारतीय संघात दुसऱ्या सामन्यासाठी नाईलाजाने 1 बदल करावा लागणार असल्याची चिन्हं आहेत.

अक्षर पटेलच्या दुखापतीमुळे चिंता

भारताचा उपकर्णधार आणि ऑलराउंडर अक्षर पटेल याला दुखापतीमुळे दुसऱ्या टी 20i सामन्यातून बाहेर व्हावं लागू शकतं. अक्षरला नागूपरमध्ये फिल्डिंग दरम्यान दुखापत झाली होती. त्यामुळे अक्षरला मैदानाबाहेर जावं लागलं. त्यामुळे अक्षरची दुसऱ्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र बीसीसीआयकडून अक्षरच्या दुखापतीबाबत कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही.

नक्की काय झालं?

उभयसंघातील पहिला सामना हा 21 जानेवारीला नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. अक्षरला या सामन्यातील दुसऱ्या डावात आपल्याच बॉलिंगवर दुखापत झाली. अक्षरने न्यूझीलंडच्या फलंदाजाने मारलेला फटका रोखण्याच्या प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात अक्षरच्या बोटावर बॉल लागला. त्यामुळे अक्षरच्या बोटातून रक्त वाहू लागलं. त्यामुळे अक्षरवर मैदान सोडून बाहेर जाण्याची वेळ आली. त्यानंतर आतापर्यंत बीसीसीआयकडून अक्षरबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे अक्षर खेळणार की नाही? हे नक्की नाही. मात्र अक्षरला या दुसऱ्या सामन्यातून बाहेर व्हावं लागल्यास त्याच्या जागी कुणाला संधी मिळणार? हे जाणून घेऊयात.

अक्षरच्या जागी कुलदीपला समावेश?

दरम्यान अक्षर पटेल खेळणार की नाही? हे टॉसनंतरच स्पष्ट होईल. मात्र नाईलाजाने अक्षरला बाहेर व्हावं लागलं तर त्याच्या जागी कुलदीप यादव याला संधी मिळू शकते. आता रायपूरमध्ये अक्षरबाबत काय होतं? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दुसऱ्या टी 20i सामन्यासाठी भारताची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंह, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह आणि वरुण चक्रवर्ती.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.