AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 : ऑपरेशन सिंदूरनंतर आयपीएलच्या या सामन्यात बदल, ठिकाणही बदललं जाणार; जाणून घ्या

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचं भारताने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत 9 दहशतवादी ठिकाणांवर हल्ला चढवला. तसेच अनेक दहशतवाद्यांना यमसदनी पाठवलं. यामुळे भारत पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे. त्याचा परिणाम आयपीएल सामन्यांवरही होणार आहे.

IPL 2025 : ऑपरेशन सिंदूरनंतर आयपीएलच्या या सामन्यात बदल, ठिकाणही बदललं जाणार; जाणून घ्या
मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स
| Updated on: May 07, 2025 | 6:31 PM
Share

भारताने पाकिस्तानला पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर धडा शिकवला आहे. रणनितीनुसार 15 दिवसांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. या प्रत्युत्तरानंतर दोन्ही देशात तणाव वाढला आहे. इतकंच भारतात सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेवरही परिणाम झाला आहे. वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सीमेवरील संवेदनशील परिस्थिती लक्षात घेऊन धर्मशाळा येथे होणारा सामना हलवण्याचा निर्णय घेतला आहे.11 मे रोजी होणाऱ्या पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स या सामन्याचे ठिकाण बदलण्यात आल्याचे माहिती आहे. पंजाब आणि मुंबई यांच्यातील सामना 11 मे रोजी हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे होणार होता. पण पाकिस्तानकडून हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने सीमेला लागून असलेल्या राज्ये आणि शहरांमधील विमानतळ पुढील काही तासांसाठी बंद केले आहेत.

धर्मशाळा शहर आंतरराष्ट्रीय सीमेपासून फक्त 150 किलोमीटर अंतरावर असल्याने सर्वांच्या नजरा विशेषतः धर्मशाळा येथे होणाऱ्या सामन्यांवर आहेत. यावेळी धर्मशाळा विमानतळ देखील बंद आहे. अशा परिस्थितीत, पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याचे ठिकाण धर्मशाळेहून मुंबईत हलवण्यात येणार असल्याची माहिती आहे. प्लेऑफच्या दृष्टीने हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीत असून टॉप 4 मध्ये जागा मिळवण्यासाठी धडपड करत आहेत.

क्रिकबझच्या वृत्तानुसार, सध्याची स्थिती पाहता मुंबई इंडियन्सचा धर्मशाळा दौरा सध्यासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. हार्दिक पंड्याचा संघ 7 मे रोजी धर्मशाळेला रवाना होणार होता, पण आता हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. हा सामना मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियम किंवा डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवला जाऊ शकतो असे सांगितलं जात आहे. दरम्यान, पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना 8 मे रोजी धर्मशाळा येथे खेळवण्यात येणार होता. हा सामना देखील पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. याबाबत बीसीसीआय केंद्र सरकारशी संपर्कात आहे.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?