AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंडर 19 वर्ल्डकप जिंकल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा, विरारचा उल्लखे करत म्हणाले…

अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने देदिप्यमान कामगिरी केली. अंतिम सामन्यात पहिल्या डावापासून टीम इंडिया इंग्लंडवर भारी पडली. त्यामुळे त्यांना डोकंच वर काढता आलं नाही . भारताने हा सामना 100 धावांनी जिंकला.

अंडर 19 वर्ल्डकप जिंकल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा, विरारचा उल्लखे करत म्हणाले...
अंडर 19 वर्ल्डकप जिंकल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा, विरारचा उल्लखे करत म्हणाले...Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Feb 06, 2026 | 11:34 PM
Share

अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धा भारताने  कर्णधार आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात जिंकली. भारताने अंतिम सामन्यात इंग्लंडचा 100 धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 गडी गमवून 411 धावा केल्या. तसेच विजयासाठी 412 धावांचं आव्हान दिलं. पण इंग्लंडचा संघ 311 धावा करू शकला. भारताने हा सामना 100 धावांनी जिंकला आणि इतिहास रचला. भारताने सहाव्यांदा अंडर 19 वनडे वर्ल्डकपला गवसणी घातली आहे. या स्पर्धेत भारताने जबरदस्त कामगिरी केली. भारताने एकही सामना गमावला नाही. अंतिम फेरीत भारताने ऐतिहासिक कामगिरी केली. या विजयानंतर भारतात विजयोत्सव साजरा करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही टीम इंडियाचं कौतुक केलं.  मुख्यमंत्र्यांनी संघाचं कौतुक करताना विरारचा उल्लेख केला. त्याला कारणंही तसंच आहे. कर्णधार आयुष म्हात्रे हा विरारचा असल्याने त्यांनी हा उल्लेख केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत लिहिलं की, ‘विरार आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! आयसीसी अंडर 19 पुरुष क्रिकेट विश्वचषक 2026 जिंकल्याबद्दल टीम इंडियाचे हार्दिक अभिनंदन. विरारचा आपलाच मुलगा आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वाखाली या संघाने धैर्य, शिस्त आणि अढळ दृढनिश्चय दाखवला. अंतिम सामन्यात 175 (80) धावांची उत्कृष्ट खेळी केल्याबद्दल वैभव सूर्यवंशीचा विशेष अभिनंदन, ही कामगिरी या विजयाचा एक निर्णायक क्षण म्हणून लक्षात ठेवली जाईल. आपल्या तरुणांनी केवळ ट्रॉफीच जिंकली नाही तर देशाची मनेही जिंकली आहेत!’

कर्णधार आयुष म्हात्रे विजयानंतर म्हणाला की, ‘मी माझ्या भावना व्यक्त करू शकत नाही, पण क्रिकेटच्या प्रवासात आमच्यासाठी हा एक संस्मरणीय क्षण आहे. मुलांनी खूप चांगले खेळले आहे आणि आम्ही जे ध्येय ठेवले होते ते त्यांनी खूप चांगले केले. ते एक नैसर्गिक खेळ म्हणून खेळले. तर, हो, मी खरोखर आनंदी आहे. सूर्यवंशी फक्त ते करत राहतो. त्याच्यासाठी आमच्याकडे शब्द नाहीत, त्याने किती खेळ केला. पण हो, आम्हाला माहित आहे की तो एक उत्कृष्ट फलंदाज आहे. म्हणून त्याने या सामन्यात तो काय करू शकतो हे दाखवून दिले आहे. आम्हाला आनंद आहे की रोहित शर्मानेही विश्वचषक जिंकला आहे, हरमनप्रीतनेही आणि आता आम्ही तो वारसा पुढे नेत आहोत. म्हणून आम्हाला आनंद आहे की आम्ही वारसा पुढे नेत आहोत.’

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.