AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्य प्रशिक्षकपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वी गौतम गंभीरचं यो-यो टेस्टबाबत मोठं वक्तव्य, म्हणाला..

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाची आगेकूच सुरु आहे. या स्पर्धेनंतर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड पायउतार होणार आहे. यानंतर प्रशिक्षपदी कोण असेल हे अद्याप निश्चित नाही. पण गौतम गंभीरचं नाव आघाडीवर आहे. असं असताना गौतम गंभीरने यो यो टेस्टबाबत आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.

मुख्य प्रशिक्षकपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वी गौतम गंभीरचं यो-यो टेस्टबाबत मोठं वक्तव्य, म्हणाला..
| Updated on: Jun 14, 2024 | 5:58 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली आहे. नवा विजेता लवकरच जाहीर होणार आहे. टीम इंडिया जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानली जात आहे. पण या स्पर्धेपूर्वीच राहुल द्रविड याचा प्रशिक्षपदाच्या कार्यकाळातील शेवटची स्पर्धा असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यामुळे बीसीसीआयने प्रशिक्षपदासाठी अर्ज मागवले होते. कारण राहुल द्रविडचा कार्यकाळ संपताच ही धुरा योग्य व्यक्तीच्या हाती सोपवली जाईल. यात माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याचं नाव आघाडीवर आहे. गौतम गंभीर वर्ल्डकप विजेत्या संघाचा भाग होता. टी20 वर्ल्डकप आणि वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या विजयात त्याची महत्त्वाची भूमिका होती. तसेच कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलमध्ये त्याच्या नेतृत्वात दोन चषक पटकावले आहेत. तर मेंटॉरची भूमिका बजवताना यंदाचं जेतेपद कोलकात्याला मिळालं आहे. त्यात गौतम गंभीर हा आक्रमक स्वभावासाठी ओळखला जातो. त्यामुळे वरिष्ठ खेळाडूंचे त्याच्या नावानेच धाबे दणाणले आहेत. असं सर्व असताना मुख्य प्रशिक्षकपदी विराजमान होण्यापूर्वी गौतम गंभीरने यो-यो टेस्टवर टीका केली आहे.

भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून यो-यो टेस्ट हा चर्चेता विषय ठरला आहे. या टेस्टचा निकष निवडसाठी लावला जात होता. कोरोनापूर्वी टीम इंडियात खेळण्यासाठी ही चाचणी पास होणं आवश्यक होतं. पण कोरोना काळात हा नियम शिथिल करण्यात आला. आता गौतम गंभीरने या टेस्टवर टीकास्त्र सोडलं आहे. या चाचणीत खेळाडू पास झाला नाही तर त्याला डावलणं चुकीचं असल्याचं म्हंटलं आहे. खेळाडूने पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचं सिद्ध करणअयासाठी ही चाचणी पास करणं मला मान्य नाही. फिटनेसचा थेट संबंध ट्रेनरशी असायला हवा.

“यो-यो चाचणीमुळे एखाद्याची निवड होत नसेल तर ते चुकीचं आहे. तुम्हाला खेळाडूची प्रतिभा, लढाऊ कौशल्य, गोलंदाजी कौशल्य यावर आधारित निवड करावी लागेल. त्यांच्या तंदुरुस्तीवर काम करत राहणे आणि त्यांना शारीरिकदृष्ट्या सुधारणे हे प्रशिक्षकाचे काम आहे. जर कोणी यो-यो चाचणी उत्तीर्ण झाले नाही आणि संघासाठी निवडले नाही, तर मला वाटते की ते अन्यायकारक आहे.”, असं गौतम गंभीर म्हणाला. या चाचणीत युवराज सिंग, सुरेश रैना, अंबाती रायुडू, मोहम्मद शमी, संजू सॅमसन आणि वरुण चक्रवर्ती असे अनेक खेळाडू नापास झाले हे देखील विशेष आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.