AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका दिवसात धडाधड पाच मोठे निर्णय, ऑस्ट्रेलियातील पराभवानंतर बीसीसीआयचा आक्रमक पवित्रा

टीम इंडियाच्या निराशाजनक कामगिरीनंतर बीसीसीआयने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. खेळाडूंवर नवे नियम लागू केले आहेत. टीममधील खेळाडूंना आता एकत्रच बसमधून प्रवास करावा लागणार आहे. यासह पाच मोठे निर्णय घेतले आहेत.

एका दिवसात धडाधड पाच मोठे निर्णय, ऑस्ट्रेलियातील पराभवानंतर बीसीसीआयचा आक्रमक पवित्रा
| Updated on: Jan 14, 2025 | 8:14 PM
Share

टी20 वर्ल्डकप विजयानंतर टीम इंडियाला एकप्रकार उतरती कळा लागली आहे. श्रीलंकेतील वनडे मालिका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धची कसोटी मालिका गमवण्याची वेळ आली आहे. या सर्व पराभवाची कारण मीमांसा करण्यासाठी बीसीसीआयने बैठक बोलवली होती. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी बैठकीत मोठे निर्णय घेतले गेले. आता विदेशी दौऱ्यावर खेळाडू त्यांच्या पत्नींसोबत जास्त दिवस राहू शकणार नाही. इतकंच काय तर ट्रॅव्हेलसह खेळाडूंच्या सामानाच्या वजनाबाबत नियमात बदल केले जाणार आहेत. चला जाणून घेऊयात काय बदल केले ते.

विदेश दौऱ्यावर गेल्यानंतर एकीकडे मालिका सुरू असताना खेळाडूंचा फॅमिली टाईम सुरु असतो असं पाहिलं गेलं आहे. खेळाडू जास्तीत जास्त वेळ कुटुंबासोबत व्यतित करतात. त्याचा परिणाम खेळावर होतो. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बीसीसीआयने एक नियम तयार केली आहे. 45 दिवासांपेक्षा जास्त असलेल्या दौऱ्यावर खेळाडूंना पत्नींसोबत जास्तीत जास्त 14 दिवस राहता येईल. तसेच कमी दिवसांच्या दौऱ्यावेळी फक्त 7 दिवसांची मुभा असेल.

बीसीसीआयने पूर्ण संघाला एकत्र प्रवास करणं अनिवार्य केलं आहे. खेळाडूंना स्वत:च्या वाहनाने किंवा अन्य वाहनाने प्रवास करण्याची अनुमती नसेल. खेळाडूंना टीम बसनेच प्रवास करावा लागेल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळाडू वेगवेगळे फिरताना दिसले.

बीसीसीआयने बैठकीत खेळाडूंच्या वजनाबाबतही निर्णय घेतला आहे. आात खेळाडूंच्या सामानाचं वजन हे 150 किमीपेक्षा जास्त असेल तर बीसीसीआय त्याचे पैसे देणार नाही. 150 पेक्षा वरील वजनासाठी खेळाडूला स्वत: पैसे भरावे लागतील.

बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या मॅनेजवरही कारवाईचा बडगा उचलला आहे. टीम इंडियाच्या दौऱ्यावर हेड कोचसह कधीही मॅनेजर गेला नव्हता. पण गंभीरसोबत त्याचा मॅनेजर ट्रॅव्हेल करत होता. तसेच व्हिआयपी बॉक्समध्ये बसल्याचं दिसून आलं. आता गौरव गंभीरसोबत ट्रॅव्हेल करू शकणार नाही. तसेच त्याला व्हिआयपी बॉक्समध्येही बसण्याची परवानगी मिळणार नाही. हा नियम अन्य प्रशिक्षकांच्या मॅनेजरसाठीही लागू होणार आहे.

भारतीय खेळाडूंची कामगिरी निराशाजनक राहिली तर त्याच्या पगार कापला जाण्याची शक्यता आहे. असं केल्यास खेळाडू खेळाप्रती अधिक उत्तरदायी राहतील, अशी सूचना बैठकीत देण्यात आली. सामना गमावला तर त्याचा परिणाम खेळाडूंच्या खिशावर होऊ शकतो.

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.