AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत 1500 कोटींची कमाई अशीच झाली, या तीन सामन्यांचं मोठं योगदान

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत चांगली कमाई झाली आहे. त्यामुळे आयोजक आणि या स्पर्धेशी निगडीत ब्रँड्सचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. फक्त जाहिरातीतून हजारो कोटींची कमाई झाली आहे.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत 1500 कोटींची कमाई अशीच झाली, या तीन सामन्यांचं मोठं योगदान
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत 1500 कोटींची कमाई अशीच झाली, या तीन सामन्यांचं मोठं योगदानImage Credit source: Icc X account
| Updated on: Mar 13, 2026 | 6:49 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला प्रबळ दावेदार होती. त्या पद्धतीने टीम इंडियाने या स्पर्धेत खेळ दाखवला आणि जेतेपद मिळवलं. टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा आणि या स्पर्धेच्या इतिहासातील तिसरं जेतेपद मिळवलं. त्यामुळे संपूर्ण देशात आनंदाची लाट उसळली.  क्रिकेट वेड्या देशात या स्पर्धेचं आयोजन असल्याने प्रेक्षकांनी भरभरून साथ दिली. प्रत्येक सामन्याला मैदानात प्रेक्षकांनी गच्च भरलेलं होतं. दरम्यान, बीसीसीआयने या स्पर्धेतील जेतेपदानंतर खेळाडू आणि सपोर्ट स्टाफवर बक्षिसांचा वर्षाव केला. गेल्या वर्ल्डकप तुलनेत 6 कोटी अधिक दिले. म्हणजेच बक्षिसाच्या रुपाने 131 कोटी रूपये दिले. या स्पर्धेतून टीम इंडिया, खेळाडू आणि क्रीडाप्रेमीच आनंदी झाले नाहीत, तर आयसीसी आणि या स्पर्धेशी निगडीत ब्रँड्सनाही फायदा झाला आहे. एका रिपोर्टनुसार, टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत फक्त जाहिरातीच्या माध्यमातून हजारो कोटींची कमाई झाली आहे. वर्ल्डकपशी निगडीत कंपनी आणि आयोजकांना मोठी कमाई करता आली. एक्सचेंज फॉर मीडियाच्या एका रिपोर्टमध्ये केलेल्या दाव्यानुसार, वर्ल्डकप स्पर्धेत फक्त जाहिरातीच्या माध्यमातून 1500 कोटीहून अधिकची कमाई झाली आहे. हा प्राथमिक अंदाज असून यात आणखी वाढ होऊ शकते.

या स्पर्धेत तीन सामने कमाईचं मोठं साधन ठरले. यात भारत पाकिस्तान सामना, उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीचा सामना होता. या सामन्यांसाठी जाहिरातींचे दर अधिक होते. रिपोर्टमध्ये इंडस्ट्रीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सांगितलं की, वर्ल्डकपमधील साखळी फेरीतील सामन्यांच्या जाहिरातीचा दर 10 सेकंदासाठी 7.5 लाखांच्या आसपास होता. तर स्पर्धा जशी पुढे सरकली तसा हा दर 15-16 लाखांच्या घरात गेला. भारत पाकिस्तान सामना सर्वाधिक फायदा देणारा ठरला. वादाच्या पार्श्वभूमीवर या सामन्याचं महत्त्व वाढलं होतं. या सामन्यासाठी प्रत्येक 10 सेकंदासाठी 20-25 लाख मोजले गेले.

उपांत्य आणि अंतिम फेरीच्या सामन्यासाठी जाहिरातीचे दर 15 ते 20 लाखांच्या घरात होते. एका रिपोर्टनुसार, अरामको, डीपी वर्ल्ड आणि एमीरेट्स हे आयसीसीचे तीन प्रमुख प्रायोजक होते. या कंपन्यांनी 75-75 कोटी रुपये जाहिरातीवर खर्च केले. तर इतर कंपन्यांनांनी 15.20 कोटी खर्च केले.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल