AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : गौतम गंभीर…, गुवाहाटीतील पराभवानंतर भारताच्या माजी कर्णधाराने काय म्हटलं?

Sunil Gavaskar On Gautam Gambhir : गुवाहाटीत भारताने सामन्यासह मालिकाही गमावली. दक्षिण आफ्रिकेने भारताला 2-0 ने व्हाईटवॉश केलं. भारताच्या या लाजिरवाण्या पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक असलेल्या गौतम गंभीर याला टीकेचा सामना करावा लागत आहे.

IND vs SA : गौतम गंभीर..., गुवाहाटीतील पराभवानंतर भारताच्या माजी कर्णधाराने काय म्हटलं?
Gautam Gambhir and Kuldeep YadavImage Credit source: PTI
| Updated on: Nov 27, 2025 | 8:30 PM
Share

भारतीय कसोटी संघाला मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पाचव्या दिवशी 408 धावांनी पराभूत व्हावं लागलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवामुळे भारतावर 0-2 ने पराभूत होण्याची नामुष्की ओढावली. भारताची ही मायदेशात व्हाईटवॉश होण्याची ही गेल्या 3 मालिकांमधील दुसरी वेळ ठरली. भारताला न्यूझीलंडनंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध व्हाईटवॉशचा सामना करावा लागला. नेटकरी आणि क्रिकेट चाहत्यांनी भारताच्या या पराभवाला हेड कोच गौतम गंभीर याला जबाबदार ठरवलं.

भारताच्या या लाजिरवाण्या पराभवामुळे गंभीरवर चौफेर टीका करण्यात आली. गंभीरने या मालिकेसाठी घेतलेले काही निर्णय हे धाडसी ठरले. गंभीरच्या या निर्णयांमुळेच भारतावर व्हाईटवॉश होण्याची नामुष्की ओढावली असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे गंभीर टीकेचा धनी ठरत आहे. मात्र अशात भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी गंभीरची पाठराखण केली आहे. भारताच्या पराभवाला एकटा गंभीर जबाबदार नसल्याचा सूर गावसकरांचा आहे.

भारताच्या या पराभवानंतर गंभीरवर आजी-माजी खेळाडूंकडून टीका करण्यात आली. मात्र गावसकर यांचं मत वेगळं आहे. भारताच्या पराभवासाठी एकट्या गंभीरची चूक नाही. खेळाडूंनीही मैदानात चांगली कामगिरी केली नाही, असं गावसकर यांचं म्हणणं आहे.

लिटिल मास्टर काय म्हणाले?

“गौतम गंभीर प्रशिक्षक आहे. प्रशिक्षक संघाची मोट बांधू शकतो. प्रशिक्षक आपल्या अनुभवानुसार सल्ला देऊ शकतो. मात्र मैदानात तर खेळाडूंनाच खेळायचं आहे. गंभीरच्याच मार्गदर्शनात भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कपचं विजेतेपद मिळवलं आहे”, असं म्हणत गावसकरांनी गंभीरची पाठराखण केली. गावसकर यांनी इंडिया टुडेसोबत बोलताना ही प्रतिक्रिया दिली.

“गावसकरांनी गंभीरवर टीका करणाऱ्यांना प्रश्न केला आहे. जी लोकं गंभीरला या पराभवासाठी जबाबदार ठरवत आहेत त्यांना माझा प्रश्न आहे की चॅम्पिन्स ट्रॉफी आणि आशिया कप जिंकल्यानंतर तुम्ही काय केलं? तेव्हा तुम्ही गंभीरचा करार लाईफ टाईम केलात का?”,असा आक्रमक प्रश्न गावसकरांनी केला.

गौतम गंभीर याची हेड कोच म्हणून आकडेवारी

भारतीय संघाने आतापर्यंत गौतम गंभीर याच्या मार्गदर्शनात एकूण 19 कसोटी सामने खेळले आहेत. भारताला त्यापैकी गंभीरच्या कोचिंगमध्ये निम्मे सामनेही जिंकले आले नाहीत. भारताने 19 पैकी 7 कसोटी सामन्यांत प्रतिस्पर्धी संघावर मात केली आहे. तसेच टीम इंडियाने 2 सामने ड्रॉ केले आहेत.

Follow Us
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!.
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक.
नागपूरच्या पिंक मॅरेथॉनमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती
नागपूरच्या पिंक मॅरेथॉनमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती.