AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS: चौथ्या टी20 सामन्यात गौतम गंभीरचा एक निर्णय ठरला प्रभावी, विजयानंतर सूर्यकुमारची जाहीर कबुली

चौथ्या टी20 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 48 धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात भारताने 168 धावांचं लक्ष ठेवलं होतं. पण ऑस्ट्रेलियाचा संघ फक्त 119 धावा करू शकला. या विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव याने गौतम गंभीरच्या निर्णयाबाबत सांगितले.

IND vs AUS: चौथ्या टी20 सामन्यात गौतम गंभीरचा एक निर्णय ठरला प्रभावी, विजयानंतर सूर्यकुमारची जाहीर कबुली
IND vs AUS: चौथ्या टी20 सामन्यात गौतम गंभीरचा एक निर्णय ठरला प्रभावी, विजयानंतर सूर्यकुमारची जाहीर कबुलीImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Nov 06, 2025 | 10:14 PM
Share

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिलाच सामना पावसामुळे वाया गेला. त्यामुळे चार पैकी तीन सामन्यात विजयी होणार्‍या संघाला मालिका विजय मिळेल हे स्पष्ट झालं. दुसऱ्या टी20 सामन्यात भारताचा पराभव झाला. मात्र तिसऱ्या आणि चौथ्या टी20 सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. आता भारताकडे मालिका विजयाची संधी आहे. चौथ्या टी20 सामन्यात भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली आणि 20 षटकात 168 धावांचं लक्ष दिलं. खरं तर क्रीडाप्रेमींच्या मते हे लक्ष्य खूपच तोकडं होतं. पण भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला 119 धावांवरच रोखलं. यासह भारताने हा सामना 48 धावांनी जिंकला. या सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने विजयाचं श्रेय आपल्या संघाच्या स्मार्ट खेळीला दिलं. सामन्यानंतर सूर्यकुमार यादवने याचा उल्लेख केला. तसेच प्रशिक्षक गौतम गंभीरबाबतही सांगितलं.

सूर्यकुमार यादवने सामन्यानंतर सांगितलं की, ‘मला वाटतं की या विजयाचं श्रेय फलंदाजांना मिळालं पाहीजे. शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा यांची चांगली भागीदारी केली. त्यांना माहिती होतं की 200 किंवा 220 धावांची ही विकेट नाही. त्यामुळे त्यांनी परिस्थितीनुसार खेळणं पसंत केलं. संघाच्या सर्व फलंदाजांनी योगदान दिलं.’ टीम इंडियाकडून शुबमन गिलने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 39 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकार मारत 46 धावा केल्या. तर अभिषेक शर्माने 21 चेंडूत 3 चौकार आणि एक षटकार मारत 28 धावा केल्या. अक्षर पटेलने 11 चेंडूत नाबाद 21 धावांची खेळी केली.

सूर्यकुमार यादवने गौतम गंभीरबाबत सांगितलं की, ‘मी आणि गौतम गंभीर यांचं एकच म्हणणं होतं की गोलंदाजांनी आक्रमक राहावं. मैदानावर जास्त दव नव्हतं. पण आमच्या गोलंदाजांनी हे गोष्ट जाणली. शिवम दुबेने 2 आणि वॉशिंग्टन सुंदरने तीन विकेट घेतल्या. टीममध्ये काही षटकं टाकतील असे गोलंदाज असणं आवश्यक आहे. यामुळे फायदाच होतो. हा एक चांगला संघ आहे.’ भारताकडून सर्वच गोलंदाजांनी विकेट घेतल्या. यात वॉशिंग्टन सुंदरने 1.2 षटकात 3 गडी बाद केले. तर अर पटेल आणि शिवम दुबेने प्रत्येकी 2 गडी बाद केले. तर अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि वरूण चक्रवर्तीच्या वाटेला एक विकेट आली.

दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं
दानवे-फडणवीसांमध्ये जुंपली, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापलं.
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं
कोण होतास तू काय झालास तू? , ठाकरे-फडणवीसांमध्ये हिंदुत्वावरून पेटलं.
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद
विधानसभेत नितेश राणे भडकले, सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद.
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, अजितदादांच्या युतीचं कुठं हो... कुठं नाही!.
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं पायपुसणं.... शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर
दानवे म्हणाले मुख्यमंत्री कंजूस, CMO म्हणतंय आरोप खोटं, थेट आकडे जाहीर.
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही...
राज ठाकरे कल्याण मारहाण प्रकरणी कोर्टात, म्हणाले गुन्हा मान्य नाही....
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात
फडणवीस दानशूर राज्याचे कंजूस प्रमुख, कर्जमाफीवरून दानवेंचा घणाघात.
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
प्रफुल्ल पटेलांनी घेतली मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
आता पांघरूण खातं तयार करा म्हणजे... उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल.